05:33pm | Mar 04, 2019 |
सातारा : सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या कामाच्या पद्धतीमुळे जिल्हाभरात पोलीसी दरारा निर्माण केला होता. फक्त कागदानेच भल्याभल्यांना गारद केले होते. हातात पिस्तुल घेवून रस्त्यावर उतरले म्हणजे पोलिसिंग नव्हे, असे संदीप पाटील यांचे ठाम मत होते. मात्र, तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची प्रशासकीय बदल्यांमध्ये पुणे ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर उस्मानाबादहुन पंकज देशमुख यांची सातारा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. संदीप पाटील यांनी जिल्ह्यात निर्माण केलेला पोलिसिंगचा धडाका जैसे थे ठेवण्याची मोठी जबाबदारी पंकज देशमुख यांच्यावर आली होती. मात्र पंकज देशमुख यांनी जिल्हावासियांचाच नव्हे तर चक्क पोलिसांचा भ्रमनिरास केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलिसिंग केवळ सातच महिन्यांमध्ये ढेपाळले. कधी-कधी तर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले. असे असताना सातारा जिल्ह्याच्या इतिहासात सुमारे पंचवीस वर्षात न घडणारी घटना घडली व केवळ सात महिन्यांच्या कार्यकालातच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची उचलबांगडी झाली. सातारा जिल्हा हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गुन्हेगारीच्या बाबतीत अगदीच नगण्य. परंतू एखादी अशी घटना घडते की राष्ट्रीय माध्यमांनाही त्याची दखल घ्यावी लागते. कराड, फलटण, सातारा ही गुन्हेगारांच्या बाबतीत संवेदनशील शहरे समजली जातात. या तिनही शहरांना दाबले तरच जिल्ह्यात सर्वकाही आलबेल, अशी सामान्यपणे पोलिसांची भावना असते. येणारा पोलीस अधीक्षकही या तिनही शहरांवर लक्ष केंद्रित करुन जिल्ह्याचा गाडा हाकत असतो.
सातारा जिल्ह्यात रसातळाला गेलेल्या पोलिसिंगची घडी बसविण्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक के एम एम प्रसन्ना यांनी यश मिळवले. त्यानंतर आलेल्या डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील या दोघांनीही आपल्या कर्तृत्वाला साजेसे काम करीत पोलिसी झेंडा या सातार्यात फडकवला होता. जिल्ह्यातील व्हाईट कॉलर गुंडगिरी मोडून काढण्यात या दोघांनीही यश मिळवले होते. संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील अवैध खासगी सावकारी मोडित काढून अनेक खासगी अवैध सावकारांवर मोक्कान्वये कारवाई करुन जेलची हवा खायला लावली होती. सुमारे दोनशेपेक्षा अधिक मोक्का आणि तडीपारीच्या कारवाया करुन संदीप पाटलांनी सातारा जिल्ह्यात औषधालाही गुन्हेगार शिल्लक ठेवलेला नव्हता. असे असताना सुमारे सात महिन्यांपूर्वी संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर उस्मानाबाद येथून पंकज देशमुख यांची बदली झाली. मात्र पंकज देशमुख यांनी कार्यभार स्विकारण्याआधीच त्यांच्याबद्दल उलटसुलट अफवा सोशल मिडियावर व्हायरल होत होत्या. अनेकांनी त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ‘नो कमेंट्स’ असे म्हणत त्या विषयाला बगल दिली होती. कामातूनच काय ते सिद्ध करुन दाखवेन, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र, पंकज देशमुख यांच्या कार्यकालात ठोस अशा कारवाया झाल्या नाहीत. कनिष्ठ अधिकार्यांना फ्री हँड न दिल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास एकतर लागला नाही, आणि जो लागला तो अतिशय संथगतीने लागला. त्यामुळे पोलीस दलातच कारभार्यांच्या विरोधात प्रक्षुब्धता निर्माण झाली होती. फलटण येथील दिगंबर आगवणे प्रकरणातही पंकज देशमुख यांनी पारदर्शी भूमिका न घेतल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.
एकूणच पंकज देशमुख यांची सातारा जिल्ह्यातील कारकीर्द म्हणावी अशी समाधानकारक नव्हती. शेवटी सात महिन्यांत ते करणार तरी काय? आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ही बदल्या झाल्याचे ‘वरुन’ सांगितले जाते. परंतू पंचवीस वर्षाच्या इतिहासात कार्यकाल न पूर्ण होताच बदली झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्यासह सामान्य लोकांच्या मनातही ही बदली कशी झाली, याबद्दलची उत्सुकता दाटून आली आहे. जो-तो आपापल्या पद्धतीने या बदलीविषयी विश्लेषण करीत आहे. याबाबत अनेकांची मतमतांतरे जरुर आहेत, परंतू ठोस अशी कारणे जी निदर्शनास येतात, ती अशी आहेत- 1) जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा सन्मान न करणे. मग तो सत्तेतील असो अथवा विरोधी पक्षातील असो. 2) आपली भूमिका स्पष्ट न करणे. 3) पत्रकारांशी समन्वयाचा अभाव. 4) कनिष्ठ अधिकार्यांना विश्वासात न घेणे. काम करीत असताना त्यांना फ्री हँड न देणे. 5) कानात सांगितलेल्या सानगी-वानगी वर विश्वास ठेवणे. 6) अवैध धंद्यांबाबत कडक धोरण न अवलंबणे. 7) पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना त्यांची बाजू न ऐकता थेट निलंबित करणे. (अशी चर्चा पोलीस दलात आहे)
या आणि अशा अनेक बाबी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीसाठी कारणीभूत ठरल्या असाव्यात, असे आडाखे अनेकांनी बांधलेले आहेत. अनेकांनी तर सातारच्या दोन्ही महाराजांना घाबरुन (?) निवडणुकीच्या अगोदर बदली करुन घेतली, अशा चर्चाही सोशल मिडियावर झडत होत्या. शेवटी त्या चर्चाच असतात. त्यांना महत्त्व नसते. परंतू पंकज देशमुख यांच्या अकाली बदलीमुळे अनेक प्रश्नांचे मोहोळ उठलेले आहे. नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुणे शहरात उपायुक्त असताना त्यांनी केलेल्या विधायक कार्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. शेवटी शहरातील एका झोनमध्ये काम करणे वेगळे आणि संपूर्ण जिल्ह्याचा डोलारा सांभाळणे यात खूपच तफावत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक मीरा बोरवणकर यांनी आपल्या कामाच्या धडाक्यामुळे सातारा जिल्हावासियांची मने जिंकली होती. एक महिला असुनसूद्धा शंभर पुरुषांना भारी पडेल, असे काम त्यांनी सातारा जिल्ह्यात करुन दाखवून मीरा बोरवणकर हे नाव सातारा जिल्ह्याच्या इतिहासात कोरलेले आहे. सुमारे वीस वर्षानंतर एका महिला पोलीस अधीक्षकाला सातारा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळालेली आहे. तेजस्वी सातपुते या आपल्या नावाप्रमाणेच जिल्ह्यात तेजस्वी काम करतील. तत्कालीन पोलीस अधीक्षक के एम एम प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील या त्रिकुटांनी सातारा जिल्ह्यात प्रस्थापित केलेल्या पोलिसिंगचा गाडा हाकण्याची जबाबदारी तेजस्वी सातपुते यांच्यावर आलेली आहे. कोणताही अधिकारी वाईट नसतो. पंकज देशमुखही वाईट नाहीत. परंतू त्यांना काम करण्यास कमी कालावधी मिळाला. त्यामुळे त्यांना सातार्यात स्वत:ला सिद्ध करता आले नाही. ही बाजूही आपण समजून घेतली पाहिजे.
देशमुखांच्या ‘त्या’ एस्कॉर्टची चर्चा
पंकज देशमुख यांनी सातारा पोलीस अधीक्षकपदाचा चार्ज घेतल्यानंतर सातारकरांना अभूतपूर्व असे चित्र पहावयास मिळाले. पोलीस अधीक्षकांच्या गाडीबरोबर 8-10 कमांडोंची जिप्सीही त्यांच्या पाठोपाठ एस्कॉर्ट करीत असते. या चित्रामुळे ‘ही काय भानगड?’ असे अनेक सातारकर विचारत होते. पूर्वी पोलीस अधीक्षकांच्या गाडीमध्ये एक आरटीपीसी कम सुरक्षारक्षक व एक चालक सोडल्यास कोणताही कर्मचारी नसायचा. परंतू पंकज देशमुख यांनी हा पायंडा मोडित काढत सुमारे 12-13 पोलीस कर्मचार्यांचा गोतावळा जाईल तिकडे सोबत ठेवला होता. त्यामुळे अनेकांना याबाबत आश्चर्य वाटत होते. एखाद्या छोट्या पोलीस ठाण्याला जेवढे मनुष्यबळ लागते, तेवढे मनुष्यबळ घेवून पंकज देशमुख फिरत होते. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता असूनही स्वत: एसपी एवढे पोलीसबळ घेवून का फिरतात? अशा चर्चा पोलीस अधिकार्यांमध्ये झडत होत्या. गडचिरोलीवरुन बदलून आलेल्या पोलीस अधीक्षकांबाबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण समजू शकतो. परंतू एसपी देशमुख यांनी एवढा लवाजमा बरोबर का ठेवला होता? याचे उत्तर अजूनतरी अनुत्तरीत आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |