02:18am | Mar 25, 2019 |
कराड : मोदी सरकारने सर्व स्तरातील जनतेची फसवणूक केली आहे. वारेमाप आश्वासने देण्याशिवाय यांनी गेल्या पाच वर्षांत काहीही केलेले नाही. नोटाबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी यासारख्या निर्णयांमधून लाखो लोकांचे संसार देशोधडीला लावणार्या या फसव्या सरकारला घरी घालवण्याची वेळ मतदारांनी आता घालवू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा कराडमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे, आ. जयंत पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. आनंदराव पाटील, आ. सुमन पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. हसन मुश्रीफ, आ. शशिकांत शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर सुरु केला आहे. गेल्या 5 वर्षांत 12 हजारहून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यूपीए सरकारच्या कालखंडात आपण केंद्रीय कृषी मंत्री असताना शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कृषी धोरणात बदल करण्यास सांगितले. त्यानुसार देशभरातील शेतकर्यांना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. याउलट फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या 34 हजार कोटींच्या कर्जमाफीच्या फसव्या घोषणेनंतर दोन वर्षांनीही अजून 50 टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. शेतकर्यांना हमीभाव दिला जात नसून उत्पादकापेक्षा ग्राहकाचाच प्राधान्याने विचार केला जात आहे. अशाने शेतकरी शेती व्यवसाय सोडून देतील आणि परदेशातून अन्नधान्य आयात करावे लागेल.
आरबीआय, सीबीआय, कॅग यासारख्या संविधानीक संस्था मोडीस काढण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मोदी ना खाउंगा ना खाने दुंगा अशी घोषणा देत असले तरी प्रत्यक्षात त्यांचे वर्तन वेगळेच आहे. यूपीए सरकारच्या काळातील 350 कोटी रुपये किंमतीच्या राफेल विमानाची किंमत 1600 कोटी रुपये कशी झाली? याबाबतच्या प्रश्नाचे उत्तर दिले जात नाही. याबाबत जेपीसी चौकशीला सामोरे जाण्यास मोदी सरकार का घाबरत आहे? पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईचा सार्या देशाला अभिमान आहे. परंतु मोदी सरकार या कारवाईचा राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी असे कधीच घडत नव्हते. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरलेल्या या सरकारला पराभूत करण्याची वेळ आता आली असल्याचे मत पवार यांनी शेवटी व्यक्त केले.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, माझ्या राजकीय विश्लेषणानुसार 2019 नंतर मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत. 2014 साली विरोधी पक्षांची एकजूट नसल्याचा फायदा भाजपला झाला आणि केवळ 31 टक्के मते मिळवूनही ते सत्तेवर येउ शकले. परंतु आता देशातील लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवण्यासाठी 23 पक्ष एकत्र येउन भाजपला सामोरे जात आहेत. वंचित बहुजन आघाडी ही केवळ मतविभागणीसाठी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे भाजपला मदतच केली जात आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील रोजगार निर्मिती ठप्प झाली असून भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली फक्त 28 टक्केच आश्वासने पूर्ण केली आहेत. नोटबंदीसारख्या अविचारी निर्णयामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. नोटबंदीचा सुमारे 80 कोटी लोकांना त्रास सहन करावा लागला. जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे छोटे व्यापारी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. राफेल विमान खरेदीत देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. लोकशाही टिकवण्यासाठी नरेंद्र मोदीसारखा हुकुमशहा सत्तेतून घालवला पाहिजे. भाजपला सक्षम उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांना दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत, अशी टीका त्यांनी शेवटी केली.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |