मराठी पत्रकारितेला शेकडो वर्षांचा वारसा आहे. हा वारसा जपण्याचे शिवधनुष्य अनेक धुरिणांनी लिलया पेललेले आहे. मराठी भाषेत जितकी दैनिके असतील, तितकी दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके कदाचितच एखाददुसर्या भाषेत असावीत. एवढा जिव्हाळा मराठी वाचक आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये शेकडो वर्षांपासून जपला गेला आहे. ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर टिळकांचे केसरी, प्र. के. अत्रे यांचे मराठा, परुळेकरांचा सकाळ आदी दैनिकांनी त्या-त्या काळामध्ये पत्रकारितेचा ठसा समाजमनावर उमटवला. मराठी साहित्याबरोबरच मराठी वृत्तपत्रांचेही योगदान फार मोठे आहे. समाजप्रबोधनाचा वसा घेतलेल्या ही दैनिकांची परंपरा आजतागायत सुरु आहे. इंटरनेटच्या जमान्यातही मराठी वृत्तपत्रांनी कात टाकून काळाबरोबर बदलही आत्मसात केले आहेत. त्यामुळे मराठी वृत्तपत्राची झेप केवळ महाराष्ट्रापुरतीच न राहता ती आता ई-दैनिकांच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचली आहे.
टिळकांचा केसरी आणि अत्रेंच्या मराठानंतर महाराष्ट्रात अनेक दैनिके उदयास आली. बॅनेटन ऍण्ड कॉलोमन या कंपनीचे आणि टाईम्स ऑफ इंडियाचे भावंड असलेले महाराष्ट्र टाईम्स, इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे लोकसत्ता या भांडवलदारी दैनिकांनी गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे. दर्डा शेठजींचे लोकमतही महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून राज्यभरात गस्त घालत आहे. परुळेकरांनी स्थापन केलेला आणि सध्या शरद पवारांच्या धाकट्या बंधूंच्या ताब्यात असणारा सकाळही आपले स्थान टिकवून आहे. कोल्हापुरात एकेकाळी सत्यवादी दैनिकाचा जमाना होता. हा जमाना मोडित काढून पुढारीने सत्यवादीला आस्मान दाखवून पश्चिम महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केलेला आहे. बेळगावच्या बाबुराव ठाकुरांनी यंग इंडिया या इंग्लिश मासिकाच्या धर्तीवर तरुण भारत हे दैनिक सीमावासियांच्या वेदना मांडण्यासाठी बेळगावात सुरु केले होते. हेसुद्धा चांगलेच तग धरुन आहे. विदर्भातील प्रकाश पोहोरेंचे दैनिक देशोन्नती, नाशिकचे गावकरी, देशदूत, सातार्याचे दैनिक ऐक्य ही दैनिके काळानुरुप बदल करुन त्या-त्या स्वरुपामध्ये आज राज्यभरात प्रकाशित होत आहेत. मोबाईलच्या जमान्यात या दैनिकांसमोरील आव्हाने जरुर वाढली आहेत, परंतू ही दैनिके चिरकाल टिकावीत, ही मराठी वाचकांचीच अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील दैनिके आणि त्याचे दर्दी वाचक हा खरेतर संशोधनाचा विषय आहे. एवढी दैनिके बाजारात उपलब्ध असूनही नित्यनेमाने नवीन दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके बाजारात येतच आहेत. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टिमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु झालेली दिसत आहे. अशा स्पर्धेमध्ये अग्रलेखाचे बादशाह निळकंठ खाडिलकर यांनी 1923 साली स्थापन झालेल्या नवाकाळ या दैनिकाची संपादक म्हणून धुरा अतिशय समर्थपणे पेलली. प्रशासन आणि पुढार्यांवर आपल्या अग्रलेखाच्या माध्यमातून आसुड ओढून संपूर्ण महाराष्ट्र हलविण्याची ताकद खाडिलकरांच्या लेखणीमध्ये होती. मराठीतील दिवंगत महान साहित्यिक कुसुमाग्रजांनी मराठी दैनिकांना ‘नवाकाळी’ धोरण अवलंबण्याचा सल्ला त्याकाळी दिला होता. त्याचे कारण असे, खाडिलकरांनी आपल्या लेखणीमध्ये विविध प्रयोग केले. उदाहरणार्थ पूर्वी एखाद्या क्रिकेट सामन्याचे वार्तांकन करीत असताना बॅट्समन, बॉलर, विकेट किपर, फिल्डर हे इंग्लिश शब्दच त्या क्रिडा वार्तामध्ये सर्रासपणे प्रचलित होते. परंतू खाडिलकरांनी बॅट्समनला फलंदाज, बॉलरला गोलंदाज (कारण तोफ चालविणार्याला गोलंदाज म्हटले जाते), विकेट किपरला यष्टीरक्षक, फिल्डरला क्षेत्ररक्षक अशाप्रकारच्या अनेक शब्दांची भर खाडिलकरांनी मराठी शब्दकोशामध्ये घातली. गेली अनेक दशके खाडिलकर नवाकाळमध्ये सातत्याने लिहित राहिले. त्यांचा स्वतंत्र असा वाचकवर्ग महाराष्ट्रामध्ये तयार झाला.
महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता सारखी भांडवलदारी वृत्तपत्रे त्याकाळी पहाटे दाराच्या फटीतून घरात पोहोचत होती. परंतू नवाकाळ हे दैनिक विकत घेण्यासाठी लोक घरातून वृत्तपत्र विक्रेत्यापर्यंत जायचे. असे निरिक्षण अनेकांनी नोंदविलेले आहे. त्यामुळे खाडिलकरांचा आणि नवाकाळचा दबदबा महाराष्ट्राने एकेकाळी पाहिलेला आहे. नवाकाळने काळानुरुप बदल केला नाही. जिल्हावार आवृत्त्या काढल्या नाहीत. त्यामुळे नवाकाळ दैनिक खपाच्या बाबतीत जैसे थेच राहिलेले आहे. परंतू मराठी वृत्तपत्रसृष्टिच्या इतिहासामध्ये निळकंठ खाडिलकरांची सुवर्णाक्षरात नोंद झालेली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या छोट्याशा गावातून जगण्यासाठी तोंडी लावण्यापुरती वाचन आणि लिखाण करण्यासाठी शाळा शिकलेला एक मुलगा मुंबईला जातो. सुरुवातीला पडेल ती कामे करुन उदरनिर्वाह करतो आणि त्यातूनच वृत्तपत्र वितरणाची कामे करतो. हळूहळू स्वत:ची वृत्तपत्र एजन्सी सुरु करतो आणि अल्पावधीतच आपले नाव मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रांच्या वितरणात मोठे करतो. ते नाव म्हणजे मुरलीधर अनंता शिंगोटे. गिरगावात त्या काळात जुन्नरच्याच दांगट नावाच्या व्यक्तीची वितरण एजन्सी होती. या दोन जुन्नरकरांनी त्या काळात आख्ख्या मुंबईची वितरण व्यवस्था ताब्यात घेतली होती. दक्षिण भारतातील इनाडू, गुजरातमधील गुजरात समाचार, संदेश यांसह डझनभर वृत्तपत्रांची वितरणाची एजन्सी ताब्यात असलेल्या मुरलीधर शिंगोटेंनी 80-90 च्या दशकात महाराष्ट्रातील वितरण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता.
वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी ताब्यात असलेल्या शिंगोटेंना आपलेही एखादे दैनिक असावे याबाबतचा विचार मनात रुंजी घालू लागला. त्यानुसार त्यांनी 1999-2000 च्या दरम्यान मुंबई चौफेर हे टॅब्लॉईड सायंदैनिक सुरु केले. त्यानंतर आपला वार्ताहर, पुण्यनगरी, हिंदमाता, कर्नाटक मल्ला ही दैनिके कोणतेही भांडवल पाठिशी नसताना फक्त वाचकांच्या जोरावर शिंगोटेंनी सुरु केली. यातील पुण्यनगरी दैनिक महाराष्ट्रातील वृत्तपत्र क्षेत्रातील मैलाचे दगड ठरलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ याठिकाणी दैनिक पुण्यनगरीच्या जिल्हावार आवृत्त्या आहेत. खपाच्या दृष्टिकोनातून पुण्यनगरीने आपला स्वतंत्र असा वाचकवर्ग तयार केला आहे. 2002-3 ला सुरु झालेल्या या दैनिकाने अल्पावधीतच यश संपादन केले, हे केवळ मुरलीधर शिंगोटे यांच्या अनुभवामुळेच. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा नियम शिंगोटे यांनी तंतोतंत पाळला. एवढ्या मोठ्या वृत्तपत्राचे मालक असुनसुद्धा शिंगोटे यांनी खोट्या व बेगडी प्रसिद्धीला कधीच थारा दिला नाही. भूक लागली तर प्रसंगी वडापावच्या गाडीवर थांबून वडापाव खाणारा हा माणूस. कुठल्याही भांडवलदारी शेठजी-भटजींची हुजूरेगिरी न करता शिंगोटेंनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा मराठी वृत्तपत्रसृष्टिमध्ये उमटवलेला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टित नवनव्या संकल्पना आणि विक्रम प्रस्थापित करणारे अग्रलेखाचे बादशाह निळकंठ खाडिलकर आणि पुण्यनगरी वृत्तसमुहाचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचा वाढदिवस योगायोगाने 6 एप्रिल या एकाच दिवशी असतो. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा छोटासा आढावा.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |