मुंबई : आशिया चषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा सामना पुन्हा एकदा भारताने पाकवर ९ गडी राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला. यापूर्वी आशिया चषकात १९ तारखेला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर आठ गडी राखुन विजय मिळवला होता. आशिया चषकात झालेल्या या दोन सामन्यांनी भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी सुखद धक्का असला तरी आजचा दिवस विशेष आहे. का तर..
आजच्या दिवशीच म्हणजेच २४ ऑगस्ट २००७ मध्ये भारताने झालेल्या टी-20 सामन्यात पाकचा पराभव करून टी-20 विश्वचषक मिळवला होता. त्यामुळे हा सप्टेंबर महिना पाकसाठी भूतकाळही कटू आठवणींचा आणि वर्तमानही घोर निराशा करणारा.
दक्षिण अफ्रिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या विश्वचषकासाठी भारताच्या युवा संघाची धुरा कर्णधार पदाचा अनुभव नसलेल्या महेंद्र सिंह धोनी याच्या हाती होती. यावेळी बीसीसीआने विरेंद्र सेहवाग, युवाराज सिंग, गौतम गंभीर यांना डावलून धोनीकडे नेतृत्व दिले होते. या विश्वचषकात भारताने आश्चर्यकारकरित्या कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. या फायनलमध्ये भारताच्या या नवख्या संघाचा सामना मिसबाच्या पाकिस्तानशी होणार होता. या आधी भारत पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाच्या इतिहासात कधीही फायनल मध्ये टक्कर झाली नव्हती. त्यामुळे या समन्यात नवख्या भारतीय संघावर चांगलेच दडपण आले असणार.
या हायव्होल्टेज टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यादरम्यान सलामीवीर गौतम गंभीरच्या ५४ चेंडूत ७५ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर २० ओवरमध्ये १५७ धावा काढून एक आव्हानात्मक धावसंख्या पाकसमोर ठेवली होती. त्यानंतर फलंदजीसाठी मैदानात उतरलेल्या पाक संघाला पहिल्या ५ षटकात ३ धक्के देण्यात आर.पी. सिंगने मोलाचे योगदान दिले होते. तसेच डावखुरा मध्यमगती गोलंदाजत इरफान पठानने ४ षटकात १६ धावा देत पाकच्या ३ विकेट घेऊन भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली.
पाकचा फलंदाज मिस्बाने पाकला दिलासा दिला होता पण....
सामन्यामध्ये विकेटच्या हॅट्रीकमुळे पाकवर दडपण आले होते मात्र, मिसबाह-उल-हकने पाकला थोडा दिलासा दिला. पाकला सामना जिंकण्यासाठी केवळ ५४ धावांची गरज होती. यापूर्वी भारताने पाकच्या सात खेळाडूंना तंबूत पाठवले होते. सामन्यादरम्यान हरभजनच्या गोलंदाजीवर मिस्बाने तीन षटकार मारून पाकला दिलासा दिला होता. त्यावेळी १८ चेंडूत पाकला ३५ धावांची गरज होती. भारताचा खेळाडू श्रीसंतच्या गोलंदाजीवर पाकने दोन षटकार मारून भारतावर दडपण आणले होते. मात्र, श्रीसंतने शेवटच्या चेंडूत पाकचा फलंदाज तनवीरला बाद करून जमलेली जोडी फोडली. यामुळे पाकचा नवीन फलंदाज फलंदाजीला आला आणि मिस्बावर एकट्याने धावा करण्याचे दडपण आले.
शेवटच्या ओवरमध्ये भारताच विजय
शेवटच्या ओवरमध्ये पाकला १३ धावांची गरज होती आणि भारताला विजय मिळवण्यासाठी केवळ एका विकेटची गरज होती. या रंगलेल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने युवा खेळाडू जोगिंदर शर्माला गोलंदाजी करण्यासाठी निवडले आणि सर्वांना शॉक दिला. शर्माने केलेल्या गोलंदाजीमध्ये पाकला धावा काढणे जमलेच नाही. त्यानंतर मिस्बाहने दोन षटकार मारून पाकला दिलासा दिला होता. त्यावेळी पाकला चार चेंडूंवर सहा धावांची गरज असल्याने मिस्बाने पुन्हा एकदा षटकार मारण्यासाठी स्कूप शॉट खेळला पण चेंडू सिमापार जाण्याऐवजी श्रीसंतच्या हातात विासवाला. भारताने पहिल्यांदाच एखाद्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये पाकिसतानला पराभवाची धूळ चारत इतिहास रचला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |