फलटण : आज जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील पर्यावरण व मानवी वसाहत टिकण्यासाठी विविध देश प्रयत्नशील आहेत. भारतातही पर्यावरणाच्यादृष्टिने केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. प्लास्टिकजन्य पदार्थावर बंदी घालून सरकारने स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील कचरा, घनकचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करीत आहे. मात्र, याला अपवाद फलटण नगरपालिका व उपनगरातील ग्रामपंचायती कारणीभूत ठरल्या आहेत.
फलटण शहरानजिक असलेल्या जाधववाडी, कोळकी या ग्रामपंचायतींना कचराडेपो नसल्यामुळे फलटण तालुक्यातील या दोन्ही ग्रामपंचायतींची खूप मोठी पंचाईत झाली आहे. फलटण शहर गेल्या काही दिवसांपासून कचर्याचे आगार झालेले आहे. शहरात जमा झालेला कचरा कचराकुंड्यांमधून ओसंडून वाहत असताना दिसत आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यामुळे फलटण शहरातील नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. औद्योगिकीकरणामुळे फलटणचा विस्तार झपाट्याने होत आहे. मात्र फलटण पालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये स्वारस्य नसल्यामुळे फलटणमध्ये बकाल अवस्था निर्माण होवून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्यावर्षी पालिकेच्या गलथान कारभारामुळे फलटणमध्ये डेंग्यूची साथ पसरली होती. यामध्ये अनेकांना आपले नाहक जीव गमवावे लागले होते. याचाच प्रत्यय सध्या फलटण शहरानजिक असणार्या बिरदेवनगर येथील विंचुर्णे रोडवर असणार्या पुनर्वसित गावठाणाच्यानिमित्ताने येत आहे.
सुमारे 15 वर्षापूर्वी बिरदेवनगर नजिक विंचुर्णी रोडलगत धोम-बलकवडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले होते. सुमारे 15 हेक्टरपेक्षा जास्त जागेवर धरणग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडून गावठाणाची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये शाळा, पाण्याची टाकी, स्वच्छतागृह, विजवाहक खांब, अंतर्गत गटरव्यवस्था आदी सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. परंतू फलटण शहरातील जागेचे भाव झपाट्याने वाढल्याने येथील राजकीय पुढार्यांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसित गावाला कोलदांडा घालून आजपर्यंत येथे गावठाण निर्माण होवू दिले नव्हते. या जागेवर फलटणच्या राजकीय पुढार्यांचा डोळा असल्यामुळे याठिकाणी आमचे गाव होवू दिले नाही, असा आरोप धरणग्रस्तांनी वेळोवेळी केला आहे. आता या गावठाणाच्या जागेवर फलटण पालिकेचा मोठा कचराडेपो तयार करण्यात आलेला आहे.
वास्तविक या जागेची मालकी सातारा जिल्हाधिकारी यांची असतानाही सर्व नियम व कायदे फाट्यावर मारुन फलटणच्या राजकीय पुढार्यांच्या आशिवार्दाने याठिकाणी मात्र मोठा कचराडेपो झालेला आहे. यामध्ये फलटण शहरातील सर्व कचरा या पुनर्वसित गावठाणामध्ये मुद्दाम आणून टाकला जातो. याच जागेत फलटणलगत असणार्या एका ग्रामपंचायतीने विनापरवाना गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरु केलेला आहे. त्यामुळे याठिकाणी कचर्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. फलटण शहरात असणार्या रुग्णालयातील जैविक कचरा याठिकाणी आणून जाळला जात असल्यामुळे याठिकाणी धगधगते कुंड निर्माण झालेले आहे. या कुंडामध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे निरुपयोगी मानवी अवयव, सर्जिकल ब्लेड, ग्लोव्हज, मोकळ्या सिरींज, सलाईन, औषधांच्या बाटल्यांचे या कुडांमध्ये आहुती दिली जात असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जैविक प्रदुषण झालेले आहे. बाजूलाच निवासी नागरी वस्त्या असल्यामुळे या प्रदुषणाने याठिकाणी राहणार्या लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चोवीस तास सुरु असलेल्या या अग्नीकुंडाकडे लक्ष देण्याची कोणीही अद्याप तसदी घेतलेली नाही.
आजूबाजूला राहणारे लोकही फलटणच्या राजकीय पुढार्यांना घाबरुन तक्रार देण्यास धजावत नाहीत, त्यामुळे फलटण पालिकेसह आजुबाजूला असणार्या ग्रामपंचायतींचे मोठ्या प्रमाणावर फावले आहे. फलटण तालुक्यातील लोकांच्या आग्रहास्तव सातारा टुडे ने आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फलटणमधील या जैविक अग्निकुंडाचा पर्दाफाश केलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या जैविक अग्निकुंडाची दखल घेवून ते त्वरित बंद करण्याची मागणी या परिसरात राहणार्या नागरिकांनी केलेली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |