सातारा : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे बहुजन समाज संकल्पनेचे प्रणेते असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षात्मक सामाजिक, राजकीय कार्याच्या नांदीचे ते उद्गाते आहेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी व्यक्त केले.
सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ३३ व्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत परिवर्तनाचे दीपस्तंभ मधील 'महर्षी शिंदे यांचे समाजकारण' या विषयावर ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य आण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह अँड.हौसेराव धुमाळ व विश्वस्त प्रा. सुवर्णा यादव उपस्थित होत्या.
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, महर्षी शिंदे यांनी १९३० सालात बहुजन पक्ष काढून बहुजन शब्दाला व्यापक कक्षा मिळवून दिली. आज त्याचे स्वरूप अतिशय आक्रसलेले जात वर्ग संबंधांपुरते मर्यादित असे झालेले आहे. समाज शास्त्रीय पद्धतीने त्यांनी मांडणी केली होती. त्यांच्या बहुजन पक्षाचा जाहीरनामा हा सामाजिक राजकीय उद्दिष्टांचा महत्वाचा पैलू आहे. बहिष्कृत भारत शब्दाचे श्रेय देखील त्यांनाच द्यावे लागेल.
महर्षी शिंदे हे म. फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्यामधील महत्वाचा दुवा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षात्मक रचतनात्मक व राजकीय सामाजिक कार्याची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी महर्षी शिंदे यांचे अस्पृश्यता निर्मूलनाचे ध्येययवादी कार्य सहाय्यभूत ठरलेले आहे. या दोन महामानवाच्यामध्ये वैचारिक अंतर्विरोध कलह द्वंद दिसत असले तरी त्यांचे अंतिमतः मार्ग एकाच स्वरूपाचे परसपूरक व समांतर राहिलेले आहेत.
महर्षी शिंदे यांची धर्मप्रेरणा प्रबळ उदात्त उन्नत व अतिशय व्यापक स्वरूपाची होती. त्यामध्ये कर्मकांड, अंधश्रद्धा पारंपरिक सनातनीला अजिबात थारा नव्हता. ब्राम्हो समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी आयुष्यभर ध्येय निष्ठेने काम केले. भागवत धर्माची संतांची वारकरी परंपरेची आवृत्ती असलेल्या प्रार्थना समाजाचे ही त्यांनी काम केले ते समाजाभिमुख व नैतिकतेला प्राधान्य देणाऱ्या धर्माचे उपासक होते.
अस्पृश्यता निवारणाचे काम करताना शंभर वर्षापूर्वी आई वडील कुटुंबासह दलित वस्तीत राहून त्यांच्याशी एकरूप होण्याचे धाडसाचे काम समाजविरोधाची पर्वा न करता त्यांनी केले. अस्पृश्यतेचा काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अजेंडावर आणण्याचे ऐतिहासिक महत्वाचे काम केले. त्यांच्या जीवन कार्याचा हा महत्वाचा पैलू आहे. शेतकऱ्यांच्या प्रभासाठी त्यांनी चळवळ करून दुर्लक्षित बळी राजाचा एकांगी नव्हे तर अनेक पातळ्यावर विचार केला. बाजार व्यवस्थेवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे शेती चिंतन हि समाज परिवर्तनाची महत्वाचे वैशिष्ठ होते. कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्था व बहुजन शिक्षण हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. त्यांचे कार्य अद्वितीय स्वरूपाचे होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती करून समाजाशी संवाद साधला आहे.
प्रा. सुवर्णा यादव यांनी प्रास्ताविक केले. केशवराव कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |