02:52am | Aug 11, 2019 |
मसूर : कराड तालुक्यातील मसूर - उंब्रज रस्ता बंद असल्याचा गैरफायदा घेत वडाप चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. तसेच तासवडे टोल नाक्यावरही माणुसकी दाखवली जात नसल्यामुळे वाहनधारक व टोल कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. महापुराच्या संकटावेळी लोकांना मदतीची भावना न ठेवता त्यांची अडवणूक केली जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
मसूर - उंब्रज हा मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गाचा भाग आहे. या रस्त्यावर शिवडे ते वडोली भिकेश्वरदरम्यान कृष्णा नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे रविवारपासून हा मार्ग बंद आहे. गुरूवारी पुलावरील पाणी उतरले असले तरी महापुरामुळे पुलाचे प्रचंड नुकसान झाले आहे. बाजुचे रेलिंगही वाहून गेले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरून वाहतुक सुरू केलेली नाही. तथापि, मसूर - उंब्रज प्रवासी वाहतुक करणाऱ्या वडाप रिक्षा शिरवडे, तासवडेमार्गे सुरू आहेत. मसूर - उंब्रज या सात किलोमीटरच्या प्रवासाला एरवी १५ रूपये घेतले जातात. आता शिरवडेमार्गे साधारण १३ किलोमीटर प्रवासासाठी रिक्षाचालक तब्बल ४० रूपये वसूल करत आहेत. गरजवंताला अक्कल नसते या म्हणीप्रमाणे लोकांना हा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. हा मार्ग बंद असल्याने मसूरकडे जाणऱ्या व मसूरहून उंब्रजकडे येणाऱ्या वाहनांना नाईलाजाने तासवडे - शिरवडेदरम्यानच्या कृष्णा पुलावरून जावे लागत आहे. पण त्यासाठी तासवडे टोल नाका ओलांडावा लागत आहे. पूल बंद असल्याने पर्यायी मार्ग म्हणून शिरवडेमार्गे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोल न घेण्याच्या सूचना प्रशासनाने करायला हव्या होत्या. आपत्कालीन परिस्थितीत तशी दक्षता घ्यायला हवी होती. तसेच टोल प्रशासनानेही महापुराचे प्रचंड संकट पाहून माणुसकीच्या भावनेतून ती सवलत द्यायला हवी होती. पण तेथील कर्मचारी ती सवलत देत नाहीतच, उलट वाहनधारकांशी वाद घालत आहेत. त्यामुळे येथे वादावादीचे प्रसंग घडत आहेत. रिक्षाचालक, टोल चालक, प्रशासनाच्या या असंवेदनशीलपणाबद्दल प्रवासी व वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |