बिजवडी : माण मतदारसंघात राष्ट्रवादीचे तारणहार ठरलेले शेखर गोरेंची क्रेझ कमी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही बगलबच्चांकडून राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमात ,बँनरवरून त्यांना सतत डावलण्याचा प्रयत्न केला जात असून आघाडीची बिघाडी झाली तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत २०१९ चे आमदार शेखर गोरेच असतील याचे भान ठेवा असा इशारा पक्षिय कार्यक्रमात डावलणाऱ्यां बगलबच्च्यांना व विरोधकांना सौ. सुरेखाताई पखाले यांनी कुळकजाई ता.माण येथील पत्रकार परिषदे दरम्यान दिला आहे.
माण मतदारसंघात मेलेल्या राष्ट्रवादी पक्षाला जिवंत करण्याचे काम शेखर गोरे यांनी केल्यानंतर पक्षश्रेष्टींनी त्यांच्यावर या मतदारसंघाची नेतृत्वाची जबाबदारी दिली होती.आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी जि.प.पं.स., नगरपालिका ,वडूज नगरपंचायत ,खरेदी विक्री संघ ,खादी ग्रामोद्योग ,विविध ग्रामपंचायती , सोसायट्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवत पक्षश्रेष्टींचा विश्वास सार्थ ठरविला आहे.त्यानंतर त्यांना पाठबळ देण्यापेक्षा त्यांचे पाय ओढण्याचेच काम राष्ट्रवादीतील काहीजण करताना दिसून येत आहेत. शेखर गोरेंवर नेतृत्वाची जबाबदारी दिली असताना त्यांना विश्वासात न घेता , कोणतीही कल्पना न देता कार्यक्रमांचे नियोजन केले जाते तर त्या कार्यक्रमांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याने कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. फॉरमँलिटी म्हणून निदान आजच्या वाघमोडेवाडीच्या कार्यक्रमात नाव तरी टाकले हे आमचे नशीब.. पक्षश्रेष्टींकडे आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी पक्षातील काही बगलबच्चे शेखर गोरेंची क्रेझ कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. सर्व न्यायलयीन प्रक्रिया सोपस्करपणे सोडवत शेखर गोरेंची लवकरच मतदारसंघात सक्रिय होत आहेत. पक्षातील बगलब्च्च्यांसह विरोधकांनी कितीही नाटके करून जनतेची दिशाभूल केली तरी एक लक्षात ठेवा लवकरच तुमचा बाप २०१९ ची विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी येतोय मग कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न करा असाही इशारा त्यांनी दिला आहे.
सौ .सुरेखाताई पखाले म्हणाल्या , राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार साहेब यांचे विश्वासू म्हणून मिरवणाऱ्यांनी मतदारसंघात न मिळालेल्या नेतृत्वाची झालर अंगावर ओढून आजपर्यंत माण -खटाव मतदारसंघात पक्षवाढीसाठी काय प्रयत्न केले ते सांगावेत .की एखादी ग्रामपंचायत , सोसायटी ,एखाद्या महत्वाची सत्ता पक्षाला मिळवून दिली ते सांगावे.उलट भाऊंनी एका शेनवडी ग्रामपंचायत अविश्वास ठरावात लक्ष घातले नाहीतर राष्ट्रवादीला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.त्यावेळी कार्यक्रमांना डावलणारे ,आमच्या पाठीमागे टिका करणारे ,जनतेत चूकीच्या अफवा पसरवणारे ,भाऊ आता मतदारसंघात फिरूच शकणार नाहीत असे सांगणारे त्यावेळी कोठे जावून बसले होते.इंजबाव ग्रामपंचायत अविश्वास ठराव प्रकरणात शेखर गोरेंनी लक्ष घातल्याने कॉग्रेस ला झटका देत सत्ता मिळवून आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिध्द करून दाखवून दिले आहे.भाऊंनी
राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत ते करत असताना पक्षासाठी खूप सोसलेही आहे.मात्र पक्षातील काहींना याचे काही पडले नाही.पक्ष संपला तरी चालेल पण शेखरभाऊंचे नेतृत्व नको असे म्हणत पक्षात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.काहींनी समाजकारणाची चादर ओढत राजकारण करण्यास सुरूवात केली खरी पण त्यांचे पक्ष वाढीसाठी कोठेच प्रयत्न दिसून येत नाहीत.
त्यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी विरोधी कॉग्रेस ,भाजप ,शिवसेना ,रासप आदी पक्षातील लोकांना आपलेसे करण्याचा किती प्रयत्न केला.कितीजण त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादीत आले.हे एकदा जाहीर करावे. विरोधी पक्षातील लोकांच्या जवळही ते पोहचू शकले नाहीत.उलट आपल्यात पक्षात त्यांनी फूट पाडत विभाजन केले.जे शेखरभाऊंचे नेतृत्व मानतात त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे.भाऊंनी उभी केलेली पक्षाची फळीतील लोकांच्यातच जावून बसून त्यांनाच वेगळे करण्याचा प्रयत्न होतोय भाऊंपासून ती लोक कशी दूर करता येतील हे पाहिले जात आहे.यापेक्षा विरोधा पक्षातील लोकांच्यात जावून बसा त्यांच्यातली काही लोक फोडता येतायत का बघा का आपलीच लोक हे कसले राजकारण की स्वकारण आहे तेच समजेना.
आपल्या नेतृत्वाच्या जोरावर व जनतेच्या विश्वासावर विरोधकांना नाकीनऊ आणत संपलेल्या राष्ट्रवादीला ऊर्जा देऊन गतवैभव मिळवून दिले.त्यामुळेच आता ते उसणे अवसान घेत शेखरभाऊंना सापत्नभावाची वागणूक देताना दिसून येत आहेत पण एक लक्षात ठेवा जनतेनेच त्यांचे नेतृत्व मान्य केलेय तुम्ही काहीही करा शेखरभाऊंची क्रेझ तुम्हीच काय तुमचे बापही कमी करू शकत नाहीत.असेही शेवटी त्या म्हणाल्या.
आघाडीची बिघाडी झाली तर चालेल पण आ.जयकुमार गोरेंच्या विरोधात शेखर गोरें निवडणूक लढवणारच...!
राज्यात कॉग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी निश्चित होणार आहे.त्यावेळी बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. माण विधानसभा मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनीधी कॉग्रेसचे असल्याने त्यांना उमेदवारी गेली तर राष्ट्रवादी बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न करू शकते.ज्या लोकप्रतिनिधीची विविध ठिकाणची सत्ता शेखरभाऊंच्या नेतृत्वाखाली जनेतेने उलथवून लावली आहे.जनतेने आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधात कौल दिला आहे त्यामुळे त्या लोकप्रतिनीधीला मदत करण्याचा विषयच येत नाही.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेखरभाऊ विद्दमान आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकणार आहेत.मग आघाडीत बिघाडीत झाली तरी चालेल.
न्यायदेवता न्याय देणार....!
मोक्याच्या प्रकरणासारखेच बोथे प्रकरणालाही राजकीय षडयंत्राचा वास लागला असून शिक्षेविरोधात जिल्हा न्यायालयाकडे अपील केले असून त्यात जामीनही मिळाला आहे.मोक्याच्या कारवाईत जसा न्यायदेवतेने न्याय दिला तसाच याही प्रकरणात जिल्हा न्यायलयात आपल्याला निश्चितच न्याय मिळणार असून आपले भाऊ तुमच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहणार आहेत. विरोधकांच्या व काही स्वकीयांच्या भूलथापावर विश्वास ठेवू नका.भाऊ कोणत्याही परिस्थिती तुमच्याबरोबरच राहून विधानसभा लढवणार आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |