03:57pm | Apr 16, 2018 |
नवी दिल्ली : एप्रिल आणि मे या दोन तीव्र उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये देशातील बहुतांश भागात पाण्याच्या दुर्भिक्षाची स्थिती राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, वाढत्या तापमानाच्या काळात भारतातील ४०४ जिल्ह्यांमध्ये साधारण ते तीव्र स्वरुपात दुष्काळी स्थिती राहण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे.
या ४०४ जिल्ह्यांपैकी १४० जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत तीव्र ते अत्यंत तीव्र दुष्काळी स्थितीची नोंद झाली आहे. यांपैकी १०९ जिल्ह्यांत सर्वसाधारण कोरडे हवामान होते तर १५६ जिल्ह्यांमध्ये साधारण कोरड्या हवामानाची स्थिती होती. जानेवारी ते मार्च या महिन्यांदरम्यान, देशातील १५३ जिल्ह्यांत पावसाचा शिडकावा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने ५८८ जिल्ह्यांपैकींच्या या आकडेवारीची माहिती दिली आहे. यासाठी गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून झालेल्या पावसाचा अभ्यास करण्यात आला आहे.
दरम्यान, उन्हाळ्यात प्रत्येक वर्षी देशातील अनेक भागात पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. मात्र, यावेळी ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत. कारण यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, देशभरात जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ६३ टक्के पावसाची तूट राहणार आहे. तर मार्च ते एप्रिल या काळात हेच प्रमाण ३१ टक्के राहणार आहे.
यंदा दुष्काळी स्थिती प्रामुख्याने उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्व भारतातील बिहार आणि झारखंड येथील काही भागात दुष्काळी स्थिती राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या तुटीचे मोठे प्रमाण वायव्य भारतात राहण्याची शक्यता आहे. यामध्ये पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. या सर्व भागांमध्ये गेल्या पावसाळ्यात १० टक्के कमी पाऊस झाला. त्यानंतरच्या महिन्यांत ही परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ही पावसाची स्थिती ५४ टक्के इतकी होती. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान ६७ टक्के कमी पाऊस झाला होता.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |