सातारा : देशाचे मारेकरी समोर असूनही धर्मांध विचारांचे लोक सत्तेत असल्याने असहिष्णू वातावरण झपाट्याने वाढत आहे. काही लोकांच्या मर्जीने कारभार सुरू असून मूठभर भांडवलशाहीला पोसण्याचे काम मनुवादी विचारांचे लोक सत्तेत बसून करत आहेत. हे धर्मांध प्रवृत्तीचे शासक शिवरायांसह फुले, शाहू-आंबेडकरांचे नाव घेत घटनेला सुरुंग लावत असून सैन्य दलात धर्मांधता निर्माण केली जात असल्याने नागरिकांनी सुजानपणे याची चिकित्सा केली पाहीजे. नको ते सत्ताधीश झाल्यामुळे वंचित घटक पुन्हा पाच हजार वर्षे मागे गेला असल्याचे मत कॉ. वसंत नलावडे यांनी मांडले. १६ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी "ये आझादी झुठी है, देश की जनता भुकी है" डफावर हात टाकत या शब्दात शाहीरी दाखवली होती. त्यानिमित्ताने रविवार पेठेतील समाजमंदिरात आयोजित व्याख्यानमालेत कॉ. नलावडे बोलत होते. यावेळी जयंत उथळे, अजय कांबळे, भगवान अवघडे, अमर गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉ. नलावडे म्हणाले, शासक क्रूरता निर्माण करताना नागरिकांना वेठीशी धरत असेल तर क्रांतीची बीजे आपोआप पेरली जातात. सध्या ज्या घटना देशात घडत आहेत, त्या क्रांतीला प्रेरणा देणाऱ्या आहेत. अमेरिका ज्याप्रमाणे मेक्सिकोतील नागरिकांशी वागत आहे, ते पाहता आपल्या देशात जे सुरू आहे ते झुंडशाहीचे प्रतिक आहे. मूठभर भांडवलदारांना सोबत घेत शासन हुजरेगिरी करत असल्याचे लढाऊ विमाने खरेदीत उघड झाले आहे. स्वदेशीचा नारा देणारे ५४० कोटींचे विमान १६२५ कोटींना खरेदी करतात. ज्याने सायकलचा पंक्चर काढला नाही, त्या अनिल अंबानींचा कार्यालयाची जागा नाही अशा माणसाच्या कंपनीला हे काम दिले जाते. अदानी सारख्या लोकांना या शासनाचा किती लाभ झाला, हे सर्वश्रुत आहे. यामुळे एक टक्का धनादीश लोकांच्या ताब्यात देशातील ७६ टक्के संपत्ती आहे. असा प्रकार सुरू असला तरी २०१९ मध्ये मोदींचेच राज्य असेल या करिता सैन्यातील उच्च पदस्थ अधिकारी सक्रिय होतात, हे भूषणावह नाही. हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना सोडले जात असल्याचे प्रकार घडत असताना कर्नल पुरोहित सारख्या माणसांना भरारी देण्याचे प्रकार सुरु आहेत. लोकांना भावनिक करताना विकासाचा भुलभुलैय्या दाखवणारे शिक्षण-आरोग्यावर घाला घालत असून लोकशाही संपवताना पुन्हा मनुपाठ रुजवण्यासाठी कत्तली आणि दंगली घडवून आणत आहेत. क्रांतीदिनी संविधानाच्या प्रति जाळणारे आज साताऱ्यातील करंजेगावापर्यंत पोहचलेत. पुरोगामी विचारांच्या सातारकरांनी या प्रवृत्तीविरोधात ठामपणे उभे राहिले पाहीजे. जो विरोधात बोलेल, तो नक्षलवादी हे सरळ सूत्र सध्याच्या शासनाकडून राबवले जात आहे. शोकांतिका म्हणजे १८ मोठे पेपर-चॅनेलचे मालकीहक्क एका गटाकडे गेल्याने प्रोपौगंडा निर्माण करण्याची हातोटी सत्ताधाऱ्यांनी साधली असून यामुळे उपेक्षित-वंचित घटकाला न्याय कसा मिळेल, असा प्रश्न कॉ. नलावडे यांनी उपस्थित केला. कष्टकरी-कामगार, उपेक्षित आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्यांची पिच्छेहाट होत असली तरी काम प्रचंड आहे. त्यामुळे या मातीत घडलेल्या महापुरुषांच्या विचारांचा जागर ठेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
अण्णाभाऊंना भारतरत्न-ज्ञानपीठ आणि तत्सम पुरस्कार द्या ही मागणी करताना त्यांचे विचार अंगिकारले पाहिजेत. या विषम वातावरणात त्यांना अभिप्रेत काम केले पाहीजे. काळ आणि सध्याचे वातावरण दूषित असून सावधानतेने सामना करण्यासाठी सज्ज राहीले पाहीजे, असे जयंत उथळे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले. अमर गायकवाड यांनी प्रास्ताविक तर अजय कांबळे यांनी आभार मानले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |