02:32am | Apr 09, 2020 |
सातारा : सुमारे तीन महिन्यांपूर्वी चीनमधील वुहान येथे कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण सापडल्यानंतर कोरोना विषाणू जावलीसारख्या दुर्गम भागातही पोहोचेल, असा कोणी स्वप्नातही विचार केला नसावा. परंतू ह्युमन मायग्रेशनमुळे हे शक्य झाले असून मुंबईकर असलेल्या निझरेतील व्यक्तीच्या एका लबाडीमुळे मात्र आज आख्खा जावली तालुकाच वेठीस धरला जात आहे.
कोरोना (कोविड-19) या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात हाहाकार उडालेला आहे. केवळ तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे 14 लाख 50 हजार 950 लोकांना याची लागण झाली आहे, तर 83 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. आजवरच्या इतिहासातील सर्वात भयानक व्हायरस म्हणून कोरोनाकडे पाहिले जात आहे. भारतातही या कोरोनाने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारतात 5 हजार 742 रुग्ण बाधित असून सुमारे 174 मृत्यूही या संसर्गामुळे झालेले आहेत. देशभरात सर्वात मोठी कोरोनाची दाहकता मुंबई-पुणे या शहरांमध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात विस्थापित झालेले आहेत. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ‘गड्या आपला गावच बरा’ असे म्हणत अगदी टाळेबंदीपर्यंत सातारा जिल्ह्यातील मुंबई-पुणेकरांनी आपल्या मूळ गावांकडे कूच केले. परंतू येताना आपल्याबरोबर कोरोनासारखा महाभयानक विषाणूही घेवून आले. एरव्ही गावाबद्दल कसल्याही प्रकारची सहानुभूती नसणारे मटणाच्या आणि दारुच्या शोधासाठी गावेच्या गावे पालथी घालू लागले. परंतू कोरोनाची दाहकता त्यांच्या मनालाही शिवली नाही. असे असतानाच बघता बघता सातारा जिल्ह्यात कोरोनाचे सहा बाधित सापडले. दोघे बाधित सोडल्यास चारही जणांचे मुंबई कनेक्शन आहे. त्यामुळे मुंबईवरुन येताना या लोकांनी वास्तविक खबरदारी घ्यायला पाहिजे होती. परंतू जीव वाचविण्याच्या नादात या लोकांनी अनेक जीव मात्र धोक्यात घातले आहेत.
निझरे, ता. जावली येथील 63 वर्षीय रुग्ण कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे त्याला 4 मार्च रोजी सातार्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविण्यात आले. दुसर्याच दिवशी म्हणजे 5 तारखेला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जावली तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. संबंधिताने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ‘मी मुंबईहून 8 मार्च रोजी आल्याचे’ प्रशासनाला सांगितले. म्हणजेच कोरोनाची बाधित झाल्यापासून त्याच्यामध्ये सुमारे 25 ते 27 दिवसांनंतर कोरोनाची लक्षणे दिसायला लागली. वास्तविक देशातील कोरोना बाधिताचा संसर्गिक काळ (इनक्युबिशन पिरियड) आतापर्यंत सुमारे 14 ते 15 दिवसांचा होता. परंतू 25 ते 27 दिवसांचा कोरोनाचा संसर्गिक काळाचा रुग्ण जिल्ह्यात सापडल्यामुळे जिल्हा प्रशासनासह वैद्यकीय क्षेत्रामध्येही खळबळ उडाली होती. संबंधित रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यापैकी त्या बाधिताच्या मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण जावली तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच त्या बाधितावर यापूर्वी उपचार केलेल्या खाजगी डॉक्टर, त्यांच्या रुग्णालयातील कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी व तो बाधित ज्याच्या ज्याच्या संपर्कात आले, त्या-त्या व्यक्तीस जिल्हा प्रशानाला क्वारंटाईन करावे लागले. मात्र, निझरेतील त्या बाधिताने कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला दि. 8 मार्च रोजी तो मुंबईहून निझरेत आल्याचे खोटे सांगितले होते. त्यानंतर सातत्याने ती व्यक्ती खरी माहिती जिल्हा प्रशासनापासून लपवित होता. अखेर प्रशासनाने व पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत त्याच्या मोबाईलचे टॉवर लॉकेशन तसेच सीडीआरही काढला. त्यानंतर मात्र दूध का दूध और पानी का पानी झाले. 21 तारखेचा अहवालच प्रशासनाने त्याला दाखवल्यानंतर आपले बिंग फुटले आहे, हे ओळखून त्याने जे काही आहे, ते खरे सांगितले. तो बाधित मुंबईतील वाळकेश्वर येथे एका व्यापार्याच्या गाडीवर खाजगी चालक म्हणून कार्यरत होता. देशभरात विशेषत: मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तो 21 मार्च रोजी एका टेम्पोमध्ये बसून निझरे येथे आला. आल्यानंतर वास्तविक त्या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक व सरपंचांनी याबाबतची माहिती संकलित करणे क्रमप्राप्त होते. परंतू दुर्दैवाने तसे घडले नाही व त्याची मोठी किंमत आता संपूर्ण जावली तालुक्याला चुकवावी लागत आहे. 4 एप्रिल रोजी अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याअगोदर त्याने खाजगी रुग्णालयातही उपचार घेतले होते. यावेळी त्याने वैद्यकीय अधिकार्यांना आपल्या ट्रॅव्हल हिस्ट्रीबाबत खोटे सांगितले होते. त्यामुळेच डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र कर्माचा फेरा चुकत नाही. केवळ खोटे बोलल्याने कोरोनाने त्याला गाठले. त्याचबरोबर त्याने स्वत:च्या मुलालाही संक्रमित केले. निझरे येथे आल्यानंतर त्या बाधिताने गावच्या पोलीस पाटील, ग्रामसेवक अथवा सरपंचांची भेट घेवून स्वत:बद्दल माहिती देवून होम क्वारंटाईन झाला असता, किंवा कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करुन घेतली असती तर आज त्याच्यासह त्याच्या मुलाला असल्या बाक्या प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. जिल्ह्यात निझरे प्रमाणेच अनेक लोक टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर मिळेल त्या वाहनाने मुंबई-पुण्याहून तसेच इतर शहरातून आपल्या गावाकडे आले आहेत. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच बाहेरुन आलेल्या व्यक्तींचा सर्व्हे करण्याचे काम सुरु केले आहे. तसेच बाहेरुन आलेल्या लोकांनी पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच सरपंचांच्या माध्यमातून आपली नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. परंतू निझरेतील त्या बाधिताप्रमाणे जिल्ह्यातील अनेक लोकांनी अद्यापही आपली माहिती लपवून ठेवली आहे. तसेच ते गावपातळीवर सहकार्य करीत नसल्याचेही समोर आले आहे. असे असताना निझरेतील घटना डोळ्यासमोर ठेवून मुंबई-पुण्यावरुन आलेल्या लोकांनी स्वत:चा विचार करीत माणुसकीच्या भावनेतून देशाचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून वेळ निघून जाण्याअगोदरच आतातरी समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर निझरे प्रमाणेच झुठ बोले कोरोना कांटे, अशी शिक्षा मिळणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |