03:35pm | Oct 26, 2019 |
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला 'क्यार' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या 48 तासात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ऐन दिवाळीत हे वादळ कोकण आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असून ढगफुटीसारखा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला आहे. येत्या २४ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार, तर राज्याच्या उर्वरित भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळाचा फटका मुंबईलाही बसणार आहे.
अरबी समुद्रात 8 दिवसापासून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. अरबी समुद्रात जरी वादळ निर्माण होत असले तरी किनारपट्टीला धडकणार नाही. 80 ते 90 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील त्यामुळे झाड़े, विद्युत खांब कोसळतील, असा अंदाज देखील व्यक्त केला आहे. रत्नागिरीपासून 240 किलोमीटर असून दक्षिण आणि दक्षिणपूर्व मुंबईपासून हे वादळ 380 किलोमीटर अंतरावर आहे. येत्या २४ तासांत कोकण, गोवा, कर्नाटकात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पावसाची शक्यता आहे. वादळ ओमानच्या दिशेने सरकण्याची चिन्हे आहेत, असे हवामान खात्याने सांगितलं आहे. या काळात 'क्यार'ची तीव्रता वाढणार असल्याने मुंबई-कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 25 ते 30 ऑक्टोबरपर्यंत वादळाचा परिणाम जाणवणार आहे. 30 ऑक्टोबरनंतर हे वादळ ओमानच्या दिशेने सरकेल.
'क्यार' चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक राज्यातील अनेक बोटी आश्रयासाठी कोकणातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देवगड बंदरात आणल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बोटी देवगडमध्ये दाखल झाल्या आहेत. 'क्यार' चक्रीवादळचा फटका मासेमारी व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तळकोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील मुख्य पीक असलेलं भात पिकांचे मोठ नुकसान झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |