सातारा : सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या देशाचे अनुकरण आहे. एकीकडे गुलाबी थंडी, तर दुसरीकडे कडक उन्हाळा आणि तिसर्या बाजूला दोन्ही ऋतूंचे मिश्रण पाहण्यास मिळत आहे. जलद संपर्क म्हणून सातारा जिल्ह्यात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे. परंतू कोट्यवधी रुपये दर आकारणी करणार्या सिमचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह निघत असल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत.
एकेकाळी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या बीएसएनएल म्हणजे कनेक्टिंग पिपल, असा अर्थ काढला जात होता. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला 19 वर्षापूर्वी या कंपनीची स्थापना झाली होती. 60 टक्के यात समभाग केंद्राचा होता. त्यानंतर सरकारची ही यंत्रणा गतीने मागे जाऊ लागली. त्यापूर्वीच 7 जुलै 1995 रोजी दुनिया हमारी मुठ्ठी में समजून खाजगी कंपनीने मोबाईल सिममध्ये शिरकाव केला होता. त्याला प्रतिसाद मिळू लागताच 8-10 नव्या कंपन्यांनी आपले बस्तान बसवले. अनेक खेड्यापाड्यात या कंपन्यांचे टॉवर उभे राहिले. त्यानंतर मोबाईल सिम म्हणजे यूझ ऍण्ड थ्रो अशी त्याची गत झाली. ज्याच्याकडे दोनवेळचे अन्न मिळणे मुश्किल, त्याच्याकडेही दोन-दोन सिम कार्यरत झाली. पान टपरीपासून ते हातगाडीपर्यंत सिमविक्रीला ठेवल्यामुळे अनेकांनी रस्ते का माल सस्ते में असे म्हणत उचलला. सध्या सातारा जिल्ह्यात 40 ते 50 लाख सिमकार्ड धारकांची संख्या आहे. अगदी किमान पन्नास रुपये ते 5 हजारांपर्यंत बिल अदा करणारे जिल्ह्यात ग्राहक आहेत. या सर्वांची बेरीज केली असता अंदाजे 5 ते 10 कोटी रुपये एकट्या सातारा जिल्ह्यातून खाजगी कंपन्या नफा कमवित आहेत. दुर्दैवाने अनेक ठिकाणी या सिमला रेंज नसल्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी संपर्क होत नाही. पोवई नाक्यासारख्या ठिकाणी उभे राहिले तर रेंज मिळत नाही. बेसमेंटमध्ये गेले तर रेंज मिळत नाही. त्यामुळे विशेषत: वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्या हातातील मोबाईल म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा अशी झाली आहे. याठिकाणी खाजगी कंपन्यांनी आपली दुकाने थाटली असली तरी ज्यादा बिल आकारणी ही तक्रार नित्याचीच बाब झाली आहे. त्या मानाने डोलारा कोसळत असला तरी बीएसएनएलची सेवा ग्रामीण भागात काही प्रमाणात उपलब्ध होत आहे, ही समाधानाची बाब ठरली आहे.
सातारा हे ऐतिहासिक शहर आहे. पूर्वी पेन्शनरांचे गाव म्हणून याठिकाणी शांतताप्रिय नागरिक राहत होते. त्यांना संपर्क साधण्यासाठी मोबाईल व लॅण्डलाईन फोन हे माध्यम आहे. अनेक ठिकाणी रेंज नसल्यामुळे लोकांना पश्चाताप सहन करावा लागत आहे. काहीवेळेस क्रॉस कनेक्शन, कॉल ड्रॉप, बॅलन्स अचानक कट होणे या बाबींमुळे ग्राहकांमध्ये गैरसमज पसरत आहेत. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग हे एक कुटूंब झाले आहे. एकमेकांशी अडचणीच्या काळात संपर्क व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, मोबाईल कंपन्यांच्या महागड्या हॅण्डसेटमध्ये बसविण्यात आलेल्या काही सिममुळे संपर्क होवू शकत नाही. संपर्कासाठी दुसरी कोणतीच आयडिया शिल्लक नाही. जिवावर उदार होवून पालकवर्ग प्रसिद्धीची माहिती जाणून घेण्यासाठी व्याकुळे झाले आहेत. दुनिया हमारी मुठ्ठी में, राहू द्या बाजूला... घरातून गावात फिरायला गेलेल्या मुलाशीसुद्धा मोबाईलवरुन संपर्क होत नाही, अशी अवस्था मोबाईल ग्राहकांची झाली आहे. सर्वत्र येत असलेल्या निगेटिव्ह रिपोर्टमुळे यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारचा दूरसंचार विभाग काय पावले उचलणार, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |