04:09pm | Jul 28, 2018 |
सातारा जिल्हा हा वाटतो इतका सरळ नाही. राज्यभरात शांतताप्रिय व पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या सातार्यात गेल्या दहा वर्षामध्ये गुंडगिरीने डोके वर काढले होते. महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणानंतर सातारा जिल्हा गुन्हेगारीच्या दृष्टिने राज्याच्या नकाशावर आला. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा जिल्हा, राज्याच्या सहकार चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्ह्याला गुंडगिरीने हरताळ फासण्याचे काम केले. सातारा जिल्ह्यात येणार्या प्रत्येक एसपी ने आपापल्यापरीने या गुंडगिरीचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी मोक्का कायद्याचे हत्यार उपसले. परंतू त्यांचीही प्रशासकीय बदली झाल्यामुळे हे काम गडचिरोलीहून आलेल्या संदीप पाटील यांच्या हातात आले. संधीचे सोने करणार्या संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील व्हाईट कॉलर नक्षल्यांना चोपून काढले. कधी नव्हे असे राज्यात उच्चांक व्हावा, असे मोक्क्याचे शतक पूर्ण केले. परंतू आज मध्यरात्री सोशल मिडियावर एसपी संदीप पाटील यांच्या बदलीचे वृत्त झळकताच सातारकरांच्या काळजात धस्स झाले. अनेकांच्या डोळ्यासमोर गेल्या दोन वर्षातील भूतकाळ तरळू लागला. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची बदली झाल्यानंतर सातार्यातील गुंडगिरी फोफावणार, अशी अटकळ बांधली जात होती. जिल्ह्यातील व्हाईट कॉलर नक्षल्यांचे बिमोड करण्याचे आव्हान उभे नूतन एसपीसमोर ठाकले होते. परंतू गडचिरोलीमध्ये नक्षल्यांना पुरुन उरलेले संदीप पाटील जिल्ह्यातील व्हाईट कॉलर नक्षल्यांनाही पुरून उरले आहेत.
संदीप पाटील म्हणायचे, गडचिरोलीमध्ये काम करीत असताना आमचा शत्रू आम्हाला माहित असायचा. त्याला टिपणे आमच्यासाठी सोपे असायचे. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या आजुबाजूलाच नक्षली विचारांचे लोक वावरत असतात. अशांना ओळखून त्यांचा बिमोड करणे फार जिकिरीचे काम आहे. असे असतानाही संदीप पाटलांनी पांढर्या शुभ्र कपड्यातील नक्षल्यांना ओळखले. त्यांच्यावर मोक्कास्त्र डागून त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली. सातारा जिल्हा एका बाजूला सधन, तर दुसर्या बाजूला निर्धन अशा दुहेरी आर्थिक परिस्थितीमध्ये वाटचाल चालली आहे. जिल्ह्यात वाळू माफिया, खाजगी अवैध सावकार यांच्या माध्यमातून गुंडगिरी फोफावली आहे. गुंडगिरीतून पैसा आणि त्याच पैशातून राजकारण आणि राजकारणातून पुन्हा गुंडगिरी. असे चक़्र जिल्ह्यात सुरु आहे, या चक्राला भेदण्याचे आव्हान तत्कालीन नूतन एसपी संदीप पाटील यांच्यासमोर ठाकलेले होते. परंतू संदीप पाटील यांनी साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तंत्र आपल्या कार्यकाळात राबविले. पदार्पणातच एसपी संदीप पाटील यांना चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील जातीय दंगलीला सामोरे जावे लागले. परंतू मोठ्या धिरोदात्तपणे पाटील यांनी जातीय दंगलीचा हा भस्मासूर जाळून टाकला व आपल्या कार्यपद्धतीची चुणूक सातारा जिल्ह्याला दाखवून दिली.
‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे संदीप पाटील यांनी आपली कार्यपद्धती राबवली. सातार्यातील पुढारी हे राज्याच्या राजकारणात पोहोचलेली लोकं. थेट पंतप्रधानांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सातार्यातील पुढार्यांचे संबंध. परंतू या पुढार्यांनाही संदीप पाटील यांनी खिशात ठेवले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखत असताना पुढार्यांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांनाही पाटील पुरुन उरले. पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यातील शांतीदुताच्या माध्यमातून संदीप पाटील यांना बॅकफूटवर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतू सातार्याची अस्मिता ठरवल्या गेलेल्या त्या कबुतराची पुन्हा प्रतिष्ठापना करुन खर्या अर्थाने संदीप पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सातारकरांसमोर एक आदर्श निर्माण केला. फलटण, कराड, सातारा ही जिल्ह्यातील गुंडगिरीच्यादृष्टिने धगधगणारी शहरे. या तीनही शहरांमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. असे असताना गुंडगिरी मुळापासूनच उखडून टाकण्यासाठी संदीप पाटलांनी एक मास्टर प्लॅन तयार केला. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील गुंडापुंडांवर मोक्कास्त्र डागायला सुरुवात केली. घावला गुंंड की लाव मोक्का या मोंडस ओपरेंडीमुळे सातार्यात संदीप पाटील पॅटर्न तयार झाला. सातार्याच्या इतिहासात नोंद होईल असा वाई येथील संतोष पोळ याने केलेले हत्याकांडही उजेडात आणण्याचे काम संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालीच झाले. राज्याला हादरवून टाकणार्या या हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली होती. देशात आणि राज्यात नोटबंदी असताना कोट्यवधी रुपयांची रेकॉर्डब्रेक चलनी रक्कम हस्तगत करण्याचे श्रेय संदीप पाटील यांना जाते. परवा कराड येथे सुमारे साडेचार कोटींच्या रोड रॉबरीचा छडा संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने काही तासांतच लावलेला होता. जिल्ह्यात एखादा गुन्हा घडल्यास काही तासांतच किंवा दिवसांतच त्याचा छडा लावला जात असे. याचे श्रेय केवळ संदीप पाटील यांनाच जाते.
जिल्ह्यात पोलीस अधिकार्यांची आणि कर्मचार्यांचे संख्याबळ कमी असतानासुद्धा पाटील यांच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. परवा मराठा आंदोलनादरम्यान त्याला गालबोट लागले. सातारा पेटतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतू जिवाची पर्वा न करता थेट दंगलस्थळी रस्त्यावर उतरुन स्वत: पोलीस पार्टीचे नेतृत्व पाटील यांनी केले. दंगलखोरांना वेचून वेचून फटके दिले. काही तासांतच दंगलीची धगही विझून गेली. संदीप पाटील यांचे कर्तृत्व मोठेच आहे. याबाबत दुमत नाही. सातारा आणि फलटणमधील अवैध सावकारी हा यावर्षीचा पोलिसांचा केंद्रबिंदू राहिला. वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या अवैध सावकारी व्यवसायाच्या माध्यमातून या दोन्ही शहरात गुंडगिरी फोफावलेली होती. त्या गुंडगिरीच्या माध्यमातून फलटण आणि सातार्यातील जनतेचे आर्थिक शारीरिक, लैगिक, मानसिक शोषण केले जात होते. परंतू संदीप पाटलांचा रट्टा असा काही बसला की, या अवैध सावकारांना ‘दे माय धरणी ठाय’ ची आठवण झाली. फलटण, सातारामधील अवैध सावकारी संदीप पाटील यांच्यामुळे नेस्तनाबूत झाली आहे. काही मोजके व्हाईट कॉलर सावकार पुढार्यांच्या वळचणीला कुंडली मारुन बसलेले आहेत. त्यांचा बिमोड करणे हे संदीप पाटील यांचे आगामी मिशन होते. मात्र शासनाच्या प्रशासकीय बदल्यांमुळे संदीप पाटील यांचे काम अर्धवट राहिलेले आहे. येणारे जिल्हा पोलीस प्रमुखही संदीप पाटील यांच्या विचारांचेच असावेत. पाटील यांचे राहिलेले अर्धवट काम किमान त्यांनी तरी पूर्ण करावे, अशी अपेक्षा लोक करीत आहेत. संदीप पाटील यांना राज्य शासनाने किमान एक वर्षासाठी ‘एक्सटेंशन’ द्यावे, अशी मागणी सोशल मिडियावर जोर धरु लागली आहे. सातारा जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक क्षेत्रातूनही संदीप पाटीलच हवेत, अशी मागणी होत आहे.
‘मोक्कावाले एसपी'
जिल्ह्यातील सुमारे शंभर गुंडापुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई करुन सुमारे दोनशे वर्षे जेलची हवा खायला लावणारे (एका मोक्कासाठी सरासरी दोन वर्षे पकडल्यास) संदीप पाटील हे राज्यातील एकमेव आयपीएस अधिकारी असावेत. संदीप पाटील आणि पद्माकर घनवट हे जिल्हा पोलीस दलातील एक अजब रसायन तयार झाले होते. दोघांमधील टायमिंग भन्नाट होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट यांना राज्य शासनाने ‘एक्सटेंन्शन’ दिले. त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदीप पाटील यांनाही जिल्ह्याची सेवा करण्यासाठी एक्सटेंन्शन देण्याकरीता सोशल मिडियावर खास मोहीम राबविली जात आहे. 70-80 च्या दशकामध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेत्या मृणालताई गोरे यांना पाणीवाली बाई म्हणून ओळखले जात होते. त्याच धर्तीवर संदीप पाटील यांनी जिल्ह्यात मोक्काचे शतक साजरे करुन ‘मोक्कावाले पोलीस अधीक्षक’ ही इमेज राज्यभरात तयार केली आहे.
- संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |