02:23am | Nov 15, 2019 |
कराड : येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात (कराड) येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद दीक्षित उपस्थित राहणार असून इंद्रजित देशमुख (काकाजी) सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार), कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अशोक चव्हाण व चेअरमन डॉ.जयवंत सातपुते यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी व श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, रानकवी ना. धो. महानोर, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, नाम ङ्गाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, शांतीलाल मुथा व इंद्रजित देशमुख (काकाजी) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दि.6 जुलै रोजी सदर पुरस्कार स्विकारण्यासाठी श्रीनिवास पाटील यांना संस्थेच्या विश्वस्तांनी विनंती केली होती. दि. 10 जुलै रोजी श्रीनिवास पाटील यांनी स्वीकृती दिली.
मारुल हवेली, ता. पाटण येथील श्रीनिवास पाटील यांनी शिवाजी विद्यालय कराड येथील विद्यालयीन शिक्षणानंतर एस.पी. कॉलेज पुणे, पुणे विद्यापीठ येथून पद्व्युत्त शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. 1965 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्यानंतर 1975 पर्यंत करवीर, हिंगणघाट, संगमनेर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले. नोकरीच्या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपर-चिंचवड येथे काम केल्यानंतर 1979 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांना पदोन्नती मिळाली. राज्य सहकार संचालक, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, आयुक्त, विभागीय उपायुक्त अशा विविध शासकीय सेवेत काम करताना सर्व सामान्य जनतेच्या हिताची कामे त्यांनी केली.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे व पाटील कुटुंबियांचे स्नेहाचे संबंध होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्व. यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखालीच श्रीनिवास पाटील यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला व या सेवेत यशवंतरावांच्या कल्पनेतील महाराष्ट्र साकार करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
1999 मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्ती घेऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कराड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविली. या मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधीत्व केले. या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली आहे.
साहित्य, कला, क्रीडा, अर्थकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात योगदान देताना कराड येथे झालेल्या 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्याध्यक्षपद भूषविले. तसेच 84 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नेटक्या संयोजनात त्यांचे मार्गदर्शन होते. महाराष्ट्रातील लोककला, कबड्डी, खो-खो व कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
यशवंत विचाराने प्रेरित होऊन आयुष्यभर या विचारांची पाठराखण करणार्या श्रीनिवास पाटील यांना 2019 मधील सातारा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी दीर्घकालिन समाजसेवा केली असून राज्याच्या व देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणार्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान देतानाच स्व. चव्हाणसाहेबांच्या विचारांचा जागर करणारे व्यक्तीमत्व म्हणून खा. श्रीनिवास पाटील यांची समाजामध्ये ओळख आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात सभासद व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या विश्वस्तांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |