02:20am | Dec 07, 2018 |
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूकोड बिलाच्याद्वारे महिलांना संपत्तीत समान हक्क व प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करून स्त्री चळवळीचा पाया घातला आहे. यासाठी भारतीय स्त्रियांवर त्यांचे प्रचंड ऋण आहे. त्यांच्या मातोश्री भीमाबाई यांच्या नावाचा पुरस्कार हा स्त्रियांच्या चळवळीचाच गौरव आहे. त्याने हृदय भरून आल्याचे भावोद्गार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर (संगमनेर) यांनी काढले.
येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षीचा मातोश्री भीमाबाई २१ वा पुरस्कार जेष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्या हस्ते निशा शिवूरकर यांना प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. विचार मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य आण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते. या प्रसंगी निशा यांचे जीवनसाथी प्रा. शिवाजी गायकवाड व निवृत्त लेफ्ट. कर्नल प्राचार्य शुभांगी सदा डुंबरे यांचा सत्कार प्रा. सुवर्णा यादव यांनी केला. निशा शिवूरकर यांनी पुरस्काराची रक्कम शोषण विरोधी चळवळीसाठी देण्याची घोषणा यावेळी केली.
ॲड. निशा शिवूरकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, देशासमोर सध्या भयानक स्वरूपाचे सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय स्वरूपाचे संकट उभे आहे. परंपरेच्या बाजूने उभे रहायचे की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, सहिष्णुता मुल्यांची जोपासना करण्याच्या बाजूने उभे रहायचे याचा महिलांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडण्यात आली. भारतीय संविधान रक्षणासाठी आपण आग्रह धरत असताना हे संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न जोरदारपणे चालू असून १९९२ सालापासूनच झुंडशाही व हिंसाचाराद्वारे देश तोडण्याचे काम चालू आहे. हे खूप मोठे आव्हान आहे. त्याचा मुकाबला केला पाहिजे. शबरीमला मंदिर महिला प्रवेशाबाबत सर्वोच्य नायालयाचे लिंगभेद समानतेच्या निर्णयाबाबत केंद्रातील सत्ताधारी पक्ष घेत असलेली भूमिका चिंताजनक आहे. त्यांचा परंपरा टिकविणारा बुरखा फाडावाच लागेल. केंद्र सरकारने तिहेरी तलाक बाबतचे विधेयक भंपक व अर्धवट स्वरूपाचे आहे. त्याने समता मिळवून देणाऱ्या महिला अधिकाराच्या चळवळीला व तीनशे वर्षाच्या कायद्यांना चुडा लागला आहे. लव्ह जिहाद म्हणजे स्त्री स्वातंत्र्य विरुद्धचे षडयंत्रच आहे. त्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
सदा डुंबरे म्हणाले,निशा शिवूरकर परित्यक्त्या स्त्रियांचा प्रश्न धसास लावणाऱ्या व महाराष्ट्र राज्याचे महिला धोरण अस्तित्वात आणणाऱ्या फायर ब्रँड कार्यकर्त्या आहेत. सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे आधुनिक भारत घडविणाऱ्या महिलांच्या त्या प्रतिनिधी आहेत. भिमाई पुरस्कारने त्यांचा योग्य सन्मान झाला आहे.
अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आधुनिक भारताची संकल्पना विकसित होत गेली. गौतम बुद्ध, महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर यांनी आधुनिक भारताचा सर्वसमावेशक, चिरंजीवी विकास घडवून आणला आहे. त्याला आव्हान देण्याचे गांधी, आंबेडकरांचे अपहरण करा व पंडित नेहरूंना बदनाम करण्याचे काम सध्या देशात सुरु आहे. जातींच्या व्होट बँकेचा वापर राजकीय हेतूने करण्याचे धोरण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्याचा निषेध करण्याची व राजर्षी शाहू प्रमाणे महात्मा फुलेही आमचेच आहेत हे ठणकावून सांगण्याची गरज आहे.
सूत्रसंचालन ॲड.हौसेराव धुमाळ यांनी केले व प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |