माजलगाव, जि. बीड येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक (भापोसे) असणार्या भाग्यश्री नवटके यांनी ऍट्रोसिटी संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याची घटना समोर आलेली आहे. संबंधित व्हिडीओ गेल्या 2-3 दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर फिरतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. एका राजपत्रित अधिकार्याने थेट कायद्यालाच आव्हान दिल्यामुळे राज्यातील राजपत्रित अधिकार्यांमध्ये तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांमध्ये दोन गट पडले आहेत. कोण भाग्यश्री नवटकेंच्या विरोधात, तर कोणी समर्थनार्थ आपापल्या जातीचे झेंडे हातात घेवून उभा आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण गढूळ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
प्रत्येक माणसाला आपल्या जाती धर्माविषयी विशेष प्रेम असते. ते असायलाही हवे. परंतू कधी कधी 'गाढवी' प्रेमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आपल्या देशाची प्रतिज्ञा लिहित असताना प्यादिमारी व्यंकटा सुब्बाराव यांनी भारत आपला देश आहे असे म्हणण्याऐवजी भारत माझा देश आहे, अशा पद्धतीने आपल्या देशाच्या प्रतिज्ञेची सुरुवात केली होती. कदाचित भारतीय मानसिकता काय असतो, भारतीय समाजावर जातीपातीचा पगडा मोठा असल्याची जाणीव झाली असल्यानेच व्यंकटा सुब्बाराव यांनी प्रतिज्ञेची सुरुवात करीत असताना ‘भारत माझा देश आहे’ अशी केली असावी. जातीधर्माच्या जोखडात अडकलेल्या आपल्या समाजाला राष्ट्रवाद कशाबरोबर खातात, हे स्वातंत्र्यानंतर 70 वर्षातसुद्धा अद्याप माहिती झालेले नाही. बोरुच्या शाळेत शिकलेला समाज बॉलपेन आले तरी विचाराने प्रगल्भ झालेला नाही. तो अजून जातीपातीत अडकला आहे, हे माजलगाव प्रकरणाने प्रकर्षाने समोर आले आहे.
राज्यघटनेच्या परिच्छेद 19 नुसार प्रत्येकाला आपल्या राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या होवू शकत नाही. ज्यावेळी माणूस प्रशासकीय सेवेत जातो, त्यावेळी त्याच्या समोर समाजाचे भले करण्याची आव्हाने उभी राहतात. प्रशासकीय सेवेत येत असताना प्रत्येक अधिकाऱ्याला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. त्याचवेळी तो घोषित करीत असतो की, मी जात-पात मानणार नाही, संविधानाने स्थापिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करेन. अशाप्रकारची शपथ घेतल्यानंतरही भारतीय पोलीस सेवेत असलेल्या भाग्यश्री नवटके यांना इतर जातींबद्दल एवढी घृणा मनात येते, हे निश्चितच सदृढ लोकशाहीसाठी घातक बाब आहे. ऍट्रोसिटी व मागासवर्गीयांबाबत अपशब्द वापरणार्या भाग्यश्री नवटके यांच्याविरोधात पुढे काही कार्यवाही होईल, ती होईल. परंतू प्रत्येक अधिकार्याला जात असते. ‘जात मरेपर्यंत जात नाही’, हे भाग्यश्री नवटके यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
प्रत्येक क्षेत्रात विशेषत: सरकारी कर्मचार्यांमध्ये जातीपातीचे स्तोम माजलेले आहे. जातीपाती संबंधातील अनेक संघटना सरकारी कर्मचार्यांनी स्थापन केलेल्या आहेत. या संघटनांच्या माध्यमातून आपल्या नानाविध मागण्या पदरी पाडून घेणे, वरिष्ठांना ऍट्रोसिटी व तत्सम कायद्याची भीती दाखविणे या सर्व भानगडी शासकीय सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांनी केलेल्या आहेत व करताहेत, ही पण वस्तुस्थिती आहे. तो अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा, तो आपला, तो दूरचा अशाप्रकारच्या पायंड्यांमुळे प्रशासनातील वातावरण कलुषित झाले आहे. एखादा नवीन अधिकारी पदावर रुजू होत असताना त्याच्या जातीचा प्रथम धांडोळा घेतला जातो. अगदी गावापासून त्याची कुंडली काढली जाते. महाराष्ट्रात ‘बहु’ आडनावांची रेलचेल आहे. एकच आडनाव अनेक जातींमध्ये मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळते. त्यामुळे एखाद्याची आडनावावरुन जात ओळखणे कठीण होवून बसते. त्यामुळे जिल्हा, तालुका ते अगदी गावापर्यंत संबंधित अधिकार्याची जात शोधण्यासाठी गुप्तचर यंत्रणा राबवावी लागते. ‘आपला’ असेल तर ठीक, नाहीतर दुसर्या जातीचा असेल तर ‘काही कामाचा नाही’, भ्रष्टाचारी आहे, अशी व्यापक बदनामी त्या अधिकार्याची पदावर रुजू होण्या अगोदरच केली जाते. ही वस्तुस्थिती आहे. सातारा जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची जात शोधण्यासाठी सातार्यातील काहींनी व्यापक मोहीम हाती घेतली होती. अखेर देशमुखांची जात समजल्यानंतर अनेकांनी नाकेही मुरडली होती. त्यामुळे पुरोगामी समजल्या जाणार्या महाराष्ट्रातही जातीपातीचे स्तोम माजविले जात आहे, हे सिद्ध होते. गेल्या काही वर्षात याची धार अजून वाढलेली आहे. भारत हा विकसनशील देश आहे. अठरापगड जाती आणि शेकडो प्रकारच्या भाषा बोलल्या जाणार्या या देशातही जातीपातीबद्दलचे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तान विषयीचा राष्ट्रवाद सोडला तर इतरवेळी अनेकांना आपण भारतीय असल्याची जाणीव होत नाही. सतत आपल्या जातीपातीच्या कोषात वावरणार्यांना बाह्य जगात काय चालले आहे, याच्याशी काही देणेघेणे नसते. निवडणुका आल्यावर जातीपातींची गणिते बदलायला सुरुवात होते. आम्ही एवढे टक्के, तुम्ही एवढे टक्के. या टक्केवारीच्या सारिपाटात राष्ट्रवादाचा मुडदा पाडला जातो.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. एखाद्या माणसाची औकात त्याच्या जातीपासून सुरु होते आणि जातीपर्यंतच संपते. मग तो विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ता अथवा राजपत्रित अधिकारी वा कर्मचारी असो. अशांनाही जातीपातींच्या चौकटीखालून वाकून जावेच लागते. माजलगाव, जि. बीड येथील डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांच्यानिमित्ताने जातीपातीची बेबंदशाही दिसून आली आहे. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जातीपातीच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर झटले. हजारो वर्षात जी क्रांती जगात झाली, ती क्रांती आपल्या अल्पायुष्यामध्ये या धुरिणांनी करुन दाखवली. भारतात रुजलेली ‘सोशल इक्वेलिटी’ ही अमेरिकेतील वर्णभेदापेक्षाही प्रगल्भ झालेली आहे. परंतू ‘कळतंय पण वळत नाही’, अशी परिस्थिती प्रत्येकानेच ओढावून घेतली आहे. आपल्या शेजारील देशांपेक्षा भारतात लोकशाहीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. शेजारील राष्ट्रे धगधगत असताना ही धग अद्याप आपल्याला लागलेली नाही. परंतू जातीपातीच्या पगड्या डोक्यावरुन फेकून दिल्याशिवाय आपला भारत महासत्ता होणार नाही, अधिकारी हा सामान्य माणूस व शासनामधील दुवा असतो. अधिकार्यांना जात नसते. परंतू भाग्यश्री नवटके यांच्या निमित्ताने अधिकार्यांना खरंच जात असते काय? तर येणार्या काळामध्ये ‘साहेब आपली जात कंची’ असे म्हणत कार्यालयात पाय ठेवण्यास हरकत नसावी ? यावर आता मंथन व्हायला हवे.
- संग्राम निकाळजे
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |