सातारा (अरुण जावळे) : साता-यात जागतिक महिला दिन प्रशासकीय इतमामात साजरा झाला. विविध विद्यालयांचा सहभाग, चित्ररथ, देखावे, आकाशात फुगे सोडणे आशा भारलेल्या वातावरणाचा उत्साही जल्लोष डोळ्यात साठवून अनेकांना अनुभवता आला. पहाता पहाता या उत्सवाची छायाचित्रे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली. सोशल मिडियावरही व्हायरल झाली आणि एकामागून एक अशी छायाचित्रे पहाताना एका छायाचित्रावर नजर स्थिरावली. क्षणभर त्या छायाचित्राने मला गंभीर व्हायला भाग पाडले. 'रयत' च्या विद्यार्थीनी पायात चपला घालून जीवंत देखावा सादर करताहेत आणि त्यांच्या पायाशी राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासह अन्य कर्तबगार महिलांच्या प्रतिमा असणारे कटआऊट लावलेलं आहे, अशा स्वरुपाचे हे छायाचित्र. खरं म्हणजे, कोणतीही कलाकृती सादर करताना वा साकारताना 'मूल्यभान' राखलं नाही, तर आपल्या 'आदर्शांना' आपणच कसे पायदळी तुडवतो याचाच हा एक प्रकारे ज्वलंत आणि जिवंत देखावा!
या जिवंत देखाव्याचे प्रयोजन करणारे अन्य कोणी असते तर, फारसे काही वाटले नसते. परंतु तथाकथित म्हणवले जाणारे शिक्षक - प्राध्यापक जेव्हा या देखाव्याचे 'प्रारुप' निश्चित करुन ते लहान विद्यार्थींनीच्या माध्यमातून दृष्यरुपात समोर आणतात आणि आदर्शांच्या कटआऊटबाबत ( योग्य ठिकाणी कसे असावे याबाबत ) कमालीचे गाफिल रहातात, तेव्हा त्यांच्या गाफिलतेबाबत अवाक व्हायला होते. पण, अवाक होऊन उपयोग काय ? त्यापेक्षा त्या गाफिलतेचा निषेध करणं आणि यापुढे तसे घडू नये यासाठी सजग रहायला लावणे, हे शहाणपणाचे ठरेल. नाही तर, शिक्षण वर्तुळातील गाफिलता अधिक प्रबळ झालीच म्हणून समजा आणि तसे होणे म्हणजे शैक्षणिक निती मूल्यांवर घाला हा ओघाने ठरलेलाच..! त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तारतम्य जपल्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव प्रत्येकाने नेणीवेत रुजवली पाहिजे.
मुळात शिक्षण हे क्षेत्रच असे आहे की येथे कोणत्याच कामात कोणत्याच स्वरुपातील गाफिलतेला वाव नाही. इथे सतत सतर्कच असायला हवे. त्याचे कारण म्हणजे शिक्षण हे समाज बदलाचे महत्वपूर्ण माध्यम आहे. माणसाच्या जडणघडणीशी आणि त्याच्या वर्तमानाशी व भविष्याशी शिक्षणाचा थेट संबध असतो. तद्वतः नवी पिढी उभारण्याची नैतिक जबाबदारी आपसूक प्राध्यापक या घटकावर येऊन पडते. त्यामुळे इतर क्षेत्रातील शासकीय पदाधिका-यांसारखे प्राध्यापकाला कसेही रहाता वा वर्तन करता येणार नाही. इतर चुकतात म्हणून आपण चुकलो, तर बिघडले कुठे, असे समर्थन सुध्दा प्राध्यापकाला करता येणार नाही. कारण प्राध्यापक हा समाज घडविण्याच्या प्रक्रियेतला मुख्य घटक असतो, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. एक बँकर चूकला तर एक घोटाळा होतो. एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट मरतो. एक इंजिनियर चुकला तर एक पूल पडतो, पण एक शिक्षक - प्राध्यापक चुकला तर अवघी पिढी बरबाद होते. म्हणून शिक्षक - प्राध्यापकाने कोणत्याही परिस्थितीत 'मूल्यभान' हरवून बसता कामा नये.
वास्तविक, जागतिक महिला दिनी आपल्या आदर्शांचा विचार आणि कार्यकर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून नव्या पिढीच्या काळजात नवी जिद्द, नवी हिम्मत, नवा उस्ताह, नवा बुलंद निर्धार आणि उर्जा कशी पेरता येईल, याचा ध्यास घेऊनच कृतीकार्यक्रम करणं आवश्यक होतं. तथापि, तसे करताना बेमालूमपणे का होईना राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांचा अवमान झाला, हे वेदनादायी आणि अक्षम्य आहे. तेव्हा यापुढे अवमान होणार नाही यासंबंधी 'मूल्यमंथन' व्हावे, इतकेच !
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |