सातारा : कोरोना (कोविड-19) च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. अभूतपूर्व अशा संचारबंदीला जग सामोरे जात आहे. दुसरे महायुद्ध अनुभवलेली काही वृद्ध मंडळी असतील त्यांना त्यावेळेसची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी आणीबाणी कोरोनाच्या निमित्ताने जगभर उद्भवलेली आहे. एक व्हायरस काय करु शकतो, हे कोरोनाच्या निमित्ताने समोर आले असून संपूर्ण मानवी जीवनच कोरोनामुळे उद्ध्वस्त होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.
सुमारे 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यू ने सुमारे पन्नास कोटी लोकांना याचा संसर्ग झाला होता. त्यापैकी सुमारे 5 कोटी लोकांचा यात जीव गेला होता. प्रत्येक दशकानंतर वेगवेगळे फ्लू जगभरात आपल्या संसर्गाने मानवी जीवन धोक्यात आणीत असतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जग धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्यातरी कोरोनाला अधिकृत असे कोणतेच औषध नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा कसा, याबाबत जगभरातील देश त्याचे औषध शोधण्यासाठी सरसावले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फक्त एकच गोष्ट होवू शकते, ती म्हणजे ‘स्टे ऍट होम.’ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून 22 मार्च रोजी संपूर्ण देशभरात लॉक डाऊन जाहीर केला. एकमेकांच्या संपर्कात न येऊ देणे, हेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखू शकते, या भावनेतून पंतप्रधान मोदींनी देशभरात लॉक डाऊन जाहीर केला जरुर. पण लोकांना त्याचे गांभीर्य नाही. देशात, राज्यात आणि सातारा जिल्ह्यात लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर कलम 144 नुसार संचार व जमावबंदी आदेश पारित करुनही अनेकजण काहीच झाले नाही, या अविर्भावात दैनंदिन कामकाज करीत आहेत. सोशल मीडियावर प्रशासनासह कोरोनाचीही खिल्ली उडवली जात आहे. एकूणच जगभरात कोरोनाने 28 हजारांपेक्षा जास्त बळी घेवूनही लोकांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य नाही. देशभरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या आतापर्यंत 933 झाली असून यात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतू लोक ही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसत आहे.
देशभरात लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर शहरातील वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांचा ताबा पोलिसांनी घेतला. विनाकारण फिरणार्यांना पोलिसांनी झोडपून काढले. परंतू नागरिकांना झोडपून काढण्याची पोलिसांना हौस नाही, किंवा झोडपून काढण्याचा पगारही शासन त्यांना देत नाही. मात्र, भविष्यात कोरोनाचा महाप्रकोप रोखण्यासाठीच त्यांना हातात दंडुका घ्यावा लागला आहे, हे प्रत्येकाला समजायला हवे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतासारख्या देशामध्ये जर वाढला, तर त्याला काबुत ठेवणे अशक्यप्राय होणार आहे. एकूणच आपल्याकडे उपलब्ध असलेली साधने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिशय तोकडी आहेत. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारने आणीबाणीसदृश्य लॉक डाऊन जाहीर केले आहे. परंतू लोकांना सुखाने जगता येत नाही. पृष्ठभागावर काठीचे रट्टे बसल्यानंतर शहाणपण येते. हे खरे असले तरी केंद्रीय दूरसंचारमंत्री प्रकाश जावडेकर यांनी परवा पत्रकार परिषद घेवून घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी रामानंद सागर कृत ‘रामायण’ आणि बी. आर. चोपडांचे ‘महाभारत’ दूरदर्शनवरुन प्रसारित करण्याची घोषणा केली आहे. प्रकाश जावडेकरांच्या घोषणेनंतर 35 पासून 50 मध्ये असलेले नक्कीच सुखावले असतील, कारण यामुळे कोणाचे बालपण तर कोणाचे किशोरवयीन दिवस पुन्हा एकदा खुलणार आहेत. परंतू इंटरनेटच्या जमान्यात आणि बाहुबलीसारखे ऍक्शनपट पहायची सवय लागलेला हा समाज रामायण, महाभारत किती स्विकारेल, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी लोकांच्या मनात आता कोरोनाबाबत दहशत निर्माण करण्याची वेळ आली आहे.
9 सप्टेंबर 2011 रोजी हॉलिवुडमधील प्रथितयश दिग्दर्शक स्टिव्हन सोडेनबर्ग याचा ‘कंटेजन’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा तुफान चालला. हॉंगकॉंगमधून वटवाघुळ आणि पाळीव डुकरापासून संक्रमित झालेला एक व्हायरस एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत असलेल्या महिलेच्या माध्यमातून अमेरिकेत आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात कसा पसरतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला जी परिस्थिती उद्भवलेली आहे, त्याच परिस्थितीचे तंतोतंत चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. कोणताही विषाणू स्वत:हून पसरत नाही, तर त्याचा माणसाच्या माध्यमातूनच माणसात प्रादुर्भाव होत असतो. सुमारे नऊ वर्षापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला. कदाचित त्यावेळी हा चित्रपट पाहत असणार्या प्रेक्षकांना केवळ नऊच वर्षांमध्ये अशीच परिस्थिती उद्भवेल, असा विचारसुद्धा त्यांनी केला नसावा. परंतू कोणतीही गोष्ट अशक्य नसते. माणसाने स्वत:च्या कृतीतूनच संकट ओढवण्याचे दुर्गूण प्राप्त केले आहेत. आजच्या घडीला जे काही होत आहे, याच गोष्टीला केवळ माणूसच जबाबदार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना (कोविड-19)ला चायनिज व्हायरस असे संबोधलेले आहे. चीनमधील वुहान या शहरातून डिसेंबरमध्ये हा व्हायरस संपूर्ण जगात पसरला. केवळ तीनच महिन्यात सुमारे 6 लाख 14 हजार 158 लोक कोरोना बाधित झाले असून 28 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एकूणच हा जीवघेणा व्हायरस असूनही भारतामध्ये मात्र या व्हायरसबद्दलची दाहकता लोकांमध्ये दिसून येत नाही.
देशातील जवळजवळ सर्वच राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्रासह राज्य शासनही कोरोनाशी लढण्यासाठी तयार आहे. परंतू लोकांची मानसिकता खुजी झाली आहे. आतापर्यंत जगभरात अनेक जीवघेण्या व्हायरसने धडक दिली आहे. यामध्ये स्पॅनिश फ्लू, मरबर्ग, इबोला, रेबिज, एचआयव्ही, स्मॉल पॉक्स, हंता व्हायरस, एन्फ्लूएन्झा, डेंग्यू, रोटा व्हायरस, सार्स सीओव्ही-1, सार्स सीओव्ही-2, मर्स सीओव्ही, बर्ड फ्लू, निपाह, स्वाईन फ्लू यांचा समावेश आहे. काही व्हायरसवर औषधे निघाली आहेत, तर काही व्हायरसवर 100 टक्के गुणकारी असे औषध नाही. त्यामुळे जगभरातील लाखो संसर्गितांना दरवर्षी या व्हायरसच्या प्रादुर्भावाने जीव गमवावा लागतो आणि लागत आहे. मात्र, पिढी दर पिढी हे विषाणू आपले उपद्रवमूल्य दाखवणारच, परंतू या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी लोकांना इथूनपुढे खंबीर व्हावे लागणार आहे. सरकार आपापल्यापरिने विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशापद्धतीने लढायचे, याबाबत मार्गदर्शन करीतच असते, मात्र याची अंमलबजावणी करणे हे खरेतर लोकांच्याच हातात आहे. परंतू कळतंय पण वळत नाही, अशी काहीशी परिस्थिती देशभरात निर्माण झालेली आहे. सुमारे 9 वर्षापूर्वी स्टिव्हन सोडेनबर्ग दिग्दर्शित प्रदर्शित झालेला कंटेजन हा चित्रपट ज्याला ज्याला कोरोना संसर्गाची भीती वाटत नाही, त्यांनी जरुर पहावा. जेणेकरुन व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर काय परिस्थिती होते, याचे आकलन संबंधिताला होणार आहे. कंटेजन पाहून जर काही फरक पडत नसेल तर 2013 सालचा 'फ्लू', 2006 चा बर्ड फ्लू, 2009 सालचा कॅरिअर्स, 1950 सालचा पॅनिक इन द स्ट्रीटस्, 1995 सालचा आऊट ब्रेक, तर 2016 सालचा पँडॅमिक जरुर पहावा. जेणेकरुन व्हायरसचा प्रादुर्भाव काय असतो, हे संबंधिताला कळून नाहीतर समजून चुकणार आहे.
- संग्राम निकाळजे
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |