करे अल्पज्ञानी बहु बडबडाट। जसा निर्झराचा अति खळखळाट॥
असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा। विना नाद वाहे जशी गंगाधारा॥
समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वहात अवघा मतदारसंघ विकासकामांनी चिंब करणारा एक दमदार आमदार जर कोण असेल तर, ते ङ्गक्त आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले होय. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून छत्रपती घराण्यातील आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राज्याच्या राजकीय पटलावर नावलौकिक आहे. लोकहितार्थ निर्णय, विकासाभुमिख कारभार, कर्तव्यदक्ष, लोकसंग्रह, विविध निवडणूकांमधील विजय, पक्षासाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच आ. शिवेंद्रसिंहराजे होय. राजकीय व्यक्तीमत्वासाठी लागणार्या ङ्गुटपट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव, जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते म्हणजे सातारा- जावलीचे आ. श्रीमत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले होय. केवळ राजघराण्यात जन्माला येवून कर्तुत्ववान होता येत नाही तर, त्यासाठी राजघराण्याची समाजसेवेची परंपरा कृतीतून सिध्द करावी लागते, हे बाबाराजेंनी आपल्या अलौकिक आणि अजोड कर्तुत्वाने सिध्द केले आहे. बाबाराजेंनी सातारा आणि जावली तालुक्यात गाव न गाव डांबरी रस्त्याने जोडून, ठिकठिकाणी बंधारे बांधून जलक्रांती घडवली आणि प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहचवली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार्या, विकासकामात राजकारण, पक्षीय भेदभाव न करता प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवणार्या, सहकारक्रांती करुन बेरोजगारीला आळा घालणार्या या लोकसेवकाने जनतेच्या ह्रदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे. अजोड कर्तृत्वामुळे सातारा- जावलीचे विकासपुरूष म्हणून ख्याती मिळवलेल्या या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा छोटासा आढावा...
एके काळी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सातारा तालुक्याची ङ्गारशी ओळख नसल्याने वाई अथवा कराड मतदारसंघावर अवलंबून राहणार्या सातारा तालुक्यातील जनतेची ङ्गरङ्गट सुरु होती. 1978 मध्ये आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या रुपाने सातारा तालुक्याला प्रभावी नेतृत्व लाभले आणि सातारा तालुक्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. आमदार ते सहकारमंत्री अशी अनेक पदांच्या आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकिक वाढवणार्या भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्याचा पुर्णपणे कायापालट केला. भाऊसाहेब महाराजांच्या अकाली निधनानंतर तालुका आपल्या विकासाभिमुख नेतृत्वाला पारखा झाला. स्व. भाऊसाहेब महाराजांनंतर सातारा तालुक्यात सुरु झालेली विकासाची गंगा अविरत सुरु ठेवण्याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर आली. जुन्या, जेष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत नवीन युवा कार्यकर्त्यांची मोट बांधून सातारा मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु केला. अल्पावधीतच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपले नाव कोरले. स्व. भाऊसाहेब महाराजांची उणीव आ. शिवेंद्रसिंहराजेंनी भरुण काढली आणि सातारा तालुक्याला उभारी देण्याचे काम केले. आ. शिवेंद्रसिंहराजेच्या रुपाने सातारा विधानसभा मतदारसंघाला कल्पक, कुशाग्र, विनयशिल, संयमी आणि समाजकारणी नेतृत्व लाभले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उरमोडी धरणाचा महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावला. तसेच सातारा शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा यासाठी अनंत अडचणींवर मात करुन कास धरणाची उंची वाढवण्यास मंजुरी मिळवली. आज कासची उंची वाढवण्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला असून सातारा शहरासह आजूबाजूच्या गावांचाही पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सूत गिरणी, ङ्गळे, ङ्गुले व भाजीपाला खरेदी- विक्री संस्था आदी सहकारी संस्थांची उभारणी करुन सातारा तालुक्यात सहकाराचे जाळे विणले. या सहकारी संस्थांना उर्जितावस्था मिळवूण देण्यात आ. शिवेंद्रसिंहराजेंचा सिंहाचा वाटा आहे. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून झाला आहे. जनहिताचे निर्णय घेवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे नेतृत्व अशी ख्याती आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामाच्या रुपाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे विचार पोहचले आणि अल्पावधीत आ. शिवेंद्रसिंहराजे हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनतेतील प्रेम आणि जिव्हाळा एवढा वाढला की, सामान्य कार्यकर्ताच नव्हे तर अगदी सामान्य माणूसही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी थेट संपर्क साधू लागला. मागेल ते काम पुर्ण करण्याची धमक आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये असल्याने सातारा तालुक्यातील प्रत्येक गावात डांबरी रस्ता, समाजमंदीर, अंगणवाडी, शाळा इमारत, पाणीपुरवठा योजना, बंधारे असा चौङ्गेर विकास झाला. जनसामान्य थेट आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे येवू लागल्याने आपोआपच ऋणानुबंध वाढत गेला आणि आ. शिवेंद्रसिंहराजे हे आपल्या घरातीलच एक सदस्य आहेत, अशी भावना जनसामान्यांमध्ये वाढीस लागली. सुरुवातीला विवाह सोहळ्याला उपस्थित राहणारे आ. शिवेंद्रसिंहराजे कोणताही भेदभाव न ठेवता मतदारसंघातील जनतेच्या प्रत्येक सुख- दुख:त सहभागी होवू लागले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनसामान्यांचे घनिष्ठ ऋणानुबंध निर्माण झाले. जनतेने वेळोवेळी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना भूरळ घातली. यामुळेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या भोवती युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ वाढू लागले. नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थावर सत्ता असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विविध पदांवर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांनाही संधी दिली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या निस्वार्थी स्वभावामुळे हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी मनाने जोडले गेले आहेत. केवळ कार्यकर्त्यांची ङ्गौज सोबत मिरवणार्या नेत्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. कार्यकर्त्यांना केवळ ङ्गिरवण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, हीच भुमिका आ. शिवेंद्रसिंहराजे यांची असल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते.
आमदारकीच्या कालावधीत सातारा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार्या आ. शिवेंद्रसिंहराजेंवर जनतेची अढळ निष्ठा आहे. ही निष्ठा आणि प्रेम कायम ठेवण्यासाठी आणि आपला समाजसेवेचा वसा जपण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे नेहमीच प्रयत्नशील असतात. 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघात अनेक ङ्गेरबदल झाले. सातारा आणि जावली मतदारसंघ एक झाला आणि या एकत्रीत मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार आणि आ. अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सातारा- जावली मतदारसंघाची जबाबदारी टाकली. स्व. भाऊसाहेब महाराज आणि जावलीकरांचा ऋणानुबंध ङ्गार जुना आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांवरील प्रेम आणि निष्ठा जावलीकरांनी सातत्याने सिध्द केली आहे. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणूकीत सातारा- जावली मतदारसंघातील जनतेने आ. शिवेंद्रसिंहराजे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून दिले आहे. मतदारसंघाच्या भौगोलीक परिस्थितीत वाढ झाल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जबाबदारीतही वाढ झाली. मात्र विकासकामे करण्यात कधीही मागे पुढे न पाहणार्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्याचा सर्वांगिण समतोल विकास साधला. जावलीकरांनी टाकलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवत आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जावलीतही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. प्रत्येक वर्षी आमदारङ्गंड विकासकामांसाठी खर्च करणारे आमदार म्हणूनही आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दरवर्षी मतदारसंघात कोट्यावधींची कामे केली जातात. कामांची यादी स्पष्ट करायची म्हटले तर, वृत्तपत्राची पानेही पुरणार नाहीत.
विकासाच्या झंजावातामुळे सातार्याप्रमाणेच जावलीतील कार्यकर्ते आणि सामान्य जनता आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत जोडली गेली आहे. विकासकामात राजकारणाला महत्व न देणारे नेतृत्व, अशी वेगळी ओळख आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे. दुर्गम, डोंगराळ जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. डोंगराळ भागातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून प्रत्येक गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या इमारती बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या भागातील जनतेला खर्या अर्थाने ज्ञानाची कवाडे खुली करुन दिली आहेत. केवळ विकासकामे करण्याकडेच कल न ठेवता आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले आहेत. जावली तालुक्यातील महु- हातगेघर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने व्हावे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जनतेला न्याय देण्याची भुमिका घेतली आहे. सातार्यासह जावलीतील प्रत्येक गावात मुलभूत सोयी- सुविधा पुरवून, विकासापासून वंचीत राहिलेल्या जनतेला त्यांनी प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. पर्जन्यमानातील घट आणि वारंवार दुष्काळाचे संकट भेडसावत असल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या मतदारसंघात पाणीसाठवण बंधार्यांची साखळी निर्माण करुन जलक्रांती घडवली आहे. सातारा- जावलीचा विकास हाच आपला ध्यास हे ब्रीद घेतलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कतृत्वाने हे ब्रीद सिध्द करुन दाखवले आहे. आपले कतृत्व, जनतेचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघाचा पुर्णपणे कायापालट केला आहे. हा मतदासंघ विकासाचा रोल मॉडेल ठरावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न असून आगामी काळात त्याचा प्रत्यय येईल. मतदारसंघातील जनतेला केवळ शासकीय निधीवर अवलंबून न ठेवता, प्रसंगी स्वखर्चाने जनसामान्यांचे प्रश्न सोडवणार्या, जळीतग्रस्त, आपत्तीग्रस्त, अतीवृष्टीग्रस्तांना स्वत: मदत करणार्या लोकसेवक बाबाराजेंना वाढदिवसानिमीत्त लक्ष, लक्ष शुभेच्छा.
- अमर मोकाशी,
(जनसंपर्क अधिकारी, सुरुची सातारा)
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |