02:25am | Jan 11, 2020 |
कराड : आज प्रत्येक क्षेत्रात तणावाची स्थिती आहे. हा तणाव दूर करण्यासाठी सर्वांनी प्रथम दुसर्याशी स्पर्धा करणे बंद करावे. प्रत्येकाने केवळ स्वतःशी स्पर्धा करावी. स्वतः सोबत दुसर्यांच्या हिताचा विचार करून मनोवृत्तीत बदल केल्यास जीवनात निश्चितपणे यश मिळते, असा मौलिक सल्ला प्रल्हाद वामनराव पै यांनी दिला आहे.
पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सदगुरु वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाद पै यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कराडमधील पत्रकारांसह जीवन विद्या मिशनचे सदस्य उपस्थित होते.
प्रल्हाद पै म्हणाले, जगासह आपण सर्वजण ग्लोबल झालो आहोत. कामाचा ताण तसेच अन्य कारणांमुळे मनाला त्रास होऊन तणाव वाढला आहे. त्यामुळेच मनाला ट्रेनिंग देत विचार करण्याची दृष्टी बदलण्याचे काम जीवन विद्या मिशनकडून केले जाते. यात कोणता धर्म - जात यांचा संबंधच नाही. तसेच श्रीमंत - गरीब असा भेदही केला जात नाही. जीवन विद्या मिशनचे तत्वज्ञान निसर्ग नियमांवर तत्वज्ञान आधारलेले आहे.
मानवी जीवनाला वेगळे वळण देत दृष्टी बदलण्यासाठी मनाचे कार्य वाढवणे गरजेचे आहे. स्वतःमधील संकुचित वृत्ती दूर करत मी आणि माझा या विचारात रमू नका. मनाचा कोतेपणा कमी न केल्यास स्वतः तणावाच्या परिस्थितीत अडकतो. मी व माझा असा विचार करत दुसर्यांच्या अहित चिंतल्यास संघर्ष वाढतो. त्यामुळे हा संघर्ष टाळत पुढे जाणे आवश्यक आहे, असे प्रल्हाद पै यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येकाने स्वतःसोबत सर्वांचा विचार केल्यास त्याला निसर्गही मदत करतो आणि अन्य लोकही आपला विचार करतात. असा विचार केल्याने काहींना मागे जाण्याची भिती वाटते. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही हे लक्षात ठेवा असे अनुभवाचे बोलही प्रल्हाद पै यांनी यावेळी सुनावले.
आपले काम करताना इतरांशी स्पर्धा करू नका. आपण आपले काम प्रामाणिकपणे करताना इतरांचेही चांगले व्हावे, असा विचार केल्यास सकारात्मक विचार निर्माण होतो. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना ठेवत तणाव कमी केल्यास यश निश्चितपणे मिळते, असे स्पष्ट करत व्यसनांपासून दूर रहात समाजासाठी चांगले करणे जेवढे शक्य आहे, तितके करा. त्यातून आनंद मिळून आपली मनोवृत्ती व्यापक होईल, असेही प्रल्हाद पै यांनी यावेळी सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |