03:13am | Feb 23, 2020 |
फलटण : महा विकास आघाडीच्या सरकारने नीरा देवघर धरणाचे पाणी निरा डाव्या कालव्याद्वारे बारामतीकडे 55 टक्के वळविण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज नीरा-देवघर संघर्ष समितीच्या वतीने प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच काहीकाळ फलटण बंद ठेवण्यात आले. आक्रमक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नीरा देवघर संघर्ष समिती तर्फे अॅडव्होकेट नरसिंह निकम यांच्याा नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली याा मोर्चामध्ये नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर,बजरंग गावडे, तुकाराम शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, आमिरभाई शेख, सिराजभाई शेख, अमित रणवरे, अभिजित निंबाळकर, डॉ प्रवीण आगवणे, उदय मांढरे, बबलू कदम, दत्तराज फडतरे, अमित रणवरे, वसीम इनामदार, राजेश हेंद्रे, माऊली सावंत, वसीम मनेर आदी सहभागी झाले होते.
हा मोर्चा प्रांत कार्यालयाच्या गेटवर अडविण्यात आल्यानंतर उपस्थितांसमोर बोलताना नरसिंह निकम म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाने नुकताच निरा देवघर, धरणातील पाणी वाटपासंबंधीत निर्णय घेवून निरा देवघर धरणातील 55 टक्के पाणी बारामती, इंदापूर या तालुक्यांना निरा डावा कालव्याने तर निरा उजवा कालव्याने उर्वरित 45 टक्के पाणी खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक हा निर्णय खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील दुष्काळी जनतेवर घोर अन्याय करणारा आहे. निरा देवघर धरण प्रकल्पास सन 1984 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. ही मान्यता मिळताना हे धरण खंडाळा तालुक्यातील 57 गावे, फलटण तालुक्यातील 51 गावे व माळशिरस तालुक्यातील 16 गावे या 3 तालुक्यातील दुष्काळी गावांसाठीच धरण बांधण्याचे प्रयोजन होते. धरणातील पाण्यावर या 3 तालुक्यातीलच दुष्काळी जनतेचा कायदेशीर हक्क व अधिकार आहे हा हक्क आम्ही हिरावू देणार नाही.
या धरणाचे काम सन 2000 साली पुर्ण होवून 12 ढ.च.उ. पाणीसाठा असणारे धरणाचे बांधकाम पुर्ण झाले. परंतु त्यानंतर महाराष्ट्रातून काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार 15 वर्षे असूनसुध्दा त्यांनी कालव्याची कामे न केल्यामुळे या 3 तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील शेतकर्यांच्या शिवारापर्यंत पाणी येवू शकले नाही. आजही या 3 तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. बारामतीला जाणारे पाणी ताबडतोब थांबवा, अन्यथा या पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलनाची धार वाढवावी लागेल, असा इशारा निकम यांनी देताना पवार काका पुतणे हे दुष्काळी तालुक्याचे मुख्य शत्रू असल्याचा आरोप केला.
युती शासनाच्या काळात बारामतीला जाणार्या पाणी संदर्भात माढा लोकसभा मतदार संघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आठ महिन्यापूर्वी तात्कालिन मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेवून बारामतीला जाणारे पाणी बंद केले होते. हे संपूर्ण 100 टक्के पाणी धरणाचे कालवे होईपर्यंत निरा उजवा कालव्याने खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यांना देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. परंतु केवळ सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचे व देशाचे नेते म्हणवणार्यांनी संकुचित बुध्दीने केवळ बारामतीसाठी पुन्हा या पाण्यावर भर दिवसा दरोडा टाकला आहे. त्यामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपुर या तालुक्यातील दुष्काळी जनता पेटून उठली आहे. शासनाने घेतलेला निर्णय हा दुष्काळी जनतेवर शेतकर्यांवर तसेच या 5 तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारा आहे. आमच्या हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत बारामतीला जाऊ देणार नाही. लाल दिव्यासाठी फलटणचे पाणी विकणार्या विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. याबाबतचे निवेदन प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांना देण्यात आले.
मोर्चातील कार्यकर्त्यांनी बारामतीला पाणी दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना खा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यापुढील काळात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी नरसिंह निकम यांनी तातडीने उच्च न्यायालयात बारामतीला जाणार्या पाण्याबाबत याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |