सुरुवातीला हवाहवासा वाटणारा पाऊस मात्र काही दिवसांनी नकोसा वाटू लागतो. कारण साथीच्या आजारांमुळे सर्वसामान्य जेरीस येतात. पावसाळ्यातील आजारांचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी, खराब अन्न व आजूबाजूला असणारी अस्वच्छता. बरेचदा ताप, थंडी, खोकला, कावीळ, उलटी, जुलाब या आजारांनी लहान मुले, वृद्धांना त्रास होतो. सुरुवातीला साधा वाटणाऱ्या सर्दी-खोकला, तापाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मलेरिया, डेंग्यूच्या तापाचेही निदान होऊ शकते. त्यामुळे योग्य तपासणी करून आजाराबाबत वेळीच खातरजमा करावी अन्यथा सर्दी-पडसे समजून अंगावर काढणे महागात पडू शकते.
पावसाळ्यात होणारे आजार -
१. डेंग्यू - पावसाळ्यात सर्रास दिसून येणारा आजार. दरवर्षी येणाऱ्या रुग्णांपैकी २०-२५ साथीच्या रुग्णांमध्ये या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण दिसून येते. डेंग्यूची लक्षणे सहज ओळखता येतात. अतिताप, रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे, अंगावर चट्टे ही प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. घरात अथवा कार्यालयात डासांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक.
२. चिकनगुनीया - साचलेलं पाणी, एसी, कुलरप्लाण्टमधून होणारा पाण्याचा निचरा, पाण्याची पाइपलाइन तसेच भांडी आदीवर घोंगावणारे मच्छर यांमुळे चिकनगुनिया होऊ शकतो. हे डास फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही तुम्हाला दंश करू शकतात त्यामुळे अशा जमा झालेल्या पाण्याच्या जवळपास न गेलेलेच बरे. बरेचदा लहान मुलं पावसाळ्यात अशा साचलेल्या पाण्यात मस्ती करताना आपण पाहतो. चिकनगुनीया आजाराची सांधेदुखी व ताप ही दोन प्रमुख लक्षणं दिसून येतात. चिकनगुनीया होऊ नये म्हणून प्राथमिक काळजी म्हणजे आपल्या घरात भांड्यांमध्ये पाणी जास्त दिवस साठवून ठेऊ नये.
3. अतिसार अर्थात जुलाब - बाहेरील उघड्यांवरील अन्नपदार्थ खाल्याने तसेच पाणी प्यायल्याने अतिसाराची लागण होऊ शकते. अतिसार सहज बरा करता येऊ शकतो फक्त योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अतिसाराचे दोन प्रकार आहेत. एक तीव्र तर दुसरा दीर्घकाळ सुरु राहणाऱ्या प्रकारचा. पाणी उकळून प्यायल्यास व घरगुती अन्नपदार्थ खाल्यास अतिसार होण्याची शक्यता कमी. पावसाळ्यात बरेचदा आपल्याला बाहेरील खाण्याचा मोह होतो. अशावेळी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बरेचदा मोठमोठ्या सोसायट्या किंवा वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्याने दूषित पाणीपुरवठा होऊ शकतो. अशावेळी पाणी शुद्ध करणारे फिल्टर्स तसेच कॅन्डल्स नियमित साफ करणे किंवा पाणी उकळून पिणे महत्त्वाचे आहे.
४. टायफॉइड - अस्वच्छ व घाणीच्या साम्राज्यामुळे हा आजार पसरतो. अस्वच्छ ठिकाणी खाद्यपदार्थ शक्यतो टाळा. ताप, डोकेदुखी, थकवा, घशाला खवखव होणे ही टायफॉइडच्या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे नेहमीच सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. रस्त्यावरील खाणे टाळावे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |