12:47am | Jul 30, 2018 |
महाबळेश्वर : तब्बल 26 तासांच्या अथक परिश्रमानंतर काल अंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेतील 30 जणांचे मृतदेह सहाशे फुट खोल दरीतुन बाहेर काढण्यात विविध संघटनांचे टे्कर्स आणि एन.डी.आर.एफ च्या जवानांना यश आले. काल झालेल्या या भीषण बस अपघातातील 15 मृतदेह रात्री उशीरा पर्यंत बाहेर काढण्यात आले होते. उरलेले सर्व मृतदेह आज दुपारी साडे बारावाजेपर्यंत खोल दरीतुन बाहेर काढण्यात यश आले. शवविच्छेदनानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले, दरम्यान काल पासुन मोहीमेत भाग घेतलेले कोकणातील लोकप्रतिनिधी अधिकारी व सेवाभावी संघटनांचे स्वयंसेवक मोहीमेचा शेवट झाल्या नंतरच त्यांनी घटनास्थळ सोडले.
कोकण कृषी विद्यापीठाचे 30 कर्मचारी घेवून महाबळेश्वर येथे सहलीला निघालेली बस काल सकाळी साडे दहा वाजता अंबेनळी घाटातील दाभिळ गावाच्या हद्दीत सहाशे फुट खोल दरीत कोसळली होती. या भीषण अपघातात कोकण कृषी विद्यापीठाचे सहा. अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांचा अपवाद वगळता बस मधील दोन चालकासह 30 जण या अपघातात जागीच ठार झाले होते. या अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांनी अपघाताची माहीती दिल्याने सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. महाबळेश्वर येथील दोन टे्कर्स संघटनांचे सुमोर 40 जवान सर्वात प्रथम अपघात स्थळी पोहचले, व त्यांनी तातडीने बचाव कार्याला सुरूवात केली. या जवांनाच्या मदतीला स्थानिक गावकरी पोलिस कर्मचारी महाबळेश्वर पालिकेचे कर्मचारी धावले. सकाळी आकरा वाजता सुरू झालेले बचावकार्यामुळे रात्री उशीरा पर्यंत 15 मृतदेह सहाशे फुट खोल दरीतुन बाहेर काढण्यात यश आले होते.
सायंकाळी सात वाजता पुणे येथुन आलेले एन.डी.आर.एफ च्या जवांनाची एक तुकडी बचावकार्यात सहभागी झाली रात्रभर हे बचाव कार्य सुरू होते. बसच्या टपाखाली काही मृतदेह अडकले होते ते बाहेर काढण्यासाठी बसचा टप कापुन काढणे आवश्यक होते गॅस कटरच्या मदतीने तो टप बाजुला करण्याचे काम रात्री हाती घेण्यात आले. तर सकाळी सहा वाजता पुन्हा खोल दरीतुन मृतदेह प्रत्यक्ष बाहेर काढण्यास प्रारंभ झाला. कालच दोन्ही बाजुकडील वाहतुक बंद करण्यात आल्याने बघ्यांची गर्दी सकाळी कमी होती. केवळ बचाव कार्यात सहभागी झालेले जवान तेथे असल्याने मृतदेह वेगाने वर काढणे सोपे झाले. आज दुपारी साडे बारा पर्यंत उरलेले सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी धावुन आलेले कोणकाणातील रायगड जिल्हयाचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण आ. संजय कदम आ.भरत गोगावले खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शेवटचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. व ही शोध मोहीम संपुष्टात आल्याचे जाहीर करून या लोक प्रतिनिधींनी कोकणात परतले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |