04:18am | Apr 11, 2019 |
सातारा : आमचे नेते नरेंद्र मोदी कॅप्टन म्हणून ओपनिंगला उतरले आहेत. परंतू कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कॅप्टन कोठे आहेत? राष्ट्रवादीचे कॅप्टन माढ्यातून ओपनिंगला उतरले. मात्र माढ्यातील जनतेचा नूर बघून बारावा राखीव खेळाडू म्हणून, माढ्याच्या पिचवरुन गायब झाले. माढ्यातील हवेचा अंदाज बघूनच राष्ट्रवादीच्या कॅप्टनने निवडणुकीतून माघार घेतली आहे. माढा मतदारसंघातील फलटण, माण-खटाव तसेच इतर विधानसभा मतदारसंघातील विकासाची भूख कायमची मिटवण्यासाठी भाजपला साथ द्या, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना माढ्यातून भरघोस मतांनी निवडून आणा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी फलटण येथे झालेल्या जाहीर सभेत केले.
माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज फलटण येथील मोती चौकात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार नारायण पाटील, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. बाबुराव माने, माजी आ. दिलीप येळगांवकर, दिगंबर आगवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई, उत्तमराव जानकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, सह्याद्री कदम, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
या जाहीर सभेमध्ये आज फलटण व माढा मतदारसंघातील इतर पक्षीय अनेक पदाधिकार्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील नेतेमंडळींनी भाजपात प्रवेश केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पुढार्यांनी खोटी आश्वासने देवून थापा मारण्याचे राजकारण केले आहे. माढा मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. आम्ही जनतेच्या हिताचे व विकासाचे राजकारण करतो. त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात विविध सिंचन प्रकल्पांना व योजनांना मोठ्या प्रमाणावर निधी देवून त्या योजना पूर्णत्वाकडे नेलेल्या आहेत. निरा-देवधर कालव्याच्या हक्काचे पाणी निश्चितच फलटण-माळशिरस तालुक्याला मिळेल. तुमच्या हक्काचे पाणी कोणीही हिरावून घेवू शकणार नाही व ते कोणाला पळवूनही देवू देणार नाही. फलटण तालुक्यातील लोणंद-फलटण हा रेल्वे मार्ग रखडलेला आहे, तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मी घेतो. जो कोणी अडवायचा प्रयत्न करेल, त्याला येथील जनता धुडकावून लावेल. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे गरीबी हटाव चा नारा देतात, पण त्यांच्या पणजोबांपासून वडिलांपर्यंत देशाची सत्ता असतानाही ते आजपर्यंत गरीबी हटवू शकले नाहीत. कॉंग्रेसने स्वत:ची व स्वत:च्या कार्यकर्त्यांची गरीबी हटवली. मात्र देश गरीबच ठेवला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात गोरगरीबांसाठी मोठे काम केले आहे. आज देश विकासाच्या मार्गावर आहे. भारताकडे वाकड्या नजरेने बघणार्या व दहशतवादी कारवाया करणार्या पाकिस्तानला मोदी सरकारने पाकिस्तानात घुसून धडा शिकवलेला आहे. मात्र, सैनिकी कारवाईचे पुरावे मागणार्या कॉंग्रेसने सैन्य दलाचे खच्चीकरण करण्याचे काम केले आहे. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातच कॉंग्रेसने देशद्रोह्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळेच त्यांनी 35 ए हे कलम रद्दबातल करण्यात येईल, असे त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. देशद्रोह्यांना संरक्षण देण्याचे काम कॉंग्रेस करत आहे. देशाला रसातळाला नेणार्या कॉंग्रेसला व त्याच्या बगलबच्च्यांना लोक स्विकारणार नाहीत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे कॅप्टन आहेत. कॉंग्रेस, बसपा, तृणमुल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी या सतराशे साठ पार्ट्यांचे सतराशे साठ नेते सोमवार ते रविवार कॅप्टन बनणार. ज्यांच्यात मेळ नाही, तेच म्हणे देशाचा गाडा हाकणार. हे कसे चालणार? त्यामुळेच देशातील सूज्ञ मतदार अशांना स्विकारणार नाहीत, असे ठाम मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दरम्यान रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा तुमच्या घरातील उमेदवार तुमच्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही दिलेला आहे. फलटण व माण-खटावमधून मताधिक्य देण्याची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. आता तुम्हीच ठरवायचे आहे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना माढ्यातून निवडून आणायचे आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे पाणी व रेल्वे प्रश्नासाठी ही निवडणूक लढवत आहेत. त्यांना ताकद देण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे फलटणमधून त्यांना अधिकाधिक मताधिक्य देण्याचे काम तुम्हाला करावयाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना केले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात कवितेच्या माध्यमातून दोन्ही कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, दोन्ही कॉंग्रेसने मला व दलित समाजाला फसवण्याचे राजकारण केले आहे. मात्र भाजपने मला व दलित समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपर्यंतचे सर्वात कार्यक्षम असे पंतप्रधान आहेत. याही निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातही महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणून राष्ट्रवादीला माढ्यामध्ये गाडण्याचे आवाहन यावेळी आठवले यांनी केले.
महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, माझे वडील हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी फलटण-लोणंद हा रेल्वेमार्ग मंजूर करुन आणला होता. निरा-देवधर कालव्याच्या हक्काचे पाणी फलटण-माळशिरसला मिळायला पाहिजे. यासंदर्भात ते आग्रही होते. परंतू महाआघाडीने हा प्रश्न आजपर्यंत भिजत ठेवला. पर्यायाने तालुक्याचा विकास खुंटला. मी तालुक्यातील पाणी आणि रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. केवळ जनतेच्या ताकदीवर मी उभा आहे. सध्या साखरवाडी कारखान्याकडे शेतकर्यांची थकबाकी आहे. लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रश्नही मार्गी लावणार आहे. आपल्या मार्गात काही लोकांकडून अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फलटणकर जनतेच्या ताकतीवर तो उधळवून लावू, असा इशारा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता दिला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, दिगंबर आगवणे, उत्तमराव जानकर माजी आ. बाबुराव माने, माजी आ. दिलीप येळगांवकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची भाषणे झाली. या जाहीर सभेचे प्रास्ताविक नरसिंह निकम यांनी, तर समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी आभार मानले. या जाहीर सभेला फलटणसह माण-खटाव, माळशिरस तालुक्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |