09:21pm | Jan 16, 2019 |
खंडाळा : खंडाळा तालुक्याच्या विकासाकरिता भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असून आपण केलेल्या एका ईमेलवर खंडाळा तालुक्याच्या विकासाच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच भेटीत सोडवल्याने खंडाळा तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांनी केले. शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी आयोजित भारतीय जनता पार्टीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अनुप सूर्यवंशी म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडाळा तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेत प्रलंबित असलेले व केवळ दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या खंडाळा तालुक्यातील जनतेला आश्वासनाच्या गर्तेतून बाहेर काढत प्रत्यक्ष कृतीतून विरोधकांना नामोहरम केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळ असलेल्या नायगावच्या विकासाला गती देत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नायगावच्या विकास कामांना तातडीने जाहीर सभेतच मंजुरी दिली. शिरवळच्या बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व पुणे जिल्ह्यातील ४० गावासाठी वरदान ठरणाऱ्या नीरा नदीवरील शिरव-राजापूर पुलाला मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याने शिरवळसह पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी विकासाची दारे खुली झाली आहे. यामाध्यमातून सासवड याठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्याकरिता कारखानदारांसह नागरिकांना सुखकर मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे खंडाळा तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरणाऱ्या नीरा-देवघर च्या लाभ क्षेत्रातील तब्बल २५ गावामधील बारा हजार हेक्टर क्षेत्र सिचनाखाली येणार असतानाही केवळ निधीअभावी उपसा जलसिंचन योजनेचे अनेक वर्षांपासून रखडलेल्या खंडाळा तालुक्यातील गावडेवाडी ,वाघोशी ,शेखमिरवाडी या उपसा जलसिंचन योजनेला गतिमान करत निधीची कमी पडू न देण्याचे जाहीर केल्याने उपसा जलसिंचन योजनेला गती मिळणार आहे.
गेल्या ३९ वर्षांपासून केवळ कागदावरच राहिलेला व खंडाळा तालुक्याच्या दृष्टीने अविभाज्य घटक बनलेल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत मांढरदेव याठिकाणी जाण्याकरिता शिरवळ-मांढरदेव रस्त्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिल्याने भोर जि.पुणे तसेच वाई तालुक्यातील रस्त्यावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन भाविकांना सुखकर व सुरक्षित प्रवास मिळणार आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , महात्मा फुले यांना केंद्र शासनाने भारतरत्न हा सर्वोच्च भारतातील पुरस्कार द्यावा यासाठी शासनाने शिफारस करत त्याचा सातत्याने राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्याने भारतरत्न पुरस्कार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , महात्मा फुले यांचे कार्य जगामध्ये अधोरेखित होणार आहे. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडाळा तालुक्याच्या दृष्टीने घेतलेले धोरणात्मक निर्णयामुळे विकासाला चालना मिळणार असल्याने खंडाळा तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे खंडाळा तालुकाध्यक्ष राहुल हाडके,शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे, नायगाव सरपंच निखिल झगडे, शिरवळ शहराध्यक्ष निळकंठ भुतकर , उमाकांत राठी,अमीर शेख,गणेश शेटे आदी उपस्थित होते.
नीरा देवघर उपसा जलसिंचन योजनेला २०१ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर
खंडाळा तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा-देवघरच्या गावडेवाडी,शेखमिरवाडी व वाघोशी या अपूर्ण असलेल्या उपसा जलसिंचन योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन निधी देत तब्बल २०१ कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने या योजनेला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे.त्याचप्रमाणे गेल्या ३९ वर्षापासून केवळ स्वप्न पाहणाऱ्या खंडाळा तालुकयातील जनतेसाठी महाराष्ट्राचे आराध्यदैवत मांढरदेवकडे जाणाऱ्या शिरवळ-मांढरदेव रस्त्याला मंजूरी देत तत्काळ २४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने हाही अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याने महाराष्ट्रातील अनेक भाविकांचा वेळ व पैसा वाचत प्रवास सुखकर होणार असल्याची माहिती अनुप सूर्यवंशी यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |