सातारा : मराठी भाषा दिनाच्या निमित्त्ताने जकातवाडी येथे विद्यावर्धिनी ग्राम वाचनालयाच्या वतीने काविसंमेलन आणि सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीने घेतलेल्या निबंध स्पर्धेचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आणि ग्रंथमहोत्सव निबंध स्पर्धेचे प्रमाणपत्र वाटप प्रा.डॉ.यशवंत पाटणे कार्यवाह शिरीष चिटणीस , उपाध्यक्ष वि.ना.लांडगे , जेष्ठ कवयित्री कांता भोसले, ग्रंथमहोत्सव समिती सदस्य आणि यांचे हस्ते झाले. यावेळी प्रा.डॉ.यशवंत पाटणे बोलत होते ,ते म्हणाले विद्यावर्धिनी वाचनालय आणि गावकऱ्यांच्या वतीने होणारे कवितांचे गाव काव्यतीर्थ व्हावे.मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित कविसंमेलनात ते म्हणाले आज कविता ही सहजतेने आपल्या जीवनात नव चैतन्य घेऊन येते स्फूर्ती देते मन तणाव मुक्तही करते जीवन नव्याने जाणण्याची जगण्याची आशा देते,ग्रंथमहोत्सव निबंधातून स्पर्धकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वाचन चळवळ वाढीच्या दृष्टीने ही बाब महत्वपूर्ण आहे.
यावेळी शिरीष चिटणीस म्हणाले आज अशा कविसंमेलानातून मराठी भाषा संस्कृतीचा विकास होणार आहे. जकातवाडी येथील वाचनालय कविताच गाव करण्यात महत्वाची भूमिका पार पडणार आहे त्यासाठी सर्व स्तरातून मार्गदर्शन व सहकार्य मिळेल.इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून ही मराठी भाषा विकसित व्हावी जागतिक मराठी भाषेचे महत्व विषद करून मराठी भाषेचा प्रचार इंग्रजी शाळात झाला पाहिजे. ग्रंथमहोत्सवातील निबंध लेखन स्पर्धकांनी आपल्या वाचनाचा आणि लेखनाचा प्रवास असाच पुढे चालू ठेवावा असे सांगितले.
ग्रंथमहोत्सव समितीचे उपाध्यक्ष वि.ना.लांडगे सर म्हणाले जकातवाडी येथील वाचनालयाने वाचन चळवळ जोपासली असून पुढे कवितांच गाव म्हणून ओळखले जाईल.मराठी भाषा दिन म्हणजे वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन याचे औचित्य साधून अशी कविसंमेलने व्हावीत.मराठी अध्यापक संघ या विषयी मार्गदर्शन करेल. यावेळी आयडियल टिचर्स अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रकाश बडदरे,अखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष दिपक भुजबळ,रिपब्लिकन एम्प्लॉजाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश दुबळेयांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ कवी प्रदिप कांबळे,भिलारे गुरुजी,कार्यवाह सुनिल लोंढे,संजय गोडसे, ग्रामसेवक धुमाळ,शैलेश महाडीक,तेजश्री शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कवी संमेलनास आलेल्या कवींनी आपल्या कवितेतून रसिकांची मने जिंकली हा उत्साह वाढवणारा होता कवितांचे गाव लवकरच होण्याच्या मार्गावर आहे त्यासाठी आपल्या कल्पना विचार सुचवावेत असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे यांनी केले
कवी संमेलनात रेश्मा चिखले यांची उंबरा कविता प्रथम प्रगती पार्टे यांची जात कविता द्वितीय जनार्दन लेंभे यांची कर्तव्य कविता तृतिय या कवींची स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला . कवितांच्या परीक्षणाचे काम ज्येष्ठ कवयित्री कांता भोसले यांनी केले या शिवाय अर्पिता भोसलेची बाप,उमा जाधव यांची देशाच्या जवाना,संगीता गुरव यांची रानभूल राहुल वराडे यांची जोंधळा,अंजली गोडसे यांची ओंजळीतला चंद्र,अलका जगदाळे यांची योगासन,विजया देशपांडे यांची माय मराठी, संगीता केंजळे यांची अमंगलाच्या झाडाखाली त्याचप्रमाणे दादा सावंत,चंद्रकांत शिंदे,अमोल मांढरे,काव्या शिंदे,सोनाली शिंदे आदीं कवींनी आपल्या कविता सादर केल्या .
ग्रंथमहोत्सव निबंध स्पर्धेत ५ वी ते ७ वी गटात अनुक्रमे प्रणेश संतोष गोळे प्रथम विराज शिवाजी जाधव द्वितीय आदर्श रविंद्र तारळेकर,तृतिय ८ वी ते १० वी गटात अनुक्रमे रितेश राजाराम पवार प्रथम प्रतिक कल्याण महामुलकर द्वितीय,वैष्णवी दत्तात्रय भोसले तृतिय ११ वी ते महाविद्यालय गटात अनुक्रमे वैष्णवी मोहिते प्रथम निशिगंधा किरण अडगळे द्वितीय शिक्षक ग्रंथपाल गटात अनुक्रमे अंजली शशिकांत गोडसे प्रथम कीर्ती सर्जेराव बडेकर द्वितीय,रुपाली संदीप राक्षे आणि महेंद्र मधुकर रसाळ तृतिय स्पर्धेत वाचक प्रेमी खुला गटात अनुक्रमे डॉ बाळासाहेब गणपतराव जाधव प्रथम संगीता श्रीकांत केंजळे द्वितीय,प्रदिप शंकर लोहार तृतिय याचे क्रमांक आले त्यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करणेत आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित महाडीक यांनी केले सुत्रसंचलन ऋषिकेश दळवी,प्रतिक दळवी यांनी केले. कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी रतनकुमार शिळमकर,प्रतिक दळवी,महेश मोहिते,प्रसाद जाधव,अरविंद भिलारे,आदित्य पारटे,सुमित महाडीक,निर्मला लोंढे,शुभम पारटे यांनी परिश्रम घेतले.निबंध स्पर्धेसाठी नंदा जाधव,सुनिता कदम यांनी सहकार्य केले.यावेळी जिल्ह्यातील कवी ,निबंध स्पर्धेतील विजेते,विद्यार्थी,शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |