11:32pm | Nov 22, 2018 |
कराड : मोदी हे जादूगर आहेत आणि सर्व परिस्थिती बदलणार, असे निवडणुकीपूर्वी भासविण्यात आले होते. पण, या सरकारमुळे समाजात झालेला एक बदल सांगा, असा प्रतिप्रश्न करून केंद्र आणि राज्यातील सरकार जाहिरातबाज निघाल्याची टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आरक्षणाबाबत मराठा समाजात गोंधळ असून याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल जनतेसमोर यायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
येथील प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सदानंद सुळे, नंदकुमार बटाणे, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, नाना पवार उपस्थित होते.
खा. सुळे म्हणाल्या, सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने दिलेली किती आश्वासने पूर्ण केली. उलट पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या किंमती वाढतच आहेत. किती नोकर्या मिळाल्या, किती नवीन उद्योगधंदे आले, किती लोकांच्या खात्यात 15 लाख जमा झाले, सर्वजण शैक्षणिक प्रवाहात आले का, सर्वांना शैक्षणिक प्रवेश मिळाला का, रेल्वे, विमानतळ कोठे उभे राहिले का? मग या सरकारचे गेल्या चार वर्षातील मोठे काम अथवा समाजात सरकारमुळे झालेला बदल दाखवा. या सरकारने काम न करता केवळ पेट्रोल पंपावर आणि पेपरमध्ये केवळ जाहिरातबाजी केली. त्यामुळे या सरकारला जनतेची फसवणूक करणारे सरकार म्हणावे लागेल. सध्या मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा वेळी शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असे सवाल त्यांनी केले.
सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या कारभाचा भांडाफोड करण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही राज्यभर यात्रा काढली. त्यातून लोकांनाही सरकारची फसवेगिरी लक्षात आली. येत्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे सांगून सुळे म्हणाल्या, जागा वाटपात एखाद्या-दुसर्या मतदार संघाची अदलाबदल होऊ शकते. मात्र, त्याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांच्या चर्चेतून आणि संमतीने होऊ शकेल. महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार का, या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, मी खासदार आहे. सहा विधानसभा मतदार संघ आणि सहा आमदार लोकसभा मतदार संघात येतात. मी दिल्लीत रमले आहे आणि तेथेच बरी आहे. मात्र, मुख्यमंत्री हा कर्तृत्ववान आणि संवेदनशील असला पाहिजे. त्याच्यात कार्यक्षमता असायला हवी.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |