01:44am | Mar 09, 2018 |
सातारा : समाजामध्ये महिलांना म्हणावे तेवढे स्थान नाही, हे बदलण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या मुलींना चांगले शिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन आर्थिक दृष्ट्या सक्षम केले पाहिजे तर समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला. महिलांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन आज जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी अस्मिता योजनेचा शुभारंभही मान्यववरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, पिस्तुल नेमबाज राही सरनोबत, जलतरण पट्टू स्नेहल कदम, रायफल नेमबाज रुचिरा लावंड, सिने अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, किर्ती नलावडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मंजुषा मिसकर , रेवती शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. महिलांचे आर्थिक, शैक्षणिक व राजनैतिक सक्षमीकरण झाले पाहिजे. यासाठी महिलांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क करावा. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जाईल. महिलांमध्ये राजनैतिक सक्षमीकरणाचीही गरज आहे. यासाठी महिलांनी आपल्या नेतृत्वगुणांना वाव दिला पाहिजे तसेच मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. शहरातल्या महिला जास्त करुन शिक्षीत असतात पण त्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याचे प्रमाण कमी आहे. आता शहरातल्या महिला मतदारांनीही मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. महाराष्ट्रामध्ये महिलांच्या लोकसंख्येच्या 925 प्रमाणात प्रत्यक्ष, महिला मतदाराच्या संख्येचे प्रमाण 905 इतकेच आहे. ही 20 महिला मतदारांची तफावत दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. महिलांना मतदानच हक्क जन्मजात मिळाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवून समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले. जिल्हा परिषदेच्यावतीने नुकतेच महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 8 हजार 500 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या मागचे कारण शोधले असता सॅनिटरी नॅपकिन न वापरल्याचे प्रमुख कारण आढळले. जिल्हा परिषदेच्या शाळेमधून अस्मिता योजनेंतर्गत मुलींच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन फक्त 5 रुपयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महिला ही एक कुटुंब सांभाळत असते. ही महिला आर्थिक दृष्या सक्षम झाली तर कुटुंबाबरोबरच देशाचाही विकास होईल. यासाठी प्रत्येक मातेने आपल्या मुलीला चांगले शिक्षण दिले पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी यावेळी केले. आजच्या बदलत्या काळात स्त्रीयांच्या भूमिकाही बदलत चालल्या आहेत. प्रत्येक महिलेने लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जलतरण पट्टू स्नेहल कदम यांनी केले. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे काम पाहून मी खूप प्रभावीत झाले आहे. प्रत्येक महिलेला स्वत:चे भविष्य घडविण्याची इच्छा असते. प्रथम तीला तीच्या घरातूनच नंतर समाजातून विरोध होतो. हा विरोध करु नका, तीच्या पंखाना बळ द्या, असे आवाहन सेने अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी यावेळी केले. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. जो पर्यंत महिलांचे आर्थिक व सामाजिक स्वावलंबन होणार नाही तोपर्यंत महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पिस्तुल नेमबाज राही सरनोबत यांनी यावेळी केले. या कार्यक्रामाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केले. सूत्र संचालन वृंदा शिवदे तर प्रांताधिकारी स्वाती देशमुख- पाटील यांनी मानले. यावेळी तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, अस्मिता मोरे, रोहिनी आखाडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यस्तरीय जागतिक महिला दिनानमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक कोमल घार्गे, आर.एस.बी.एम. औंध, द्वितीय पुजा पवार, बी.डी. महाविद्यालय, पाटण, चित्रकला स्पर्धा, अनुराधा यादव प्रथम क्रमांक, श्रेया जाधव द्वितीय क्रमांक, सायली फाळके तृतीय क्रमांक, रांगोळी स्पर्धा वैष्णवी जाधव प्रथम क्रमांक, पल्लवी जाधव द्वितीय क्रमांक, प्रज्ञा पाटील तृतीय क्रमांक यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी आधार सामाजिक विकास संस्था, आळजापूर ता. फलटण यांच्यावतीने मतदान जागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. प्रारंभी सकाळी 8 वाजता भव्य शोभायात्रेने राज्यस्तरीय जागतिक महिला दिन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या रॅलीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थींनी, झाजपथक,लेझीम पथकांचा समावेश होता.
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |