हैदराबाद : भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर ६ गडी राखून सहज मात केली आहे. कर्णधार विराट कोहलीची नाबाद ९४ धावांची खणखणीत खेळी आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचे २०८ धावांचे मोठे आव्हान १८.४ षटकांत सहज पार केले. भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावा करत विजय साकारला व मालिकत १-० अशी आघाडी घेतली.
विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली होती. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत महत्वपूर्ण भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या. यादरम्यान लोकेश राहुलने विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपलं अर्धशतकही साजरं केलं. तो ६२ धावा काढून माघारी परतला.
यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताचं आव्हान कायम ठेवलं. ऋषभ पंतनेही फटकेबाजी करत १८ धावा केल्या. पंत माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतला. यानंतर विराटने शिवम दुबेच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ८ चेंडू बाकी ठेवत भारताने या सामन्यात बाजी मारली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधला हा भारताचा सर्वोत्तम धावांचा पाठलाग ठरलेला आहे. विंडीजकडून पेरीने २ तर कायरन पोलार्ड आणि शेल्डन कोट्रलने १ बळी घेतला.
त्याआधी, शेमरॉन हेटमायरचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला एविन लुईस आणि कायरन पोलार्डने दिलेल्या दमदार साथीच्या जोरावर पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने २०७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लेंडल सिमन्सला माघारी धाडत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवातही केली होती. मात्र लुईस-हेटमायर आणि पोलार्ड या त्रिकुटाने हैदराबादच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.
लेंडल सिमन्स दिपक चहरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लुईसने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत फटकेबाजी सुरुवात केली. पाचव्या षटकात विंडीजने ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडला. ४० धावांवर एविन लुईस वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ब्रँडन किंग आणि हेटमायर यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. किंग माघारी परतल्यानंतर हेटमायरनेही भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत आपल्या संघाचं पारडं जड केलं. त्याला कर्णधार पोलार्डनेही उत्तम साथ दिली. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेलही सोडले. भारताकडून युजवेंद्र चहलने २ तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |