सातारा : गेल्या काही दिवसांमध्ये निपाह व्हायरसमुळे केरळ राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत केरळमधील तब्बल 16 जणांचा मृत्यू झालेला आहे. स्वाईन फ्लू या व्हायरसच्या प्रकोपातून सावरत असतानाच निपाह हा व्हायरस पसरत असल्यामुळे देशभरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारचे परिपत्रक अथवा याबाबत घ्यावयाची काळजीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्याचाच कित्ता सातारा जिल्हा प्रशासन गिरवित असल्यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लू या व्हायरसने थैमान घातलेले होते. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील शेकडो लोक दगावलेले आहेत. राज्यातील पहिला स्वाईन फ्लूचा रुग्ण सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे आढळून आला होता. युद्धपातळीवर प्रयत्न करुन त्यावेळच्या जिल्हा प्रशासनाने सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लूचा स्वतंत्र विभाग उघडून त्यामध्ये स्वाईन फ्लू बाधित रुग्णांचे उपचार केले होते. त्यावेळच्या जिल्हा प्रशासनाला व आरोग्य यंत्रणांना स्वाईनवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते. मात्र केरळमध्ये निपाह या व्हायरसमुळे 16 लोक दगावलेले असताना सातारा जिल्हा प्रशासनाकडून निपाह व्हायरसबाबत काय उपाययोजना कराव्यात, थेट संसर्ग झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डबल्यूएचओ) च्या मते, निपाह व्हायरस हा वटवाघळांमधून फळांमध्ये आणि फळांतून प्राणी तसेच माणसांत पसरतो. 1998 मध्ये सर्वात आधी मलेशियाच्या कांपुंग सुंगई निपाहमध्ये अशा प्रकारच्या केसेस पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याला निपाह व्हायरस असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचे परिणाम पाहायला मिळाले होते. 2004 मध्ये बांगलादेशात या व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळाला होता.
देशभरामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने निपाह व्हायरस बाबत हाय ऍलर्ट जारी केला असतानाही जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत आहे काय, असा सवाल सातारा जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत.
'निपाह'ची लक्षणं काय आहेत?
हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.
हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण आढळतात.
लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.
अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृद्याच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे निदर्शनास आले.
ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे 7-10 दिवस आढळतात.
सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे.
काय काळजी घ्याल?
सध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही. पडलेली फळं, प्रामुख्याने खजुराचे फळं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो. संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा. वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे.मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा. तुम्हाला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |