03:14pm | Sep 25, 2018 |
कराड : कराड जनता बँकेची परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. एनपीएमधून लवकरच बँक बाहेर पडले. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याचिकाकर्ते राजेंद्र पाटील हे निव्वळ पैसे मिळवण्यासाठी बँकेवर सातत्याने तक्रारी करत आहेत. त्यांनी आतापर्यंत बँकेवर १६ तक्रारी केल्या आहेत. तर ऑडिटरला पैसे मागण्याचा प्रकार यापूर्वी केल्याचा खळबळजनक आरोप कराड जनता बँकेचे चेअरमन राजेश पाटील-वाठारकर यांनी केला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आरबीआयच्या अहवालाचा दुजोरा देऊन जे आरोप केले आहेत, ते पूर्णपणे चुकीचे व बिनबुडाचे आहेत. संबंधित आरबीआयची खोटी कागदपत्रे तयार करून दिशाभूल केली जात असल्याचा दावा सीईओ व्ही. डी. सुर्यवंशी यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी याचिकाकर्ते राजेंद्र पाटील, माजी व्हा. चेअरमन अनिल खुंटाळे व अन्य दोन सभासदांनी कराड जनता बँकेचे चेअरमन राजेश पाटील-वाठारकर व सीईओ सुर्यवंशी यांनी संगणमताने २५०कोटींची बोगस कर्जे देऊन मनी लाँडरींग केल्याचा आरोप केला होता. या आरोपांचा उत्तर व बँकची सद्यस्थितीची माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजेश पाटील-वाठारकर म्हणाले, भारतीय रिझर्व बँकेने कराड जनता बँकवर निर्बंध साधल्यापासून आजअखेर आरबीआयकडून एनपीए दुरूस्ती करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी मिळाला होता. याकाळात कर्ज वसुलीसाठी अनेक अडचणी आल्या आहेत. त्यावर मात करत बँकेने चांगल्या पध्दतीने काम करत आहे. आरबीआयच्या सूचनानुसार बँकेचा कारभार काटकसरीने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मार्च २०१८ अखेर ५३ कोटी ७३ लाख, मे ते जून २०१८ या तीन महिन्यात ३ कोटी ७४ लाख तर ऑगस्टअखेर ४ कोटी ९८ लाख इतकी ॲसेट रक्कम वसुली केली आहे. शिवाय नवीन एनपीए कर्जामध्ये वाढ होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
ते म्हणाले, सध्या बँक बंधनात असताना बँकेस जादा स्वत:चे भांडवल उभारता आले तर नेटवर्थची रक्कम 'सीआरएआर'चे प्रमाण अनुकूल होणार आहे. ठेवीदारांनी १ लाखापेक्षा अधिक रक्कम आहे, ती रक्कम बँकेच्या शेअर्समध्ये गुंतवण्यास परवानगी दिली आहे. याबाबत ठेवीदारांशी चर्चा होऊन बँकेस चांगले भांडवल मिळणार आहे. शिवाय नवीन सभासद करून घेण्यासही बँकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे नवीन भागभांडवल उभारणी करणे, हे बँकेचे मुख्य उद्दिष्ठ असून बँकेने १ कोटी ४३ लाख इतकी रक्कम शअर्स अनामत खाती जमा केली आहे. शिवाय बँकेने व्यवस्थापन खर्चात काटकर करण्यात सुरूवात केली आहे. यात नोकर संख्या कमी करणे व पगार खर्चात कपात करणे यासाठी आरबीआयाने परवानगी दिली आहे. बँकेने स्वेच्छा निवृत्ती योजनेच्या माध्यमातून ७७ कर्मचाऱ्यांनी राजिनामे दिले आहेत. तर अजून काही देण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे दर महा ३९ लाख ३ हजार इतका पगारावरील खर्च कमी झाला आहे. याशिवाय बँकेच्या काही शाखा बंद करण्यास परवानगी मागितली असून पुणे, मुंबईच्या शाखा कमी भाड्याच्या जागेत स्थलांतरीत करण्यास परवानगी मिळाली आहे. जेष्ठ नागरिक, विधवा, अपंग, लग्नकार्य, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आदी कारणासाठी सुमारे साडेतीन हजार ठेवीदारांनी १७ कोटी ३२ लाख इतक्या ठेव रक्क्म परत केली आहे.
वाठारकर पुढे म्हणाले, राजेंद्र पाटील या व्यक्तीने बँकेवर आतापर्यंत १६ तक्रारी केल्या आहेत. शिवाय माझ्यावर खाजगी केसे केली आहे. हा सर्व खटाटोप निव्वळ पैसे मागण्याकरिता केला जात आहे. सांगली ऑडिटर होते त्यांच्याकडून चुक झाली म्हणून त्यांना पैसे मागणे तसेच बऱ्या ऑडिटर त्रास देण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवाय त्यांनी विचारलेल्या ४३ प्रश्नांची उत्तरे त्यांना दिली आहेत.
व्ही. डी. सुर्यवंशी म्हणाले, राजेंद्र पाटील यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व खोटे आहेत. त्यांनी जे आरबीआयचे सर्व दाखवलेली कागदपत्र खोटी आहेत. त्यामुळे संबंधितांनावर कायदेशीर काय कारवाई करता येईल याबाबत वकीलांकडून माहिती घेऊन ती केली जाणार आहे.
सर्व तक्रारदारांना कर्जात सवलत
राजेंद्र पाटील, अनिल खुंटाळे यांच्यासह अन्य दोन तक्रारदारांना बॅंकेने कर्जात सवलत दिली आहे. शिवाय मदतही केली आहे. अनिल खुटाळेंचा तर शंभर रूपयांचा शेअर्स असून एक रूपयांचे डिपॉझीट नाही. मात्र त्यांच्या भाच्याला त्यांच्या काळात त्यांनीच दिलेल्या ११ लाख कर्जाचे २४ लाख झाले ते थकल्यानंतर त्या कर्जात ९ लाखाची सवलत दिली होती. कोर्टीकर अन्य व्यक्तीविषयी बोलायलाच नको, अशी परिस्थिती आहे. मात्र याचा बोजा बॅकेवर पडला का? या प्रश्नाला सोईस्कर पध्दतीने राजेश पाटील व सुर्यवंशी यांनी बगल दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |