- अजित जगताप
सातारा : सातारा जिल्हा हा खर्या अर्थाने शेतीनिष्ठ आहे. अनेक नवनवे प्रयोग करून शेतीमध्ये येथील शेतकर्यांनी अमुलाग्र बदल केले आहेत. सहकारी साखर कारखान्यांसोबतच खाजगी कारखाने येथे उभे राहिले आहेत. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या लॉक डाऊनमुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी बिलाच्या प्रतिक्षेत, तर तरकारी करणारा शेतकरी तेजीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
जगभर कोरोना विषाणूने अनेक रस्ते बंद केले आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी लॉक डाऊन सोबतच खासदार निधी, आमदार निधीमध्ये कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव असला तरी सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 झाली असून यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मोबाईलवर वडिलांचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ अभागी मुलावर आली आहे. सध्या लॉक डाऊनमुळे सर्वांचेच अर्थकारण बिघडले असून अत्यावश्यक सेवा म्हणून साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी उसाची तोड तसेच त्याचे साखर कारखान्यात गाळप होवून साखरही बाजारात गेली. पण, जिल्ह्यातील शेतकर्यांना त्यांच्या ऊसाचे बिल खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग बिल कधी मिळेल? या आशेवर जिवन कंठत आहे.
सातारा जिल्ह्यात 2009-10 ला दहा साखर कारखाने होते. ते आता सध्या 25 वर पोहोचले आहेत. दरदिवशी दीड ते अडीच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप या कारखान्यात केले जाते. जिल्ह्यात पूर्वी 70 हजार 538 हेक्टरवर उसाची लागवड केली जात होती. उसाला लागणारे बी-बियाणे, पाणी, शेतमजूर व जमिनीची वाटणी यामुळे उसाची लागवड पन्नास ते पंचावण्ण हजार हेक्टरवर आलेली आहे. ऊस उत्पादनामध्ये दहा वर्षापूर्वीची टक्केवारी पाहिली तर कराड 37 टक्के, फलटण 17 टक्के, कोरेगाव 15 टक्के, सातारा 11 टक्के, पाटण 7 टक्के, वाई 5 टक्के, खटाव 3 टक्के, खंडाळा- माण प्रत्येकी 2 टक्के आणि जावली 1 टक्का अशी टक्केवारी होती. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात फारसा ऊस नसल्याने त्याची गणना केली नाही, अशी स्थिती होती. 1957-58 साली सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात श्रीराम सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला. हा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना असला तरी सध्या या कारखान्याची परिस्थिती बिकट असल्याचे मानले जात आहे. तशीच अवस्था नामांकित साखर कारखान्यांची झालेली आहे. याला पश्चिम महाराष्ट्रातील महापुराची परिस्थिती तसेच उसाला लागणारे विविध रोग आणि वेळेत ऊस तोड होत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
अशा अवस्थेतही शेतकर्यांनी जिल्ह्यातील 20 सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना वेळेत बिल मिळेल, या आशेने उस दिलेला आहे. पण अद्यापही ठरलेल्या दराप्रमाणे साखर कारखान्यांकडून पहिला हप्ता मिळालेला नाही. काहींनी खाजगी सावकारांकडून चढ्या व्याजाने पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लॉक डाऊनच्या परिस्थितीत शेतकर्यांना किमान पहिला हप्ता मिळावा. जेणेकरुन त्यांना कुटूंब चालविण्यासाठी मदत होणार आहे. पण असे काही कारखान्यांबाबत घडत नाही. शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून ज्यांनी आपल्या शेतात तरकारी पीक काढण्यात धन्यता मानली, त्यांना चांगले दिवस आले असून उसाच्या एकरकमेपेक्षा दररोज शेतकर्यांच्या हातात ताजा पैसा खेळू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विनोदाने सांगताना काही ग्रामस्थ सांगतात, ‘बागायतदार उपाशी, तरकारी करणारा मात्र तुपाशी’. त्यामुळे साखर कारखानदारांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेश देण्यापूर्वी शेतकर्यांच्या उसाची बिले द्यावीत, अशी विनंती शेतकरी करीत आहेत.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |