स्त्री चे स्त्रियत्व तिच्या स्त्रीयात्वाने नाही तर, तिच्या कर्माने प्रगल्भ होत असते. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून स्त्रीचा सृष्टिला मूर्त स्वरुप देण्यात महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रुग्णांची सुश्रुषा करणार्या मदर टेरेसा या महिलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. अनेक ज्ञात-अज्ञात महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी केली आहे. आणि करतही आहेत. काही महिला मात्र त्याला अपवाद ठरतात. ‘माता न तू वैरिणी’ याप्रमाणे अनेक माता आपल्या गर्भात वाढत असलेल्या कळ्यांना नकळतच खुडून टाकतात, अशाही स्त्रित्वाच्या बाजू आपल्यासमोर वेळोवेळी येत असतात. ‘लेविश लाईफस्टाईल’ जगण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात वावरणार्या इंद्राणी मुखर्जीने महत्त्वकांक्षेपोटी आपल्या पोटच्या मुलीचा खून केल्याची घटना समोर आली होती. या आणि अशा अनेक घटना रोजच आपल्या अवतीभोवती घडत असतात.
स्त्री-पुरुष समानतेचा ढोल सध्या बडवला जातोय. पण अनेक प्रकरणांमध्ये स्त्रियांनी पुरुषांबाबत 'कोती मानसिकता ठेवल्यामुळे अनेकदा पुरुषांना अडचणींना सामोरे जावे लागते. सध्या 'टेक्निकली रेप' नावाचा 'ट्रेंड' जोर धरु लागलाय. लग्नाचे, नोकरीचे, पैशाचे अमिष दाखवून वर्षानुवर्षानंतर बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. याला खरंच अत्याचार म्हणायचा काय? खरेतर याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले पाहिजे. परवा नुकतेच समलैंगिकता, विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शेवटी इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंच्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या पुस्तकांचा आदर्श घ्यायचा की, सवोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र सध्या स्त्रियांबाबतचे अनेक प्रश्न जटील बनू लागले आहेत. आपल्या न्यायसंस्थेमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना झुकते माप दिले जाते. परंतू या मापातही स्त्रियांकडून पाप केले जात आहे. अशाच काहीशा घटना गेल्या काही महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यात घडू लागल्या आहेत.
स्त्री असण्याचा ऍडव्हांटेज कोण कसा घेईल, हे सांगू शकत नाही. कराड येथील एका प्रथितयश व्यवसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित करुन, त्याचे चित्रीकरण करुन त्याला लाखो रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती. प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या व्यवसायिकाने विष प्राशन करुन आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. परंतू खंडणीपोटी दिलेला धनादेश न वठल्यामुळे त्या संबंधित महिलांचे बिंग फुटले होते. त्यामुळे महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष असणार्या त्या महिलेवर कराड शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्या प्रकरणात जिल्हा परिषदेतील एका अधिकार्याला कोणाची तरी सुपारी घेवून त्याच्यावर बलात्काराचे खोटे-नाटे आरोप करुन त्याला घरी बसविण्याचा प्रकार उघडकीस आला होता. असे अनेक प्रकार जिल्ह्यात नेहमीचेच झाले आहेत. ताई-माई-अक्कांच्या महिला ब्रिगेडची भूछत्रे जिल्ह्यात उगवू लागली आहेत. नवर्याला मांजर बनवून विविध पक्षांचे, संघटनांचे लेबल लावून अनेक महिलांनी खंडणी, ब्लॅकमेलिंग, भ्रष्टाचार असे अनेक उद्योग करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अशा महिलांचे कारनामे उजेडात येवू लागले आहेत. एखाद्या इज्जतदार पुरुषाला नादी लावायचे, नंतर त्याला ब्लॅकमेल करायचे. पदरात काही पडले तर पडले. नाहीतर त्याच्यावर लैंगिक शोषनाचा आरोप करुन त्याला बदनाम करायचे, हा एककलमी कार्यक्रम सध्या सुरु आहे.
२००५ साली योगेश भारद्वाज दिग्दर्शित ‘शबनम मौसी’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. माझे जुने सहकारी सुदेश भोसले (गायक नव्हे) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यामुळे या चित्रपट निर्मितीवेळी काही घडामोडी जवळून बघता आल्या. शबनम मौसीबरोबर संवाद साधता आला. शबनम मौसी कोण, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. एका मराठी पोलीस अधिकार्याच्या कुटूंबात जन्म घेतलेला चंद्रप्रकाश या मुलाला किशोरवयात आल्यानंतर आपण पुरुषही नाही आणि स्त्री ही नाही, याची जाणीव होते. जन्मताच पुरुषी असलेले नाव बदलून शबनम नाव धारण केलेल्या एका किन्नराच्या आयुष्यावर 'शबनम मौसी 'हा चित्रपट आधारित होता. हिंदीतील दिग्गज अभिनेता आशुतोष राणाने शबनम मौसीची भूमिका या चित्रपटात पार पाडली. तरुणपणातील काही दिवस मुंबईमध्ये घालवल्यानंतर शबनमने मध्यप्रदेशातील शहडोल-अनुपपूर जिल्ह्यातील सोहागपूर येथून विधानसभा सदस्यत्वाचा अर्ज भरला व देशातील पहिला तृतीयपंथी आमदार म्हणून शबनम मौसी निवडून आली. 1998 ते 2003 पर्यंत शबनम मौसीने सोहागपूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. 1994 साली तृतीयपंथियांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत 'शबनम मौसी' सोडल्यास एकही तृतीयपंथी लोकनियुक्त आमदार अथवा खासदार होवू शकला नाही. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर ना पुरुष, ना स्त्री असतानाही शबनम मौसी आमदार झाली. कारण जिच्यावर विश्वास ठेवून लाखो लोकांनी शबनम मौसीला मतदान केले, ते केवळ किन्नर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून, केवळ टाळ्या कुटून हाय-हाय म्हणून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, हे शबनम मौसीने ताडले होते.
पुरुषी मानसिकता जशी स्त्रियांबाबत कठोर असते, तशीच स्त्रियांची मानसिकताही पुरुषांबाबत कठोर असते, असे 'शबनम मौसी' नेहमी म्हणते. आपल्या कार्यकर्तृत्वाने आमदार झालेल्या शबनम मौसीचा आदर्श ताई-माई-अक्का ब्रिगेड चालविणार्या रणरागिनींनी घ्यायला हवा. तोडपाणी करुन जास्त दिवस घर चालत नाही. एखाद्या पुरुषाचे घर उद्ध्वस्त करुन आपलेही घर जास्त दिवस सुरक्षित राहू शकत नाही. विविध पक्षांचे व सामाजिक संघटनांचे लेबल लावून सुरु असलेल्या काही महिलांच्या बेबंदशाहीबाबत आता खरेतर आवाज उठवायला हवा. परवा भ्रष्टाचाराच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली म्हणून अशाच मानसिकतेतल्या काही महिलांनी ‘सातारा टुडे’च्या कार्यालयात घुसून महिलांच्या संस्कृतीला न शोभणार्या भाषेत कार्यालयातील कर्मचार्यांना शिवीगाळ केली होती. सातारच्या पत्रकारितेतील हा खरेतर काळा दिवस. या महिलांना त्यांच्या कर्माची फळं न्यायसंस्था शेवटी त्यांना देईलच. मात्र, पुरुष व स्त्री नसतानाही आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आमदार झालेल्या शबनम मौसी आणि कर्तृत्व असतानाही ‘तोड्या-माड्या’त आपले आयुष्य कंठणार्या या सातार्यातील ‘मावश्या’ कुठे, हा प्रश्न मात्र या निमित्ताने प्रत्येकाच्याच मनात रुंजी घालू लागला आहे.
- संग्राम निकाळजे
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |