01:55am | Aug 25, 2018 |
कराड : देशाच्या अर्थकारणात सहाकारचे कामी होणारे महत्व वाढवण्यासाठी सहकार चळवळीचे शुध्दीकरण व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचे आधिकार परत मिळवून देणे या दोन गोष्टी देशातच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. याची जाणीव असणारे व्यक्तीमत्व म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या राजकीय सांप्रदायाचे वारसदार विलासकाकाच आहेत. काकांच्या राजकारण व समाजकारणाला प्रबोधनाची जोड आहे. अशा व्यक्तीच्या जीवन प्रवासावर लिहिलेला 'समाजकारणातील भगीरथ' हा ग्रंथ येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे गौरोद्गार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
दरम्यान, कोणत्याही पक्षासाठी आत्ताची व्यवस्था मारक आहे. राजनैतिक दृष्ट्या ही परिस्थिती बदलण्यासाठी विलासकाका तुम्ही आता पुन्हा मशाली पेठवण्याची गरज असल्याचे मत कृषी अर्थतज्ज्ञ व भारताचे माजी कृषी सल्लागार डॉ. निळकंठ रथ यांनी व्यक्त केले तर काकांची कराडला किती गरज आहे, हे माहीत नाही. मात्र महाराष्ट्राला नक्कीच काकांची गरज आहे. त्यामुळे काका तुम्ही रायगडला या आम्ही तुम्हाला आमदार करतो, असे मत रायगडचे आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या ५० वर्षातील राजकीय व सामाजिक कार्यावर आधारित 'समाजकारणातील भगीरथ' या गं्रथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रकाशन सोहळ्याला दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. यावेळी माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, माजी आमदार व साहित्यिक रामदास फुटाणे, माजी पोलीस अधिक्षक माधवराव सानप, दिनेश ओहळकर, पी. बी. पवार, अभय टिळक, ग्रंथाचे संपादक प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा. धनाजी काटकर उपस्थिती होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, काका हे राजकारणातील हे एकमेव अव्दितीय आहेत हा जसा त्यांच्यासाठी मोठेपणा आहे. तशी ती महाराष्ट्राची शोकांकिता आहे. काका अव्दितीय असायला नको होते. तर असे काका राज्यात अनेक असायला हवे होते. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणारे काका हे एकच असल्याने ते एकमेव आहेत. राजकारण हे साधन आणि समाजकारण साध्य आहे. याची काटेखोरपणे जपणून काकांनी केली आहे. यामुळे काकांकडून आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तसेच काकांच्या समाजकारणाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे.
ते म्हणाले, स्वतंत्र राष्ट्राची अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे. यात सहकार ही देशातील स्वतंत्र अर्थ व्यवस्था होऊ शकते. हे काकांनी आपल्या कार्यातून राज्यासह देशाला दाखवून दिले आहे. देशाच्या अर्थकारणात सहाकारचे कमी होणारे महत्व वाढवण्यासाठी सहकार चळवळीचे शुध्दीकरण व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचे आधिकार परत मिळवून देणे या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. यासाठी विकालकाकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
डॉ. निळकंठ रथ म्हणाले, सध्या राजकारण हा तुच्छतेचा शब्द झाला आहे. आजपर्यंत देशाचा इतिहास पाहिला तर महात्मा फुले यांच्यापासून गांधींजीपर्यंत राजकारण चालत आले आहे. कोणी वेगळे काही करत नव्हते. आता त्याची एवढी वाईट अवस्था झाली की, सर्वसामान्य माणूस याकडे तुच्छेने पाहत आहे. वास्तविक पाहता राजकारणाचा एक भाग म्हणजे समाजकारण. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था उभ्या केल्या. मात्र यशस्वी व्यवस्था बंद करण्याचे धोरण राबले आहे. यासाठी जिल्हा परीषदेला त्यांचे यश नडले आहे. त्यामुळे त्यावर गंडांत्तर आणण्याचे काम सुरू आहे. ते देशाला मारक आहे. त्यामुळे आत्ताची व्यवस्था मारक असून राजनैतिक दृष्ट्या ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.
आ. जयंत पाटील म्हणाले, ज्या सातारा जिल्ह्यात पुरोगामी विचार वाढला, रूजवला आहे. पुरोगामी चळवळ उभी राहिलेल्या या भुमीतून बहुजन समाजाचे राजकारण, पुरोगामी विचार आणि सहकार चळवळ याचा मेळ घालत स्व. यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण केले. मात्र चव्हाणसाहेबांच्या कराडमध्ये आता वेगळा विचार उभा राहतोय, हे काही बरोबर नाही. त्यासाठी आता काँग्रेस आली तरी चालेल मात्र भाजप नको, असे म्हणण्याची वेळ आली. त्यामुळे येथील कृष्णा दुषित झाली आहे, या कोणतेही दुमत नाही. त्यामुळे काका तुम्ही आता प्रबोधनाचे काम हाती घ्या. कराडच्या लोकांना काका पाहिजे आहेत की नको हे मला माहित नाही पण काकांची गरज महाराष्ट्राला असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
राजकीय व समाजिक प्रबोधनाची गरज
लोकसभेतील गळा भेट म्हणजे 'मंगळ सुत्राचा गळा नाही, पदराचा लळा नाही दोघांचेही वांदे. अधून मधून परदेश गमन बीन परतीचे कांदे' अशी देशात चर्चा चवीने झाली. मात्र काका आणि आमची भेट वेगळी आहे असे सांगत रामदास फुटाणे म्हणाले, काकांना काही लोक स्पष्टोक्ती म्हणतात. काही लोक फटकळ म्हणतात. यात जसा त्याचा फायदा झाला तसे नुकसानही झाले आहे. मात्र ते नुकसान कधी मोजतच नाहीत त्यांची बांधीकी समाजाशी आहे. सध्या बँक काढतानाच 'केंव्हाही उघडता येते. चावीच असते उशाला घोटाळाच करायचा नसेल तर बँक काढायची कशाला?' असा उद्देश आहे. सध्या पक्षाचे खासदार, आमदार एजंटाचे काम करत आहेत. त्यामुळे राजकीय व समाजिक प्रबोधनाची गरज आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |