01:00am | Aug 18, 2018 |
फलटण : जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळुन डॉ.आंबेडकर यांच्या मुर्दाबादच्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ आज फलटण येथे संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन,मंगळवार पेठ येथुन हा मोर्चा जुनी चावडी - पंचशील चौक - बारामती चौक - नाना पाटील चौक - छञपती शिवाजी महाराज चौक - डॉ.आंबेडकर चौक - महावीर स्तंभ - उमाजी नाईक चौक - गजानन चौक - महात्मा फुले चौक मार्गे तहसिल कार्यालयावर धडकला.
तहसिल कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर प्रथम संविधान प्रतिज्ञा वाचुन सुरुवात करण्यात आली.तसेच लहान मुलींनी इंग्रजी मध्ये संविधान प्रतिज्ञेचे वाचन केले.
यावेळी बोलताना अशोक गायकवाड म्हणाले, डॉ.आंबेडकर यांनी लिहलेले संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि अशा संविधानाच्या प्रती जाळुन असे मनुवादी कृत्य करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.ते पुढे म्हणाले, येणारा काळ हा खुप गंभीर असुन या काळास सामोरे जाण्यासाठी समक्षपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले.
बसपाचे महाराष्ट्र सचिव काळुराम चौधरी म्हणाले, ज्या बाबासाहेबांनी अहोराञ कष्ट घेऊन संविधान तयार केले असे ही संविधान जाळणाऱ्या मनुवाद्यांना गाडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, संविधान हे फक्त बौध्द समाजासाठीच नसुन सर्व भारतीयांसाठी आहे. याची जाणीव देखील इतर समाजाला त्यांनी करुन दिली. येणाऱ्या काळात जर हे बीजेपी चे सरकार जमिनीत गाडले नाही तर, असे जातीवादी कृत्ये घडतच राहणार असे मत व्यक्त केले.
यावेळी संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने तहसिलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.या मोर्चामध्ये संविधान चिरायु होवो,संविधान जाळणार्यांचा धिक्कार असो,भिडे गुरुजी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
फलटण शहरात शांततेत मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सहभागी झाला होता.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |