सातारा : कडक उन्हाळ्याचा तीव्र अनुभव घेतल्यानंतर पावसाळ्याने सातारकरांना चांगलाच दिलासा दिला आहे. पण या पहिल्या पावसाळ्यात जावली तालुक्यातील रायगाव येथील महामार्गावरील जोडरस्त्यात पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. माण तालुक्यातील डोंगराळ वारुगडमध्ये वादळ वार्यासह आलेल्या पावसाने आठ ठिकाणी पडझड झाली आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामाला व्यत्यय नको म्हणून नजिकच्या गावातील लोकांच्या रहदारीसाठी जोड रस्ते निर्माण करुन पूल बांधण्यात आले आहेत. पहिल्या पावसातच रायगाव महामार्गानजिक असलेल्या जोड रस्त्याच्या पुलाखाली सुमारे चार फूट पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे मोरघर, दरे, पवारवाडी, महिगाव, सायगाव, प्रभुचीवाडी, महामुलकरवाडी, मालुसरेवाडी, रायगाव या परिसरातील लोकांना महामार्गावरुन सातारा-कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी आनेवाडीमार्गे उलटा प्रवास करावा लागत आहे. या पुलाचे पाणी किमान आठवडाभर तरी निघणार नसून याठिकाणी साचलेल्या चिखलामुळे रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी रायगावचे अजित निकम व संदीप गायकवाड यांनी केली आहे. तर दुसरी घटना माण तालुक्यातील वारुगड याठिकाणी घडली असून वादळ वार्याने नव्याने बांधण्यात आलेल्या विशाल जगताप व प्रमोद जगताप यांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. तर जुने घर जमीनदोस्त झाले आहे. तसेच खंडाची वाडी येथील लक्ष्मी मंदिराच्या मंडपाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गराडाची वाडी, श्रीपालवन या ठिकाणीही पत्रे उडून भिंती खचल्या आहेत. सध्या वारुगड सजाचे तलाठी मोहन मोहिते व ग्रामसेवक आर. डी. गौड हे पंचनाम्याचे काम करीत असून सध्यातरी चार लाखाचे नुकसान झाले असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. वारुगड हा प्राचीन किल्ला असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पण त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने सध्या या किल्ल्याचे भग्नावशेष शिल्लक राहिले आहेत. मोठ्या प्रमाणात वादळ, पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याची संभावना आहे. त्यामुळे पुरातन विभागाने या किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी आ. डॉ. दिलीप येळगांवकर यांनी केली आहे. तसेच शेतकर्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |