- प्रकाश राजेघाटगे
बुध : २०२० या नवीन वर्ष प्रवेश केल्यानंतर जगातील मानव जातीला एका वेगळ्याच रोगाने पछाडलेले असे अशी शंका जरी कुणी मागच्या दहा वर्षात उपस्थित केली असती तर लोकांना त्याला वेड्याच्या इस्पितळात भरती केली असते पण आजही शोकांतिका आहे की, संपूर्ण जगाला कोरोना नामक विषाणू ने अक्षरशः जंगजंग पछाडलेले आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिका मेटाकुटीला आली असता आपल्या भारतातील किंबहुना महाराष्ट्रातील स्थिती कित्येक पटीने चांगलीच म्हणावी लागेल. याचे संपूर्ण श्रेय जाते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनाच.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जो सत्तेचा फड रंगला असे क्वचितच घडते. सदैव विरोधी भुमिकेतील असलेल्या राजकीय पक्षांनी एकञ येऊन सरकार स्थापन केले. आणि प्रमुख बनले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे. कधीही सत्तेचा खुर्चीवर न बसलेले ठाकरे एका राजकीय संकटात संकटमोचन हनुमान म्हणून सत्तेवर आले. पहिल्यांदा तर स्वपक्षांतील नेत्यांनाही हे सरकार टिकेल ही आशा मुळीच नव्हती, पण म्हणतात ना अडचणीच्या काळात खऱ्या नेतृत्वाचा कस लागतो. तसाच अनुभव उध्दव ठाकरे यांच्या पुढे आला होता आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारसाने ते नेतृत्व सिध्द केले असेच म्हणावे लागेल.
सत्तेवर आल्यावर रायगड विकासनिधी किंवा शेतकरी कर्जमुक्ती असो उध्दव ठाकरे यांनी दाखवलेली राजकीय प्रगभलता अक्षरशः वाखाणण्याजोगी आहे. सुञबध्द कर्जमाफीने तर त्यांची शेतकरी वर्गासंबंधी असलेली कटीबध्दताच दिसून येते.विधानसभेच्या कामकाजात त्यांनी दाखवलेला साधेपणा हे त्यांच्या संयमी नेतृत्वाचाआणखी एक नवीन पैलु महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला व तो मराठीजणांना भावला हेही विशेषच म्हणावे लागेल. पण उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने सिध्द झाले ते कोरोनाच्या महामारीत!!!!
साधारणपणे साडे अकरा कोंटीचा महाराष्ट्र व पावणेदोन कोटी लोकसंख्या असलेली मुंबई महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने कोरोनाला बहुतांशी प्रमाणात पायाबंद घालू शकली आहे, असे मानावेच लागेल. मार्च महिन्यांच्या सुरूवातीला युरोपातील इंग्लंड, स्पेन व इटली व अमेरिकेत दिवसाला कोरोनाग्रस्तांचे हजार लोकं मुत्युमुखी पडत असताना भारतात किंवा महाराष्ट्रातील संख्या फक्त एककात आहे हे आपण विसरू शकत नाही. देशात लॉक डाऊन करायच्या अगोदर महाराष्ट्र त्यांची टप्पाटप्याने अमंलबजावणी श्री.उध्दव ठाकरे करून देशापुढे एक आदर्श निर्माण केला.याच तत्वाला अनुसरून नंतर देशातही लॉक डाऊनची योजनाचे अवलंबून केले.वेळोवेळी प्रिंट मिडिया व सोशल मिडियाच्या माध्यमातून श्री.उध्दव ठाकरे यांनी केलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोग्रस्तांची संख्या आटोक्यात राहिली आहे.मुंबई सारख्या प्रतिचौरस ७३००० हजार घनता लोकसंख्या असलेल्या शहराची तुलना न्युयॉर्क शहराशी केली तर मुंबईची कामगिरी कित्येक पटीने सरसच म्हणावी लागेल. हे सर्व झाले ते तुटपुंज्या अशा मेडिकल परिस्थितीत. ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. अशा या विश्वरूपी महामारीत जनतेसमोर येऊन येणाऱ्या संकटांची माहिती देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राँबिनहुड प्रमाणे लोकांना आता भासू लागले आहेत. आता लोकंही म्हणू लागले आहेत की, शिवसेनाप्रमुखांचा घेतलेला निर्णय त्यांच्या पुञाने सार्थकी लावलेला आहे.
काल पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृताअंजन पुल पाडल्यावर अमृतांजन बामची जहिरात आठवणीत आली की, हर इलाजकी एक ही दवा अमृतांजन बाम!!!!त्याप्रमाणे कोरोना वरील प्रत्येक योग्य निर्णयाचा एकच नेता उध्दव ठाकरे... बस नाम ही काफी हैं...
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |