मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार आणि सदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी गावोगावी आरोग्य चाचणी केंद्रे उभी करून एक रुपयात हृदयरोग आणि मधुमेह चाचणी केली जाणार, अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील शिवसेनेच्या ऐतिहासिक दसऱ्या मेळाव्यातून पाडला.
“रिकामी ताटं वाजवण्याची वेळ आता गेली. चांगल्या जेवणाची थाळी 10 रुपयात उपलब्ध करुन देणार म्हणजे देणार. हे करावंच लागणार नाहीतर आपण सत्तेत असल्याचा उपयोग काय?” असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला एवढंच नाही तर पहिल्या घरगुती विजेच्या वापराचा दर 300 युनिटच्या विजेचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार अशीही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून उद्धव यांनी निशाणा साधला. हे मगरीच्या डोळ्यातील अश्रू म्हणायचे का?, असा तिरकस सवाल उद्धव यांनी केला. अजित पवार आता शेती बरी म्हणतात. त्याप्रमाणे शेती करायला हरकत नाही पण धरणात पाणी नसेल तर काय करायचे?, आठवा तुम्ही सत्तेत असताना काय बोलला होता. शेतकरी पाण्यासाठी रडत होता. धरणं कोरडी पडली होती आणि तुम्ही त्यांना कोणतं पाणी दाखवलं होतं, असं विचारताना आज तुमच्या कर्मानेच तुमच्या डोळ्यात पाणी आले आहे, अशा शब्दांत उद्धव यानी तोफ डागली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकून गेले आहेत आणि भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे विधान काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज सोलापुरात केले. त्यावर उद्धव यांनी जोरदार टोलेबाजी केली. तुम्ही खाऊन खाऊन थकला आहात आणि म्हणूनच तुम्हाला एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तरीही एकत्र आल्यावर तुमचा नेता कोण असणार हे आधी ठरवा. ज्यांच्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला त्या सोनिया गांधींचं नेतृत्व तुम्ही स्वीकारणार आहात का? की पुन्हा एकत्र येऊन भांडत बसणार, असा खोचक सवाल उद्धव यांनी केला. इतक्यात थकू नका, २४ तारखेला आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने राहा, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |