07:38pm | Jun 04, 2018 |
सातारा : गतवर्षीही 1 जूनपासून शेतकऱ्यांचा संप पुकारला होता. वास्तविवक 1 जून ते 15 जून हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा काळ असतो. शेतातील मशागतीच्या कामांपासून ते पेरण्या करण्यामध्ये शेतकऱ्यांची धांदल उडत असताना काही शेतकऱ्यांच्या नावावर सुरु असलेल्या संघटना आपले उखळ पांढरे करुन घेण्यासाठी संप पुकारत आहेत. या संपात शेतकऱ्यांनीच उत्पादित केलेल्या दुध, भाजीपाला यांची नासधुस करणारे शेतकरी नक्कीच नसतील, असा सवाल सातारा जिह्यातील शेतात काम करणाऱ्या शेतकरी बांधवांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या संपात शेतकरी संघटनांचे नेतेच सहभागी झाले असून त्यांचा संप कुठेही दिसत नाही, असे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनांची पुर्ती सरकारने केली नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांना संप पुकारला आहे. शेतकऱ्यांचा हा संप शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी, शासनाने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता तसेच विविध मागणी संदर्भात 1 जुनपासुन पुकरण्यात आला आहे. मात्र शेतकरी या संपामध्ये सहभागी नसल्याचे दिसत आहे. शेतकरीच जर संपावर गेले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असते. शेतातील भाजीपाला, दुध हे नाशवंत पदार्थ आहेत. याची साठवणुक करता येत नाही. तसेच सध्या सातारा जिह्यात पेरणीपूर्व मशागतीचा कामे सुरु आहेत. त्या कामामध्ये शेतकरी व्यस्त आहे. शेतकरी शेतातील माल विकताना कमी जास्त पैशाचा विचार करत नाही. आहे त्या किंमतील मालाची विक्री करत असतो. संघटनांनाकडुन या आंदोलनाचा गाजा वाजा केला जात आहे. मुळातच शेतकऱ्याचे हे आंदोलन चुकीच्या वेळी केल्याने शेतकरी यामध्ये सहभागी झालेले दिसत नाहीत. वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांची शेतातील पुर्व मशागतीच्या कामांना नुकतीच सुरूवात होऊ लागली आहे. जो-तो शेतकरी आपल्या कामामध्ये व्यस्त असलेला पहायला मिळत आहे. नुकताच वळवाचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पुर्व मशागतीची कामे सुरू आहेत. शेतातील खते - बिबियाणे खरेदी, नांगरने, फणपाळी मारणे आदी कामे सुरू आहेत. शेतकरी हा शेतातच असलेला पहायला मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन हे नाव पुरतेच पहायला मिळत आहे. जिल्हयात होणारी आंदोलने ही कार्यकर्त्यांकडुन नेहमीच होत असतात.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |