09:25pm | Mar 29, 2019 |
कराड : विरोधक कॉलर उडवण्याला फारच महत्व देतात, मी मात्र असल्या ‘स्टाईल’ला अजिबात महत्व देत नाही. तर मतदार संघातील प्रलंबीत प्रश्न सोडवण्याला मी महत्व देतो त्यामुळे या असल्या गोष्टी माझ्यासाठी नगण्य आहेत. अशा शब्दात सातारा लोकसभा मतदार संघाचे शिवसेना-भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्री.छ.उदयनराजे भोसले यांची आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खिल्ली उडवली. दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांचे मी शिवसेना प्रवेश केल्यानंतर मला अभिनंदनाचे फोन आले. असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला.
यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, भाजपा नेते मनोज घोरपडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, पुरूषोत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. त्याकडे विद्यमान खासदारांचे 10 वर्षे दुर्लक्ष झाले आहे. सातारा येथील मेडिकल कॉलेज, सातारा एमआयडीसीमधील बंद पडलेले उद्योग, जिल्ह्यातील स्वच्छ पाणी, घनकचरा, पर्यटन असे अनेक प्रश्न या मतदार संघात असताना त्याकडे लक्ष न देता विद्यमान खासदार टोलनाका व त्यांच्या दहशतीच्या जोरावर जिल्ह्यात राजकारण करत आहेत. जिल्ह्यातील त्यांची दहशत मोडून काढणार असून आपण जिल्ह्यातील विकासाला प्रामुख्याने महत्व देत निवडणुकीत उतरलो आहे.
जशी राज्यात माथाडी कामगारांची ताकद मोठी आहे. तशी आपल्या जिल्ह्यात देखील माथाडीचे मोठे जाळे आहे. आपल्यातील एक सामान्य कामगार कुटुंबातील एखादा खासदार होवून दिल्लीत जात आहे. हे पाहून सर्वच माथाडी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगत. शिवसैनिकांच्या व भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या देखील पाठींब्यावर मी या मतदार संघातून नक्की निवडणून येत या जिल्ह्यात आत्ता परिवर्तन अटळ असल्याची खात्री पाटील यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे व माझे वडील यांची खास मैत्री होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मला आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष करून ताकद दिली. मंत्री केले. मात्र या जिल्ह्यात माथाडी संख्या पाहता येथे मिच उभं रहाव अशा विचाराने व फडणवीस, उध्दवसाहेब यांच्या एक विचाराने मला मनापासून सेनेत पाठवून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. हा समंजसपणा युतीने दाखवला. जिल्ह्याचा विकास हाच या मागचा हेतू आहे. जिल्ह्यातील जनता मतदार संघातील खुंटलेला विकास, विद्यमान खासदारांची दहशत याला कंटाळली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात परिवर्तन अटळ असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
देशात नरेंद्र आणि जिल्ह्यातही नरेंद्रच...
यावेळी बानुगडे पाटील म्हणाले, आता जिल्ह्यात परिवर्तन होणार हे निश्चित आहे. जिल्ह्यात माथाडी व नरेंद्र पाटील यांची ताकद पाहता त्यांना सेनेत घेवून निवडणूकीत उभे करण्याचा निर्णय झाला. पुरूषोत्तम जाधव यांच्यासह इच्छुकांची साथ मिळाली. त्यामुळे आता जस देशात नरेंद्र तस जिल्ह्यातपण नरेंद्रचेच वारे आता यशस्वी वाहू लागल्याने येथे परिवर्तन अटळ आहे. लोकांची नाडी नरेंद्र पाटील जाणतात. कॉंग्रेसी घोटाळ्याला जनता कंटाळली आहे. तर आमच्या नवनवीन योजनांचे जनता स्वागत करीत आहे. असे चित्र सर्वत्रच असल्याने आपल्या जिल्ह्यातून युतीचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना आपल्या मतदार संघाला विकासाभिमुख करण्याकरीता लोकसभेत पाठवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
...म्हणून राष्ट्रवादी सोडली
मी राष्ट्रवादीचा विधानपरिषदेचा आमदार म्हणून कार्यरत असताना माथाडींचे अनेक प्रश्न राष्ट्रवादीकडून सुटतील अशी आशा होती. ती फोल ठरली. तसेच 2007 च्या दंगलीदरम्यान त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या गृहखात्याने दंगलखोरांना जरब बसवली नाही. राष्ट्रवादीकडून अशा अनेक चुका झाल्याने कोणतीही मदत त्यांच्याकडून होत नाही. हे कळल्यानंतर आपण राष्ट्रवादी सोडली. दरम्यान, सातारा जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही माथाडींना कोणत्याही न्याय देण्याबाबतीत उदासीनताच दाखवली. मात्र विदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांनी त्या ठिकाणी एखादी माथाडींची युनियनही नसताना माथाडींबाबत वारंवार न्यायाची भुमिका घेतली. यामुळे आपण राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. मराठा समाज व माथाडी कामगार यांच्यासाठी आपली कायम व प्राधान्याने सर्वप्रथम भुमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उंब्रज-आनेवाडी टोलनाका फ्री करणार
उंब्रज व आनेवाडी टोलनाक्याच्या नावावर या टोलनाक्यानजीक असणार्या जवळपासच्या गावांची लुट सुरू आहे. रोज प्रवाशांना येथे त्रास झाल्याच्या तक्रारी येतात. गुंडगीरी चालते. हे आपण मोडीत काढणार असून टोलनाक्यानजीक असणारी सर्व जवळपासची गावे टोलफ्री करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |