04:50pm | May 31, 2018 |
सातारा : सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून सत्ताधार्यांनी विकास करायचा असतो. परंतू सध्या शासकीय योजना या राज्यकर्ते व त्यांच्या बगलबच्च्यांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी तयार झालेल्या आवास योजनेच्या माध्यमातून राज्यकर्त्यांच्या निकटवर्तीयांनी गरीबांची घरे लाटली आहेत. सातारा तालुक्यात निकटवर्तीयांना घरकुले व गरीबांना प्रतिक्षा यादी ठेवण्यात आली आहे. तर अपशिंगे, ता. कोरेगाव येथे घरकुलाचे अर्धवट काम अजूनही पूर्ण करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती असूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. कैलास शिंदे यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनेक शासकीय विभागांचा आढावा घेतला. सर्वसामान्य बचतगट, गरीब लाभार्थी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मेळावे आयोजित करण्यात येतात. वित्तीय सहकार्यही त्यांना शासनातर्फे केले जाते. अशा या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायतींमध्ये घरकुल व व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. या कामासाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे तपासणीसाठी दिलेले बांधकामाचे साहित्य उत्कृष्ट आहे, असे प्रमाणपत्रही मिळाले आहे. परंतू बांधकामाठी प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या साहित्याची कुठेही तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत, त्याचा वापर होत नाही. सातारा तालुक्यातील वाढे या गावात तर अशा व्यापारी संकुलामध्ये भजनी मंडळाचे साहित्यच ठेवले जात आहे. हे प्रातिनिधीक स्वरुपात असले तरी जिल्ह्यातील 5 हजार घरकुलांपैकी दीड हजार घरकुलांचे काम अर्धवट आहे. तरी त्याला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे.
पूर्वी इंदिरा आवास योजनेला 1 लाख 10 हजार रुपयांचे अनुदान मिळत होते. त्यामध्ये 40 हजारांची भर घातल्यामुळे आता काही भ्रष्ट यंत्रणेचे उखळ पांढरे झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी नेले, ता. सातारा येथील ग्रामसेवकाला स्मशानभूमीच्या कामाची टक्केवारी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पंचायत समितीच्या आवारात रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याला गटविकास अधिकार्यांच्या दालनात घेवून गेले होते. यामध्ये त्यांचाही सहभाग आहे की काय? असाही प्रश्न उपस्थित झाला होता. यासाठी करण्यात आलेले चित्रीकरणही अधिकार्यांनी नष्ट केले, असे बोलले जात आहे. या घटनेचे अवलोकन केले असता या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकटवर्तीयांना सातारा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांनी घरकुलाचा ‘प्रसाद’ वाटल्याचे उघड झाले आहे. या घरकुलाचे काम घेणारे ठेकेदार व लोक प्रतिनिधी, त्यांचेच लाभार्थी व अधिकारी अशा चार खांबांवर सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा भ्रष्ट कारभार उभा असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कधीही उच्चस्तरीय तपासणी होत नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यात समाजमंदिर, घरकुल व व्यापारी संकुल म्हणजे ठेकेदार, अधिकारी व भ्रष्ट लोकप्रतिनिधींना पोसण्याचा हत्ती ठरु लागला आहे. राज्यात सत्तांतर झाले आहे, पण भ्रष्टाचाराची मजबूत नीव कायम आहे, याचा सातारा जिल्ह्यात वारंवार प्रत्यय येत आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |