सातारा : शिक्षणाची कवाडे खुली करुन देणारे महात्मा फुले यांची दि. 11 व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दि. 14 एप्रिल रोजी जयंती आहे. सध्या लॉक डाऊनच्या काळात राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले जात असून युगपुरुषांचे अनुयायी कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता युगपुरुषांची जयंती अनुयायी घरी शांततेत साजरी करणार आहेत. पण नेत्यांचा आवाहनासाठी गोंगाट सुरु झाल्यामुळे आधी मदत करा, नंतर आवाहन करा, असे प्रतिआव्हान आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते के. एस. कांबळे यांनी नेत्यांना दिले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी अनेकांनी खाजगी व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. शाळा, महाविद्यालये, औद्योगिक वसाहत, वाहतूक तसेच अनेक उपक्रम थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घरी बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून फुले-आंबेडकर अनुयायांनी केंद्र व राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. काही मान्यवर नेत्यांनी युगपुरुषांची जयंती विचारमंथन व पुस्तक वाचनातून करावी, असे मत व्यक्त केले आहे. त्याचा आम्हाला आदर आहे तसेच त्याचे स्वागतही आहे. परंतू आता जिल्हापातळीवर काही महाभाग आपल्या आवाहनाशिवाय अनुयायी ऐकणार नाहीत, असा गैरसमज करुन घेत प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर पत्रकबाजी करु लागले आहेत. त्यांची कीव करावी वाटते.
सातारा जिल्ह्यात अडीच ते तीन हजार मागासवर्गीय वाड्या-वस्त्या आहेत. त्याचबरोबर शहरातही मागासवर्गीयांचे वास्तव्य आहे. दि. 22 मार्चपासून देशभर लॉक डाऊन झाल्यानंतर या लोकांनी अनेक गैरसोयींना तोंड दिले आहे. काहींनी या कालावधीत उपासमारही सहन केली. निवडणुकीच्या काळात धावपळ करुन वस्तीला भेट देणारे उमेदवारांचे समर्थक तसेच पक्षाचे झेंडे घेवून येणारे मागासवर्गीय कार्यकर्तेसुद्धा फिरकले नाहीत. आता मात्र जयंती घरी बसून शांततेत साजरी करावी, असे आवाहन करुन आपणच या समाजाचे कर्ताकरविता आहे, हे दाखविण्याचा त्यांनी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. युगपुरुषांची जयंती घरी शांततेत साजरी होणार असल्याने अनेकांना आनंद झाला आहे. पण काहींची त्यानिमित्त वर्गणी मागण्याची सवय नष्ट झाली आहे. त्यांना मात्र अतीव दु:ख होत आहे. आंबेडकरी चळवळीत काम करताना काहींची चार-चार दिवस चूल पेटली नाही. न्यायासाठी संघर्ष करावा लागला. पण त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला नाही. उलट ताठ मानेने जयंती साजरी करण्याचा उत्साह कायम ठेवला आहे. पण सध्याची परिस्थिती बिकट असून सामाजिक अंतर राखले जावे यासाठी घरी थांबून युगपुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यातच खरी जयंती आहे.
सध्या सर्व माध्यमातून आवश्यक सूचना सर्वत्र पोहोचल्या आहेत. सर्वांना आपल्या जबाबदारीची जाणीव झालेली आहे. त्यामुळे युगपुरुषांच्या जयंतीच्या नावाने कोणीही रस्त्यावर येणार नाहीत. उलट घरात बसून युगपुरुषांच्या कार्याची उजळणी करतील, असा विश्वास आहे. त्यामुळे झेंडे आणि पक्षाच्या नावावर जगणारांना लॉक डाऊनच्या काळात आवाहन करण्याची नैतिकता उरली नाही, अशीही टीका के. एस. कांबळे यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे विविध माध्यमातून चळवळीत सक्रीय काम करणारे कांबळे यांच्या मताशी अनेकजण सहमत असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |