05:57pm | Apr 22, 2019 |
सातारा : खेड बु॥ ता. खंडाळा येथील ग्रामस्थांनी धोम-बलकवडी एक्सप्रेस कॅनॉलचे पाणी खेड बु॥ येथील वृंदावन धरणात सोडण्याची मागणी केली होती. तरीही संबंधित विभागाने खेड बु॥ ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवली होती. दरम्यान, खेड बु॥ ग्रामस्थांनी वृंदावन धरणात पाणी न सोडल्यास उद्या होणार्या लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव घेतला होता. वारंवार अल्टिमेटम देवूनसुद्धा सिंचन विभागाने खेड बु॥ ग्रामस्थांच्या मागणीला ठेंगा दाखवल्यामुळे खेड बु॥ ग्रामस्थही उद्या प्रशासनाला ठेंगा दाखवून निवडणूक मतदानावर बहिष्कार घालणार आहेत.
सुमारे 40 वर्षांपूर्वी खेड बु॥ येथील शेतकर्यांच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांसाठी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र असे असूनही ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर लाभक्षेत्रात असलेल्या खेड बु॥ ला धोम-बलकवडीचे पाणी अद्याप मिळालेले नाही. सध्या खंडाळा तालुक्यात मोठा दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर खेड बु॥ येथील ग्रामस्थांनी सध्या कालव्यातून सुरु असलेले आवर्तनाचे पाणी तुळशी वृंदावन धरणात सोडावे, अशी मागणी केली होती. मात्र, याबाबतचे निवेदन सिंचन विभाग यांना देण्यात आले होते. मात्र सिंचन विभागाकडून ग्रामस्थांना ठेंगा दाखविण्यात आल्याने ग्रामस्थांनी यासंबंधी ग्रामसभा घेवून 23 एप्रिल रोजी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव संमत केला. आपल्या मागण्या व ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग, तहसिलदार, प्रांत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणंद यांना देण्यात आलेल्या आहेत. परंतू एवढा खटाटोप करुनही जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली न गेल्याने उद्या होणार्या मतदानावर खेड बु॥ ग्रामस्थ बहिष्कार घालणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिलेली आहे. खेड बु॥ ग्रामस्थांच्या या पवित्र्यामुळे मात्र जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडालेली आहे.
निष्क़्रीय यंत्रणेवर कारवाई करावी !
धोम-बलकवडी योजनेच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी खेड बु॥ मधील शेकडो शेतकर्यांच्या जमिनी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतरही लाभक्षेत्रात येणार्या खेड बु॥ ला केवळ राजकीय साठेमारीमुळे आजपर्यंत पाणी मिळालेले नाही. यावर्षी भयंकर दुष्काळ पडलेला आहे. असे असूनही सिंचन विभागाशी याबाबत पत्रव्यवहार करुनसुद्धा सिंचन विभागाने खेड बु॥ येथील वृंदावन धरणात पाणी सोडले नाही. त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीच नसल्यामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यापासून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधूनही त्यांनी आजपर्यंत याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे नाईलाजाने उद्या होणार्या मतदानावर बहिष्कार घालावा लागत आहे. मात्र याला कारणीभूत असणार्या निष्क्रीय यंत्रणेवर कठोर कारवाई करण्यात यावी.
सागर वाघमारे
उद्योजक, खेड बु॥
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |