नवी दिल्ली : शस्त्र बाळगण्याच्या धोरणांमध्ये मोठा बदल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. प्रस्तावित धोरणांनुसार एका व्यक्तीला केवळ एकच बंदूक बाळगता येणार असून त्यांपेक्षा अधिक बंदूक बाळगल्याचे आढळल्यावर दंडा व्यतिरिक्त सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. आतापर्यंत एका व्यक्तीला तीन बंदूक सोबत बाळगण्याचा परवाना आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या गुन्ह्यात शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
कुठल्या सोहळ्यादरम्यान अथवा उत्सवात हवेत गोळीबार करणा-या अशा घटनांना आळा बसण्यासाठी शस्त्र बाळगण्याच्या धोरणांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी हवेत गोळीबार करणे, गरज नसतानाही, दहशत निर्माण करण्याच्या हेतूने बंदुकीचा वापर केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असून एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडासह दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते, अशी तरतूद नवीन प्रस्तावित धोरणांमध्ये करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावावर काही सुचना मागवण्यात येणार असल्याची माहिती गृह खात्याने दिली आहे.
शस्त्र बाळगण्याचा परवाना असलेले सोबत तीन बंदूक बाळगण्याची अनुमती आहे. शिवाय तीन पेक्षा अधिक बंदूक बाळगल्याप्रकरणी तीन वर्ष कारावासासह दंडाची तरतूद आहे. प्रस्तावित धोरणांनुसार एका व्यक्तीस केवळ एकच बंदूक सोबत बाळगण्याची अनुमत देण्यात आली आहे. शिवाय एका पेक्षा अधिक बंदूक बाळगल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करुन सात वर्ष तुरंगवास अथवा आजीवन कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात येणार आहे.
शस्त्रास्त्र कायद्यात प्रस्तावित केलेल्या सुधारणांमध्ये सैन्यदलातून अथवा पोलिसांकडून लुटलेल्या शस्त्रांचा अवैधरित्या वापर केल्याप्रकरणी तसेच शस्त्रांची अवैधरित्या तस्करी केल्याप्रकरणी होणा-या शिक्षेमध्ये वाढ करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. गुन्हेगारीच्या चार नवीन प्रकारांसाठी शिक्षा समान नसणार आहे. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सात वर्ष तुरुंगवास पुढे 14 वर्ष वाढवण्यात येईल तर दंड ठोठावण्यात येणार आहे. सध्या याप्रकरणी पाच वर्ष तुरुंगवास पुढे, 10 वर्ष वाढवण्यात येईल, तसेच दंड ठोठवण्यात येत आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून संसदेत सुरु होणा-या अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |