04:23am | Jun 06, 2019 |
फलटण : नीरा-देवघर धरण ज्या भोर, खंडाळा, फलटण, माळशीरस तालुक्याच्या दुष्काळी जनतेची तहान भागविण्यासाठी बांधले, त्या जनतेच्या हक्काचे पाणी बारामतीकरांनी जबरदस्तीने पळविले आहे, हे पळविलेले आमच्या हक्काचे पाणी आम्ही परत आणीत आहोत यात कसले राजकारण असा सवाल करीत, उगाच जनतेची दिशाभूल करुन राजकारण करु नका, आमच्या पाण्यावर आमचा हक्क आहे असा पलटवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खा.शरद पवार यांच्या वक्तव्यावर केला आहे.
नीरा-देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या निवेदनानंतर दिला आहे. त्यामुळे नीरा-देवघरच्या पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटू लागले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांनी पाण्यावरुन कोणी राजकारण करु नये राजकारण कोठे करायचे याचे भान ठेवा अशा प्रतिक्रिया दिल्यावर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार करीत पाण्यासाठी कोणी राजकारण केले, कोणी पाणी पळविले, हे पाणी कोणासाठी होते याबद्दल बोला असे आवाहन करुन हे पाणी परत वळवून दुष्काळी तालुकयांची प्रथमत: तहान भागविणार आहोत निधी उपलब्ध होताच कालव्याची कामे सुरु केली जातील, जवळपास पूर्ण ११.५ टीएमसी पाणी मिळाल्यास कालवे बारमाही सुरु राहतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल विश्वास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही पाण्यावरुन राजकारण करु नये असे म्हटल्याचे निदर्शनास आणून देताच त्यांचा बारामतीच्या पाण्याबाबत काही तरी गैरसमज झाला असेल बारामतीकरांनी पाणी कसे पळवून नेले आणि तीन दुष्काळी तालुक्यावर कसा अन्याय केला याची वस्तुस्थिती आणि पूर्ण कागदोपत्री माहिती पुराव्यानिशी आम्ही त्यांना देउ त्यानंतर ते आमच्या पाठीशी निश्चितच राहतील असा आशावाद खा. रणजितसिंह यांनी व्यक्त केला. फलटण तालुक्यातील रोजगार, रेल्वे, शेतीचे अन्य प्रश्न कोणत्याही परिस्थितीत येत्या पाच वर्षात मार्गी लावणार आहे, मी मतदाराना दिलेला प्रत्येक शब्द पाळणार आहे मला खुप काही कामे करायची आहेत मात्र आत्ताच यावर बोलणार नाही, अगोदर करुन दाखवीन नंतर बोलेन असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्याना नीरा-देवघर धरणाचे पाणी आणून आणि कालवे बारमाही करीन असा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला सन २०१७ मध्ये कराराची मुदत संपल्यापासून नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहिर केला असून याबाबतचा आदेश येत्या काही दिवसात काढावा असेही त्यांनी अधिका-यांना सांगितले आहे. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील नीरा-देवघर धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे पाणी कायम स्वरुपी बंद होवून त्याचा फायदा भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्यांना १०० टक्के होणार असल्याचे खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.वास्तविक पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसित गावठाणे, आणि प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात जमिनी फलटण-खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वखुशीने दिल्या त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी न देता, ज्यांचा या पाण्याशी काडीमात्र संबंध नाही, एक गुंठ्याचे योगदान नाही त्या बारामती-इंदापूर तालुक्यांना हे पाणी देणे राजकारण नव्हे का ? असा सवाल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |