06:47pm | Feb 20, 2020 |
फलटण : नीरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे 55 टक्के पाणी पुन्हा डाव्या कालव्यात सोडण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. आता ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयात लढण्याची घोषणा माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे ते आज फलटण येथे बोलत होते.
निरा – देवधर चे पाणी बारामतीला पवारांनी पळविले जात असल्याचे सिद्ध करीत तत्कालीन भाजपा सरकारला ते पाणी बंद करण्यास खा.रणजितसिंह नाईक – निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मा.मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाग पाडले होते. त्यावेळी त्या प्रश्नावरून मोठे राजकारण तापले होते. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नीरा डाव्या कालव्याचं पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील हक्काच्या पाण्यावर पुन्हा एकदा ‘दादा’ गिरी होत असल्याने यावरून राजकारण तापले असून बेकायदेशीर पाणी वापरास आपला विरोध असल्याचे खा.निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे की, याबाबत ते केंद्र सरकारकडे न्याय मागणार असून तसेच न्यायालयात ही दाद मागणार आणि दुष्काळी भागातील हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. दुष्काळी पट्ट्यातील पाण्याचा नीरा देवघरच्या पाण्यावर सर्वाधिक हक्क आहे. दरम्यान या निर्णयाने दुखावलेल्या खासदार निंबाळकर यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर जळजळीत टिका करीत पवार यांचे दुष्काळी भागाबाबत असणारे प्रेम हे दिखावा असून ते केवळ पाणी, टँकर व जनावरांच्या छावण्यांना भेटी देण्यात धन्यता मानतात मात्र दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणीदार करण्याबाबत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप खासदार निंबाळकर यांनी केला आहे.तर पवार काका – पुतण्या चे खरे चेहरा जनतेसमोर आले आहेत. शरद पवार हे याच दुष्काळी भागातून निवडणूक लढले,विजयी ही झाले मात्र खंडाळा ते सांगोला आणि पंढरपूर ते फलटण या भागातील हक्काचे पाणी बेकायदेशीर बारामती ला नेण्यासाठी मी यापूर्वी ही विरोध केला आहे. आणि आता तर मंत्रिमंडळाने तसा या भागातील जनतेच्या मना विरोधात निर्णय घेतला आहे.तो त्या विरोधात न्यायालयात जाणार असून बेकायदेशीर कामाला विरोध हा करीत राहणार असल्याचे खा.निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळातील निर्णय :
निरा-देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय काल (19 फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल. निरा देवघर धरणाचे काम 2007 मध्ये पूर्ण झालं असून 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे. गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा निर्मित झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप निरा डावा कालवा 55 टक्के आणि निरा उजवा कालवा 45 टक्के असं राहील.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |