महाबळेश्वर : भिलारला संमेलन व्हावे ही मनापासून इच्छा आहे. आता हा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखांनी आणि तसेच महामंडळाने घ्यावा, शासन त्याला पूर्ण मदत करेल, किंबहुना शासन साहित्य संमेलनाला मदत करतच असते अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक तथा भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. याला मात्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेने ठाम विरोध दर्शविला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलारला पुस्तकांचे गाव वसवुन एक वर्ष झाले या निमित्त त्यांनी दिव्य मराठीशी विशेष संवाद साधला. अखिल भारतीय मराठी महामंडळातर्फे होणारे साहित्य संमेलन भिलारला घ्यावे असे निमंत्रण वजा प्रस्ताव तावडे यांनी बडोदा येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनाची भाषणातून मांडला होता. त्यावर तावडे म्हणाले की, आता पुस्तकांचे गाव छान वसले आहे. लोकांनाही माहिती झाले आज, त्यामुळे हे पुढील साहित्य संमेलनाची भिलारला घ्यावे, याची संपूर्ण जबादबारी राज्य शासन उचलेल. पण, या प्रस्तावानंतर मात्र साहित्यिकांमध्ये उलट-सुलट चारचा रंगली. शासनाने संमेलन आयोजित केले तर शासनाचा वरचष्मा राहील अशी एक मतप्रवाह पुढे आला. यावर तावडे म्हणाले की, शासनातर्फे आपण एक प्रामाणिक मागणी महामंडळाकडे केली. पण, येथे संमेलन घ्यायचे की नाही या विषयी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेने किंवा महाबळेश्वर शाखेने तसेच साहित्य महामंडळाने घ्याव्या. या विषयी खर्चाची आणि आयोजनाची सगळी जबाबदारी शासनाची असेल.
आमचा ठाम विरोध
भिलारला संमेलन घ्यावे यासाठी आमचा ठाम विरोध आहे. शासनाने सामेलन आयोजित केले तर ते शासनानेच होईल, संमेलनाच्या इतिहासात कधीही शासनाने सांमेलनाचे आयोजन केले नाही. भिलारला अखिल भारतीय साहित्य संमेलन होईल अशी व्यवस्था तिथे नाही. साहित्यिकांसह वाचक तेथे येतील का या बाबत शंका आहे. सातारा शाखेच्या पदाधिका-यांना कधीही विश्वासात घेतले जात नाही. आता एव्हडा मोठा कार्यक्रम असूनही आमच्या शाखेतील कोणालाही निमंत्रण नाही. असे होत असल्याने भिलारला संमेलन व्हावे याला आमचा ठाम विरोध आहे. येथे संमेलन घ्यावे यासाठी आम्ही निमंत्रण देणार नाही.
-विनोद कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी, मसाप सातारा शाखा
निमंत्रणच नाही
भिलारला संमेलन घ्यावं असे सांस्कृतिक तथा भाषा मंत्री विनोद तावडे बडोद्याच्या साहित्य संमेलनात म्हणाले होते. पण, संमेलन घ्यायचं असेल तर कोणत्या तरी संस्थेने वा मासापच्या शाखेने प्रस्थाव अथवा लेखी निमंत्रण द्यावं लागतं. भिलारच्या बाबतीत असे काहीच वा कोणीच निमंत्रण दिलेले नाही. मग, या प्रस्तावाचा कसा विचार करावा? समजा असे निमंत्रण आलेच तर महामंडळाचे पदाधिकारी विचार करतील.
- श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य महामंडळ
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |