सातारा : मराठी स्वराज्याची स्थापना ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून झाली. पातशाह्यांविरोधात स्वराज्य तत्कालीन कालखंडाचा रिवाज म्हणून अधिकृत झाले. या घटनेला ३४३ वर्षे पूर्ण होताना राजधानी साताऱ्यातील तख्ताचा वाडा अर्थात गुरुवार बागेत स्वराज्य निर्मिती दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला कॉ. किरण माने, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडीक, प्रशांत आहेरराव, ओमकार तपासे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शिवविचारांचा जागर मान्यवरांनी आपल्या मनोगतात केला.
रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा १७ व्या शतकानंतर सर्व महापुरुष आणि राजकीय-सामाजिक पक्ष-संघटनांसाठी प्रेरणास्रोत राहिलेत, हे त्यांच्या कार्याचे मोठेपण आहे. राजाराम महाराजांचा जन्म पालता झाल्यामुळे अपशकुन झाला म्हटणाऱ्यांना हा मुलगाच पादशाह्यांना पालते करेल, असे प्रागेतिहासिक उदगार शिवाजी महाराजांनी काढले होते. ब्राह्मण्यवादी विचारांना राजेंच्या लेखी थारा नव्हता. रयतेचे राज्य हे त्यांचे विचार घटनेत रुजल्यामुळेच डॉ. आंबेडकरांनी 'लोकांनी लोकांसाठी लोकांमधून राबवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही' अशी लोकशाहीची व्याख्या केली आहे, असे कॉ. मानेंनी आपल्या मनोगतात सांगितले. शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीला दिशा देणारे असल्याने ते आचरणात आले पाहिजेत आणि त्यासाठी व्यापक जनजागृती करताना असे कार्यक्रम प्रेरणादायी असल्याचे मत माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडीक यांनी मांडले. राजधानीत होणाऱ्या नावविचारांच्या अशा प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे साताऱ्याच्या ऐतिहासिक पर्यटनात भविष्य काळात वाढ होईल, अशी अपेक्षा प्रशांत आहेरराव यांनी व्यक्त केली.
बालशिवाजी युवा प्रतिष्ठान, दक्ष विचार मंच, नरसिंह क्रीडा मंडळाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अरबाज शेख यांनी प्रास्ताविक तर गुरुदास आडागळे यांनी सूत्रसंचालन केले. कॉ. प्रकाश भिसे, सचिन पवार, उमेश लांडगे, युवक-युवती कार्यक्रमाला उपस्थित होते.
राज्याभिषेकाला फाटा आणि जागर स्वराज्य निर्मितीचा...
अनिष्ठ-रूढी परंपरांना फाटा देणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात रयतेचे राज्य निर्माण करून गुलामीच्या जोखंडातून मराठी साम्राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना वैदिक परंपरांना फाटा देत 'स्वराज्य निर्मिती दिन' साजरा करताना अभिषेक पद्धतीलाही फाटा देण्यात आला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |