उंडाळे : स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत पंडित नेहरूंचे स्थान अढळ असून त्यांनी केलेल्या सुधारणा, राबविलेली धोरणे यामुळेच भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारे राष्ट्र बनले आहे. देशाचे ऐक्य, विकास, संसदीय लोकशाहीसाठी त्यांनी विसरू शकणार नाही. त्यामुळे सत्तेतील मंडळींना नेहरूंच्या विचारांचा वारसा मंडळी नेहरूंच्या विचारांचा वारसा कधीही पुसत येणार नाही, असे स्पष्ट मत राजकीय विश्लेषक, शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले. पंडित नेहरू व सरदार वल्लभभाई पटेेल यांचे देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान असून त्यांच्यामध्ये वाद असल्याचा खोटा व कपोकल्पित इतिहास मांडला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कराड येथे रयत संघटनेच्यावतीने दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोेलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर होते. यावेळी प्राचार्य गणपतराव कणसे, महानंदचे संचालक वसंतराव जगदाळे, प्रा. धनाजी काटकर, प्रा. पांडुरंग डांगे, पंचायत समितीचे माजी सभापतीआप्पासाहेब गरूड, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौसाळकर म्हणाले, पंडित नेहरूंचे योगदान सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असून त्यांच्या विचारांचा वारसा कोणालाही पुसता येणार नाही. देशाचे 17 वर्षे नेतृत्व त्यांनी केले. त्यापूर्वी त्यांनी 25 वर्षे स्वांतत्र्यलढयात खर्ची टाकली. त्यातील ऐन तारूण्यातील 11 वर्षे तुरूंगवास भोगला. नवभारताची निर्मिती ही पंडित नेहरूंमुळेच झाली असून त्याचा विसर सध्याच्या सत्तेतील मंडळीना पडला आहे. त्यांची जयंती सरकारने साजरी केलीच नाही. पण 125 जयंतीसाठी तरतूद केलेले 20 कोटी रूपयांची या सरकारने खर्ची केले नाहीत. नेहरूं नी आयुष्यभर ज्या विचारांना विरोध केला त्या विचाराचे सरकार सत्तेत आल्याने हे घडत आहे.
नेहरू व पटेल यांच्यामध्ये कधीच संघर्ष, मतभेद नव्हते.ते दोघेही काँग्रेसचे सक्रिय काम करत होते. संघटन व देशाचे ऐक्य याबाबत त्याचे काम सुरू होते. देश स्वतंत्र झाला. त्यावेळी पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या 75 लाख निर्वासितांचे पुनर्वसन करणे व देशातील पाचशेच्या वर असणारी संस्थाने खालसा करण्याचे मोठे व आव्हानात्मक काम होते. नेहरू, पटेल यांनी संस्थाने खालसा करताना एकसंध असा भारत बनविण्याचे काम केले.
राज्यघटनेत प्रारंभ अनुसूचित जातीजमाती व जाती या दोन घटकांनाच आरक्षण होते. राज्यघटनेत गरजेनुसार व काळानुरूप सुधारणा व्हाव्यात या मताचे नेहरू होते. त्यांनी पहिली घटना दुरूस्ती करून जमीनदारी पद्धत नष्ट केली व सामाजिक, शैक्षणिक, इतर मागास जातींना राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यामुळे आज अनेक जातींना आरक्षण मिळाले आहे, असे ते म्हणाले.
विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, गांधी, नेहरू, पटेल या विभूतींनी दिलेेले योगदान, काँगे्रसचे योगदान देशाला कधीही विसरता येणार नाही. पंडितजींचे वडील, मुलगी यासह संपूर्ण खानदान स्वातंत्र्य लढयात हिरिरीने सहभागी होते. त्यांचा त्याग, बलिदान भारत कधीही विसरू शकत नाही. आजचे राज्यकर्ते नेहरू पुसायला निघालेते. इतिहासाचे विकृतीकरण, खोटा इतिहास जगापुढे आण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रबोधन महत्त्वाचे आहे.याशिवाय जनतेमध्ये प्रगल्भता येणार नाही. विकास होणार नाही. धनाजी काटकर यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव जगदाळे यांनी आभार मानले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |